शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

राज्यातील १३०९ गावे अनुसूचित क्षेत्रातून वगळणार; आदिवासी विकास विभागात लगबग

By गणेश वासनिक | Updated: November 2, 2023 18:09 IST

आदिवासी समाजाची लोकसंख्या ५० टक्क्यांवर अपेक्षित

अमरावती : देशात ७३ वर्षांपूर्वी अनुसूचित क्षेत्रातील गावांची यादी घोषित झालेली आहे. त्यानुसार राज्यात या यादीतील मूळ अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या ५७४६ गावांपैकी १३०९ गावे सुधारित अनुसूचित क्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव शासनाने तयार केला आहे. यासंदर्भात आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे अध्यक्षतेखाली २३ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीतील निर्देशानुसार अनुसूचित क्षेत्राच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव सुधारित करण्याचे दृष्टीने काम हाती घेण्यात आले आहे.

सद्य:स्थितीत राज्यात १३ जिल्ह्याँतील २३ तालुके संपूर्ण व ३६ तालुके अंशतः अनुसूचित क्षेत्रात येत असून यातील महसुली गावांची संख्या जनगणना २०११ नुसार ५७४६ इतकी आहे. अनुसूचित क्षेत्राच्या सुधारित प्रस्तावात या १३ जिल्ह्यांतील १,३०९ गावे वगळण्याचे प्रस्तावित आहे. तर नव्याने समाविष्ट करण्यासाठी १२९३ गावे प्रस्तावित आहे. नवीन प्रस्तावित गावांत वाड्या, पाडे यांचा समावेश आहे. गावाच्या व्याख्येत येणाऱ्या वाडी-पाडे, वस्ती- वस्त्या, तांडे व त्यांचा समूह घोषित अनुसूचित क्षेत्रात येतात. पण यासंबंधी १९५० पासून आजपर्यंत नोटीफिकेशन काढण्यात आलेले नाहीत.

घटनेतील तरतुदीनुसार अनुसूचित क्षेत्रात फेरबदल केवळ सीमांच्या दुरुस्तीच्याच रूपाने करता येतो. पूर्वोक्तवत असेल ते रद्द करून बदल करता येत नाही. ढेबर आणि भुरीया आयोगाच्या शिफारशी लक्षात घेऊन ज्या गावांत आदिवासी समाजाची लोकसंख्या ५० टक्केच्या वर आहे, पण अशी गावे आजपर्यंत अनुसूचित क्षेत्रात आली नाही, ती समाविष्ट करणे आवश्यक आहे. शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे.

- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाVijaykumar Gavitविजय गावीतAmravatiअमरावती