अंजनगाव परिसरातील १२ गावांना स्वस्त विजेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:13 IST2021-02-10T04:13:22+5:302021-02-10T04:13:22+5:30
पान २ ची बॉटम अंजनगाव बारी : येथील ग्रामपंचायतकडून ११ हेक्टर जागा घेऊन त्यावर सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. ...

अंजनगाव परिसरातील १२ गावांना स्वस्त विजेची प्रतीक्षा
पान २ ची बॉटम
अंजनगाव बारी : येथील ग्रामपंचायतकडून ११ हेक्टर जागा घेऊन त्यावर सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. काम कुंपणभिंतीपर्यंत पोहोचले. मात्र, त्यानंतर कोरोना लॉकडाऊन लागले व सारे केर मुसळात गेले. प्रकल्पाचे काम रखडल्याने अंजनगाव बारी परिसरातील १२ गावांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होईल, ही आशा मात्र दिवास्वप्न ठरली.
प्रकल्पातून होणाऱ्या ६०० मेगावॅट वीज निर्मितीचे नियोजन बिघडले आहे. अंजनगाव बारी परिसरातील जमीन सुपीक असून, सिंचनासाठी पाणीदेखील उपलब्ध आहेत. मात्र, वीजपुरवठा अनियमित असल्याने शेतकऱ्यांना सिंचनात अडथळा येत होता. यासाठी अंजनगाव बारी ते पार्डी रोडवरील अंजनगाव बारी हद्दीतील जमीन प्रकल्पासाठी देण्यात आली होती तसेच प्रकल्पासाठी दीड वर्षांआधी पक्के कम्पाऊंड उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. महावितरणचे स्थानिक अधिकारी या प्रकल्पाबद्दल अनिभिज्ञ आहेत. या सौरऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना कमी दरात वीजपुरवठा मिळेल. याचा लाभ बागायती पिकांना होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता प्रकल्पाचे काम का रखडले, असा सवाल येथील शेतकरी शरद इंगोले यांनी उपस्थित केला.
या गावांना मिळणार होता लाभ
अंजनगाव बारी लगत असलेल्या पार्डी, अऱ्हाड-कुऱ्हाड, वडगाव जिरे, सातरगाव, अडगाव (बु), मांजरी-म्हसला, टिमटाळा, खिरसाना-निरसाना, मालखेड रेल्वे, लालखेड, पळसखेड या गावांना सौरऊर्जा प्रकल्पाचा लाभ मिळेल, असा दावा उद्घाटनाच्या वेळी करण्यात आला होता. या भागातील विद्युत पुरवठा सारखा खंडित होतो. यावर उपाय म्हणून सातरगावला कृषिपंप पुरवठा जोडण्यात आला. त्यातच पार्डीचा प्रस्ताव पूर्णत्वास गेलेला नाही. फीडरच्या समस्येवर मात करण्यासाठी हा प्रकल्प सुरू होणे अत्यावश्यक असल्याचे मत मांजरी म्हसला येथील शेतकरी राजू बडनेरकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
कोट
महावितरणचे अधिकृत अंग हा प्रकल्प असून, मेडाने प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पातून कमी दराने २४ तास वीजपुरवठा केला जाणार होता. पुढील कामाबद्दलची कोणतीही सूचना आम्हाला मिळाली नाही.
टी.आर. पाटील, अभियंता, ग्रामीण, महावितरण
कोट २
सौरऊर्जा प्रकल्पासाठी अधिकाऱ्यांनी जागेची मागणी केली. अंजनगाव बारी ग्रामपंचायतने त्याकरिता जागा दिली. मात्र, काम का थांबले, त्याबद्दल सांगता येणार नाही.
- विजय कपिले, ग्रामविकास अधिकारी, अंजनगाव बारी