१२३६ कामगार बिहारकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:01 IST2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:01:27+5:30

मॉडेल रेल्वे स्थानकाहून शनिवारी लखनौकडे एक ट्रेन रवाना झाली, तर रविवारी दुसºया दिवशी पुन्हा कामगारांना घेऊन ट्रेन रवाना झाली. रेल्वे प्रशासनाने सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर या गाडीला पुढे रवाना करण्यात आले. अमरावती विभागातून पाचही जिल्ह्यातील कामगारांना या ट्रेनमधून प्लॅटफार्म क्रमांक १ वरून पाठविण्यात आले. राज्य शासनाकडून परप्रांतीय कामगारांसाठी जेवण, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

1236 workers sent to Bihar | १२३६ कामगार बिहारकडे रवाना

१२३६ कामगार बिहारकडे रवाना

ठळक मुद्दे२४ डब्यांची श्रमिक रेल्वे : विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेले मजूर, कामगारांना त्यांच्या मूळ गावी परत जाता यावे, यासाठी केंद्र सरकारने श्रमिक रेल्वे गाडीची व्यवस्था केली आहे. त्याअनुषंगाने अमरावती रेल्वे स्थानकाहून रविवारी दुपारी २ वाजता बरोनी (बिहार) येथे २४ डब्यांची गाडी रवाना झाली. यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्यासह फौजफाटा उपस्थित होता.
मॉडेल रेल्वे स्थानकाहून शनिवारी लखनौकडे एक ट्रेन रवाना झाली, तर रविवारी दुसऱ्या दिवशी पुन्हा कामगारांना घेऊन ट्रेन रवाना झाली. रेल्वे प्रशासनाने सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर या गाडीला पुढे रवाना करण्यात आले.
अमरावती विभागातून पाचही जिल्ह्यातील कामगारांना या ट्रेनमधून प्लॅटफार्म क्रमांक १ वरून पाठविण्यात आले. राज्य शासनाकडून परप्रांतीय कामगारांसाठी जेवण, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अमरावती विभागातून विविध गावातून कामगार आपल्या गावी जाण्यासाठी मॉडेल रेल्वे स्थानकावर आले होते. सुरक्षेसाठी आरपीएफ तैनात होते. दरम्यान, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी परप्रांतीय कामगारांना जेवण, चहा, पाण्याच्या व्यवस्थेबाबत पाहणी केली. ही गाडी नागपूर, इटारसी होत बरोनी (बिहार) येथे पोहचणार असल्याची माहिती आहे. या गाडीतून अकोला जिल्हा ६८, वाशिम ३९४, बुलडाणा १५९, यवतमाळ १९९ व अमरावती जिल्ह्यातून ४१६ कामगार रवाना झाले आहेत.

झारखंड येथील मजुरांसाठी लवकरच ट्रेन- पालकमंत्री
बिहार येथे कामगारांना घेऊन रविवारी श्रमिक विशेष ट्रेन रवाना झाली. आता येत्या एक, दोन दिवसात झारखंड येथील कामगार, मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना तयारी करण्याबाबत अवगत करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या झारखंड येथील कामगारांना लवकरच स्वगृही परतता येईल, असे ना. ठाकूर म्हणाल्या.

तिकिटांशिवाय नव्हता प्लॅटफार्मवर प्रवेश
कामगारांच्या प्रत्येक जथ्यासोबत महसूल प्रशासनाने नोडल अधिकारी नियुक्त होते. जिल्हा प्रशासनाकडे नोंदणीकृत कामगारांनाच श्रमिक रेल्वेने प्रवासाची मुभा होती. प्रवास सुरू करण्यापूर्वी कामगारांना अगोदर तिकिट अनिवार्य होते. प्रति प्रवासी ६६५ रूपये याप्रमाणे रेल्वेला ८ लाख २१ हजार ९४० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहेत. तिकिटांशिवाय प्लॅटफार्मवर प्रवेश नव्हता.

Web Title: 1236 workers sent to Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.