शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

शेतकºयांना १५ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:15 IST

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नाफेडच्या केंद्रांसाठी आॅनलाइन नोंदणी होत असताना प्रत्यक्षात खरेदी सुरू नसल्याने शेतकºयांना बाजार समित्यांकडे धाव घ्यावी लागली. यंदाच्या हंगामात २३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये एक लाख ९२ हजार १५९ क्विंटल सोयाबीन आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने व्यापाºयांना विकले गेल्याने शेतकºयांना किमान १५ कोटींचा फटका बसला आहे.आर्थिक ...

ठळक मुद्देडोळ्यादेखत लूट : दोन लाख क्विंटल खुल्या बाजारात

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नाफेडच्या केंद्रांसाठी आॅनलाइन नोंदणी होत असताना प्रत्यक्षात खरेदी सुरू नसल्याने शेतकºयांना बाजार समित्यांकडे धाव घ्यावी लागली. यंदाच्या हंगामात २३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये एक लाख ९२ हजार १५९ क्विंटल सोयाबीन आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने व्यापाºयांना विकले गेल्याने शेतकºयांना किमान १५ कोटींचा फटका बसला आहे.आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खुल्या बाजारात सोयाबिनची मोठ्या प्रमाणात विक्री केली. विक्रीसाठी येणाºया सोयाबीनचा ओघ अद्यापही तसाच कायम आहे. यंदा सोयाबीनला तीन हजार ५० रुपये आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. बाजार समित्यांसह खुल्या बाजारात शेतकºयांच्या निकडीचा खरेदीदारांनी फायदा घेत हमीपेक्षा ५०० ते हजार रुपये प्रतिक्विंटल कमीने खरेदी केल्याने शेतकºयांचे किमान १५ कोटींचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होते. बाजार समितीसह सहकार विभागाचे नियंत्रण व्यापाºयांवर नसल्याने दररोज शेतकºयांची लूट होत असताना कोणाकडूनही जाब विचारला गेला नाही, हे येथे उल्लेखनीय.यंदाच्या हंगामात पेरणीपासूनच पावसाची तूट असल्याने शेतकºयांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. त्यानंतरही पावसाचा ताण राहिला. त्यातून जे सोयाबीन बचावले त्यावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. पावसाबाबत अतिसंवेदनशील समजल्या जाणाºया सोयाबीन बहरावर असताना व शेंगा पक्वहोण्याच्या काळात पाऊस न आल्याने शेंगा कमी लागल्या व पोचट राहिल्या. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. यंदाच्या हंगामात उत्पादन खर्चही निघणे कठीण व्हावे, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी बाजार समित्यांमध्ये सोयाबीन नेल्यावर व्यापाºयांनी भाव पाडले.१५ कोटींच्या फटक्याचे गणित२३ आॅक्टोबरला अमरावती बाजार समितीत २३५० ते २५५०, नांदगाव खंडेश्वरला १८०० ते १६००, चांदूर रेल्वे १८०० ते २६५०, मोर्शी १८०० ते २५००, दर्यापूर १६५० ते २६२० व अचलपूर बाजार समितीमध्ये २२०० ते २६५० रूपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. यंदा आधारभूत किंमत ३०५० रूपये असताना जिल्ह्यात सरासरी २२०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला व आतापर्यंत दोन लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याने शेतकºयांना आधारभूत दराच्या तुलनेत किमान १५ कोटींचा तोटा झाला.सोयाबिनची बेभाव विक्रीआॅनलाईन नोंदणी, मात्र खरेदी बंदजिल्ह्यात नाफेडच्या पाच केंद्रांवर साधारणपणे तीन आॅक्टोबरपासून सोयाबीन, तूर, मूग व उडदासाठी शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी सुरू झाली. १६ आॅक्टोबरनंतर या केंद्रांवर फक्त मूग व उडदाची खरेदी सुरू करण्यात आली. यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी असल्याने मूग व उडदाचा पेरणी क्षेत्र कमी आहे. या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र जास्त असताना व सोयाबीनचा हंगाम सुरू असतानासुद्धा शासनाद्वारा खरेदी करण्यात आलेली नाही.ग्रेडर उपलब्ध नसल्याचा केवळ देखावानाफेडच्या खरेदी केंद्रांवर सोयाबीन खरेदी करण्यात येईल, असे शासनाने जाहीर केले. यवतमाळ येथे सोमवारच्या दौºयात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही दिल्यानंतरही जिल्ह्यात सोयाबीनची खरेदी सुरू झालेली नाही. ग्र्रेडरच उपलब्ध नसल्याचे कारण दर्शवित यंत्रणेद्वारा शेतकºयांची दिशाभूल करण्यात आली. मात्र, गुरूवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा दौरा असल्याने सोयाबीनची खरेदी करण्याचा देखावा यंत्रणेद्वारा सुरू आहे.यंदाच्या हंगामातील सोयाबीनची आवकयंदाच्या हंगामात जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये २३ आॅक्टोबरअखेर १,९२,१६० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यामध्ये अमरावती बाजार समितीमध्ये १,०६,६८९ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर ४,५४६, चांदूर रेल्वे ५,१०९, चांदूर बाजार ६,७६७, मोर्शी ५,८१२, वरूड २१०, दर्यापूर ३,७८३, अंजनगाव सुर्जी ४,१३०, अचलपूर बाजार समितीमध्ये २,०६७ क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे.