यूपीतील १२०० व्यक्ती लखनौकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:01 IST2020-05-10T05:00:00+5:302020-05-10T05:01:05+5:30
पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते. गुजरातेत बडोदा येथे ट्रेन सोडण्याबाबत नियोजन होत आहे. अडकलेल्या सर्व नागरिकांना स्वगृही पोहचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

यूपीतील १२०० व्यक्ती लखनौकडे रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या १२३९ व्यक्तींना स्वगृही पोहचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्स्प्रेस शनिवारी सायंकाळी येथील रेल्वे स्थानकावरून लखनौकडे रवाना झाली. जिल्ह्यात अडकलेल्या इतरही नागरिकांना स्वगृही पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. संयम ठेवा, कुणीही पायी जाऊ नका, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.
पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते. गुजरातेत बडोदा येथे ट्रेन सोडण्याबाबत नियोजन होत आहे. अडकलेल्या सर्व नागरिकांना स्वगृही पोहचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. रेल्वे स्थानकावर सर्व प्रवाशांंची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी योगदान दिले. प्रवाशांच्या चेहऱ्यावर घरी परतण्याचा आनंद दिसत होता. शासनाने दखल घेऊन विशेष ट्रेनची व्यवस्था केली याबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली. ट्रेन सुटताच प्रवाशांनी एकच जल्लोष केला.
जिल्ह्यातून आतापर्यंत उत्तर प्रदेशात ३८६, भोपाळ ४, बिलासपूर ६९, तेलंगणा ४१४, आंध्र प्रदेश १६८, राजस्थान १५३, मध्य प्रदेश ३७६, चेन्नई ५, पश्चिम बंगाल येथील १५ व्यक्ती विशेष ट्रेनद्वारे रवाना झाल्या. कोटा येथून ७२ विद्यार्थ्यांना जिल्ह्यात परत आणण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
संकेतस्थळावर नोंदणीद्वारे जिल्ह्यात परतणे शक्य
जिल्ह्यातून इतर राज्यात गेलेल्या या सर्व व्यक्तींना परत अमरावती जिल्ह्यात यावयाचे असल्यास त्यांना शासनाने विहित केलेल्या लिंकवर व संकेत स्थळावर आॅनलाइन अर्ज करावा लागेल. त्यानंतर त्यांना तेथील जिल्हा प्रशासनाद्वारा येण्याची परवानगी दिली जाईल. जिल्ह्यात परत येणाºया व्यक्तींची तालुका समितीमार्फत आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात व राज्यात परतलेल्या व्यक्तींसाठीदेखील हीच पद्धत राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.