शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

४,८९६ सदस्यपदांकरिता १२,६४४ उमेदवारांचे अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:01 IST

जिल्ह्यात मार्च महिन्यात ५२४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोरोना संसर्गाचा लवलेशही नव्हता. त्यावेळी उमेदवारी दाखल करण्याचे अखेरचे दिवशी म्हणजेच १६ मार्चला १३,३२० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते व दोन दिवसात आयोगाने आहे त्या स्थितीत पुढील आदेशापर्यंत निवडणुकांना स्थगिती दिली होती व नोव्हेंबर महिन्यात यापूर्वीची प्रक्रियाच रद्द करुन व जून ते डिसेंबर महिण्यात मुदत संपणाऱ्या २९ ग्रामपंचायतींची संख्यावाढ करून ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ११ डिसेंबरला जाहीर केला.

ठळक मुद्देरात्री उशिरापर्यंत प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या   शेवटच्या दिवशी बुधवारी १२,६४४ अर्ज दाखल झाले. आयोगाने अडीच तासांची वेळ वाढविली असली तरी पाच तालुक्यांत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने रात्री उशिरापर्यंत अर्जाची प्रक्रिया सुरू होती.जिल्ह्यात मार्च महिन्यात ५२४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोरोना संसर्गाचा लवलेशही नव्हता. त्यावेळी उमेदवारी दाखल करण्याचे अखेरचे दिवशी म्हणजेच १६ मार्चला १३,३२० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते व दोन दिवसात आयोगाने आहे त्या स्थितीत पुढील आदेशापर्यंत निवडणुकांना स्थगिती दिली होती व नोव्हेंबर महिन्यात यापूर्वीची प्रक्रियाच रद्द करुन व जून ते डिसेंबर महिण्यात मुदत संपणाऱ्या २९ ग्रामपंचायतींची संख्यावाढ करून ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ११ डिसेंबरला जाहीर केला. त्यानुसार २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्जाची प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये एकाच वेळी गर्दी झाल्याने सर्व्हरची गती मंदावली यासह अनेक तांत्रिक त्रुटी आल्याने आयोगाद्वारा शेवटच्या दिवशी ऑफलाईन म्हणजेच पारंपरिक पद्धतीने उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आले व उमेदवारी अर्ज दाखल करण्याला ३ ऐवजी सायंकाळपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली होती.यामध्ये धारणी, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, वरुड व दर्यापूर तालुक्यात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाद्वारा दाखल उमेदवारी अर्जांची संख्या गुरुवारी जाहीर करण्यात आली. 

१५ जानेवारीला मतदान १५ जानेवारीला १९५१ मतदारकेंद्रांमध्ये ११,०७,२११ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये अमरावती तालुक्यात ९५,७२१, भातकुली ६७,९५२, नांदगाव ८२,२३५, मोर्शी ८२,४५२, वरुड ८७,५०९, दर्यापूर् ९२,७४०, अंजनागाव ६९,६८३, अचलपूर ९२,१९३, चांदूर रेल्वे ४५,५१९, धामणगाव रेल्वे ८७,६०१, चांदूरबाजार १,०१,८३२, धारणी ६१,५५३, तिवसा ६६,५५३ व चिखलदरा तालुक्यात २९,८६४ मतदार आहेत.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक