शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
3
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
4
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
5
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
7
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
8
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
9
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
10
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
11
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
12
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
13
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
14
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
15
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
16
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
17
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
18
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
19
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
20
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना

१४ हजार शेतकऱ्यांचे नुकसान सूचना अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

खरिपातील सोयाबीन, ज्वारीचा हंगाम अन् कपाशीच्या वेचणीची सुरवात होत असतानाच्या काळातच दहा दिवसांच्या अवकाळी पावसाने किमान दीड लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान प्रधानमंत्री विमा योजनेच्या निकषात समाविष्ट असल्याने शेतकऱ्यांना विमा परतावा लाभ मिळू शकतो. मात्र, त्याकरिता नुकसानाच्या ७२ तासांत पीक नुकसान सूचना अर्ज विमा कंपन्यांला सादर करावे लागतात.

ठळक मुद्देसंडे अँकर । विमा कंपन्यांकडे सादर, योजनेत सहभागी १.९२ लाख शेतकऱ्यांच्या तुलनेत नगण्य

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दहा दिवसांच्या अवकाळीने जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरमधील खरीप पिके बाधित झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा परतावा मिळावा, यासाठी पीक नुकसानाबाबत ७२ तासांच्या आत कंपनीला कळविणे आवश्यक आहे. या अनुषंगाने शुक्रवारपर्यंत १४ हजार ६०३ शेतकऱ्यांचे पीक नुकसान सूचना अर्ज कंपनीला प्राप्त झाले. जिल्ह्यात यंदा १.९२ लाख शेतकऱ्यांनी पीकविम्यात सहभाग नोंदविला असताना, भरपाईसाठी अर्जाचे प्रमाण नगण्य आहे.खरिपातील सोयाबीन, ज्वारीचा हंगाम अन् कपाशीच्या वेचणीची सुरवात होत असतानाच्या काळातच दहा दिवसांच्या अवकाळी पावसाने किमान दीड लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान प्रधानमंत्री विमा योजनेच्या निकषात समाविष्ट असल्याने शेतकऱ्यांना विमा परतावा लाभ मिळू शकतो. मात्र, त्याकरिता नुकसानाच्या ७२ तासांत पीक नुकसान सूचना अर्ज विमा कंपन्यांला सादर करावे लागतात. कंपनीचे तालुका किंवा जिल्हा प्रतिनिधींकडे किंवा ई-मेलद्वारे पीक विमा हप्ता भरल्याच्या पुराव्यासह विमा कंपनीकडे किंवा १८००११६५१५ या क्रमांकावर संपर्क साधून ही प्रक्रिया करावी लागते.ज्या शेतकऱ्यांची शेती पावसामुळे जलमय होऊन कापणी केलेल्या पिकाचे किंवा उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे, त्यांनी नुकसानाची माहिती पिकांची नोंद असलेला सात-बारा व पीक विमा भरल्याच्या पुराव्यासह विमा कंपनीच्या संबंधितांकडे तसेच विमा हप्ता भरलेल्या बँकेकडे, महसूल किंवा कृषी विभागाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्याकडे, कृषी सहायक, तलाठी, कृषी पर्यवेक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे कळविणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांना याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ८८५ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पीक नुकसान सूचना अर्ज सादर केले आहेत. मात्र, जिल्ह्यात अवकाळीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत अर्जदारांची संख्या नगण्य आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात कर्जदार व गैरकर्जदार या दोन्ही प्रवर्गात १,९२,०१० शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरला होता.प्रपत्रानुसार गोषवारा आवश्यकविमा योजनेच्या निकषानुसार नुकसानभरपाईचा गोषवारा हा प्रपत्रानुसार विमा कंपनीच्या सहकार्याने तयार करण्याचे निर्देश राज्याच्या कृषी आयुक्तांनी शनिवारी सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदविला व अर्ज केले आहेत, अश्या अर्जाची तपासणी वैयक्तिकरीत्या करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी यामध्ये स्पष्ट केले आहे.गावनिहाय याद्या कराव्या-कृषी आयुक्तशेतकºयांचे विमा कंपनीकडे सादर अर्जाची तालुकानिहाय यादी करावी व गावस्तरावर नेमुक दिलेल्या सर्वेक्षण समितीकडे सुपूर्द करावी. क्षेत्रीय पंचनाम्याकरिता विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित राहतील. अनुपस्थित राहिल्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी केलेले पंचनामे ग्राह्य धरावे लागतील, अशी तंबी कृषी आयुक्तांनी विमा कंपन्यांना शनिवारी दिली. कोणत्याही परिस्थितीत सर्व अर्जाची क्षेत्रीय तपासणी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.ही आहे योजनेच्या निकषातील तरतूदपंतप्रधान पीक विमा योजनेच्या परिच्छेद क्रमांक ७.५ मध्ये कापणी करून ठेवलेल्या पिकांचे काढणीपश्चात अवकाळी पावसामुळे नुकसानासाठी वैयक्तिक स्तरवर पंचनामे करून विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. मात्र, अशा प्रकारची माहिती शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत सदर विमा कंपनीकडे, कंपनीच्या तालुका किंवा जिल्हा प्रतिनिधीकडे तसेच टोल फ्री क्रमांकावर सादर करणे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी