जिल्ह्यातील १२७३ ग्राहकांचे कृषी वीजबिल झाले कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:17 IST2021-02-26T04:17:23+5:302021-02-26T04:17:23+5:30

भातकुली/दर्यापूर : महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानादरम्यान जिल्ह्यातील १२७३ शेतकऱ्यांनी आपले कृषी देयके कोरे करून घेतले ...

1273 consumers in the district have no electricity | जिल्ह्यातील १२७३ ग्राहकांचे कृषी वीजबिल झाले कोरे

जिल्ह्यातील १२७३ ग्राहकांचे कृषी वीजबिल झाले कोरे

भातकुली/दर्यापूर : महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानादरम्यान जिल्ह्यातील १२७३ शेतकऱ्यांनी आपले कृषी देयके कोरे करून घेतले आहे.

या अभियानाअंतर्गत ७० टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील १२७३ शेतकºयांमध्ये प्रामुख्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील व मोर्शी तालुक्यातील प्रत्येकी १८२ शेतकऱ्यांचा सहभाग आहे. याच सोबत शेंदूरजना घाट ९५, बडनेरा ८८, वरूड ११८, भातकुली ७५, धामणगाव येथील ८८, अचलपूर ८०, अंजनगाव २२, चिखलदरा ३०, दर्यापूर ६, धारणी १५, चांदूरबाजार ७३, चांदूर रेल्वे येथील ६२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. महावितरणचे महा कृषी ऊर्जा अभियानात सर्व उच्च व लघुदाब कृषिपंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या ५ वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात आला आहे. तसेच ५ वर्षांपर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार १०० टक्के माफ करून व्याज हे १८ टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे.

--------------

Web Title: 1273 consumers in the district have no electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.