शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

14 वर्षांपासून वनभंगाच्या गुन्ह्यांना बगल, मुख्य वनसंरक्षकांचे दुर्लक्ष :14 हजार 400 कोटींचा महसूल बुडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 17:30 IST

वनक्षेत्रात नियमबाह्य बांधकाम, उत्खन्नन, गौण खनिजाची चोरी, रस्ते निर्मिती झाल्यास संबंधितांविरुद्ध मुख्य वनसंरक्षकांनी वनभंग गुन्हे दाखल करावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.

गणेश वासनिकअमरावती : वनक्षेत्रात नियमबाह्य बांधकाम, उत्खन्नन, गौण खनिजाची चोरी, रस्ते निर्मिती झाल्यास संबंधितांविरुद्ध मुख्य वनसंरक्षकांनी वनभंग गुन्हे दाखल करावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. मात्र, राज्यात गत १४ वर्षांपासून एकही सीसीएफनी वनभंग झाल्याबाबत गुन्हे दाखल केले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

वनसंरक्षक नियम २००३ नियम ९ (१) नुसार केंद्र सरकारने वनभंग गुन्हे हे न्यायालयात दाखल करण्याबाबत मुख्य वनसंरक्षकांना अधिकार बहाल केले आहेत. परंतु राज्याच्या ११ प्रादेशिक विभागात एकाही सीसीएफनी वनभंग झाल्याबाबत अधिकृत गुन्हा दाखल करून त्याचा न्यायालयात पाठपुरावा केला नाही, अशी माहिती आहे. वनभंग या शब्दात वनजमिनींचा वापर वनेत्तर कामांसाठी केल्यास संबंधितांविरुद्ध वनगुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. राज्यात १९८० पूर्वी असलेल्या रस्त्याची लांबी ही अंदाजे आठ हजार कि.मी. होती. आज ती ८० हजार कि.मी. पुढे गेली आहे. वनजमिनीवर नवीन रस्ता तयार करायचा असल्यास केंद्र सरकारची परवनागी असणे आवश्यक आहे. मात्र, रस्ते निर्मिती करताना नवीन वनांच्या हद्दीत प्रती किमी सरासरी असे दोन हेक्टर असे दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक जागा  वनांची वापरली आहे. यात माती रस्त्यांचे रुपांतर मुरूम रस्त्यात, मुरूम रस्त्याचे रुपांतर डांबरीकरणात, डांबरीकरण रस्त्याचे रुपांतर सिमेंट रस्त्यात झाले आहे. तसेच तीन मीटर लांबीचे रस्ते २४ मीटर, १२ मीटर रुंदीचे रस्ते २४ मीटर व २४ मीटर रुंदीचे रस्ते ६० मीटर झाले आहेत. रस्ते रुंदीकरणात वापरलेल्या वनजमिनींची पूर्वपरवानगीही केंद्र सरकारकडून घेण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने महत्त्वाच्या २ ते ३ टक्के प्रकल्पासाठीच राज्यात वनजमिनींची परवानगी दिली आहे. राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ३ लक्ष ६ हजार चौरस किमी असून ६३ हजार चौरस किमी क्षेत्र हे वनविभागाच्या ताब्यात आहे. राज्यात साडेतीन लाख किमी रस्त्यांपैकी ७२ हजार किमी रस्ते हे वनहद्दीतून गेले आहेत. मात्र रस्ते रुंदीकरणासाठी वापरल्या गेलेला अतिरिक्त वनजमिनीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतलेला नाही, अशी माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वनजमिनींची ठरविलेली नक्त रक्कम २० लाख हेक्टर प्रमाणे १४ हजार ४०० कोटी निष्क्रिय वनाधिका-यांनी वसूल करण्यास दिरंगाई केल्याचे वास्तव समोर आले आहे. वनभंगाबाबतचे गुन्हे दाखल का करण्यात आले नाही, याविषयी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान वनसचिव विकास खारगे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

रस्ते निर्मिती कंत्राटदारांना अभय-वनजमिनींवर विनापरवानगीने रस्ते निर्मित होत असताना वनाधिका-यांकडून संबंधित कंत्राटदाराविरुद्ध वनभंगाचे गुन्हे दाखल करण्याऐवजी त्याला अभय दिले जाते. त्यामुळे वनविभागाला कोणीही जुमानत नाही, ही बाब समोर आली आहे. यापूर्वी वनभंग केल्याप्रकरणी दोन माजी वनमंत्र्यांना जेलची हवा खावी लागली, हे विसरता येणार नाही.वनभंग म्हणजे काय?वनजमिनीवर अतिक्रमण करणे, वनजमिनींचा गैरवापर, नियमबाह्य रस्ते निर्मिती करणे, प्रकल्प उभारणे म्हणजे वनभंग करणे होय.