शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

अमरावती जिल्ह्यात संत्रा बागायतदारांचे ११०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 10:22 IST

‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ अशी ओळख असलेल्या वरूड-मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादकांना यंदा ११०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देआंबियाची २५ टक्के फळे शिल्लक, मृग बहर अत्यल्पसंत्रा प्रक्रिया उद्योग हवा मोठ्या प्रमाणात संत्रा लागवडक्षेत्र असले तरीदेखील वरूड व मोर्शी तालुक्यात प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे हे फळ तग धरत नाही. याचा परिणाम थेट भावावर होतो. प्रक्रिया उद्योगाची उभारणी झाल्यास येथील संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येतील

वातावरणाचा बदल कारणीभूत :वीरेंद्रकुमार जोगी।आॅनलाईन लोकमतअमरावती : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ अशी ओळख असलेल्या वरूड-मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादकांना यंदा ११०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. राजस्थान व पंजाबच्या किन्नूचे उत्पादन कमी असल्याने भाव वधारले असले तरी त्याचा फायदा येथील उत्पादकांना मिळू शकत नसल्याचे चित्र आहे.१९८२ साली आलेल्या कोळशी रोगामुळे हजारो हेक्टरमधील संत्राबागा नष्ट झाल्यानंतर केंद्र सरकारच्या योजना व संत्रा उत्पादकांच्या जिद्दीमुळे मागील काही वर्षांत संत्राबागा जगू लागल्या आहेत. आजघडीला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टर क्षेत्रात संत्राबागा आहेत. त्यापैकी ५५ हजार हेक्टरमधील संत्राबागा उत्पादनक्षम आहेत. यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात मृग बहर घेतला जातो, तर २० हजार हेक्टर क्षेत्रात आंबिया बहरातून उत्पादन घेतले जाते. साधारणत: १ हेक्टरमध्ये सरासरी १० टन संत्रा उत्पादन होते. मागील काही वर्षांत सरासरी २० हजार रुपये टन असा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. यानुसार जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टरमध्ये ११०० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. मात्र यंदा मृग बहर अत्यल्प आला, तर आंबिया बहराची फळे मोठ्या प्रमाणात गळल्याने नुकसान झाले आहे.एकेकाळी देशाच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी संत्री खरेदीसाठी वरूडमध्ये येत होते. राजस्थान व पंजाबातही संत्राबागा यशस्वी ठरल्याने व्यापाऱ्यांचा कल तिकडे वाढता झाला. मात्र यंदा पंजाबचा किन्नू व राजस्थानमध्येही संत्री उत्पादन नसल्याने बाजारपेठेत भाव वधारले आहेत. त्याचा फायदा मात्र शेतकºयांना मिळू शकत नसल्याचे वास्तव आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी