शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

श्रमिक रेल्वेने उत्तर प्रदेशचे १५४४ मजूर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 5:00 AM

श्रमिक एक्स्प्रेस २४ डब्यांची असून, त्यात अमरावती विभागातील १५४४ मजूर, कामगार बांधव रवाना झाले आहेत. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष ठाकरे, अमरावतीचे स्टेशन प्रबंधक महेंद्र लोहकरे, मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांच्यासह महसूल, रेल्वे, पोलीस प्रशासनाचे अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्देस्वगृही परतणार : रेल्वेला १० लाखांचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या उत्तर प्रदेशातील १५४४ मजूर, कामगार बांधवांना स्वगृही पोहचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्स्प्रेस बुधवारी सायंकाळी ६ वाजता अमरावती रेल्वे स्थानकाहून उत्तर प्रदेशच्या देवरियाकडे रवाना झालेत. अमरावती विभागात अडकलेल्या मजूर, कामगार बांधवांना स्वगृही सोडण्यासाठी ही विशेष श्रमिक एक्स्प्रेस विनाथांबा देवरियापर्यंत जाणार आहे.श्रमिक एक्स्प्रेस २४ डब्यांची असून, त्यात अमरावती विभागातील १५४४ मजूर, कामगार बांधव रवाना झाले आहेत. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष ठाकरे, अमरावतीचे स्टेशन प्रबंधक महेंद्र लोहकरे, मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांच्यासह महसूल, रेल्वे, पोलीस प्रशासनाचे अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. रेल्वे स्थानकावर प्रथमत: सर्व परप्रांतीय प्रवाशांंची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या भोजन, चहा, पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली. विभागातून ठिकठिकाणाहून आलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर घरी परतण्याचा आनंद झळकत होता. जिल्हाधिकारी शैलेश नवाल व अन्य अधिकाऱ्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांना फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर आदींबाबत आवाहन केले व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.श्रमिक ट्रेनमधून अमरावती जिल्ह्यातून ५००, अकोला २८०, यवतमाळ २२१, बुलडाणा ४४२ आणि वाशिम जिल्ह्यातील १०१ कामगार रवाना झाले आहेत. केंद्र सरकारने प्रतिव्यक्ती ६५० रुपये प्रवास भाडे रेल्वेला दिले असून, बुधवारी रवाना झालेल्या विशेष ट्रेनद्वारे १० लाख ३ हजार ६०० रूपये रेल्वेला उत्पन्न मिळाले आहे.संचारबंदीमुळे अनेक दिवसांपासून अडकून पडल्यामुळे कामगारांचा कुटुंबीयांशी केवळ मोबाइलद्वारे संपर्क होत होता. मात्र, शासनाने दखल घेऊन विशेष ट्रेनची व्यवस्था केली. त्यामुळे आम्हाला आमच्या कुटुंबीयांना, नातेवाइकांना अनेक दिवसांनी प्रत्यक्ष भेटता येणार आहे. घरी परतण्याचा आनंद मोठा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी परप्रांतीय मजूर, कामगारांनी व्यक्त केली. दरम्यान गत आठवडाभरापासून पश्चिम बंगालकडे जाणाºया कामगारांसाठी रेल्वे उपलब्ध झाली नाही.