शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

अमरावती जिल्ह्यात संत्रा बागायतदारांचे ११०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 10:22 IST

‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ अशी ओळख असलेल्या वरूड-मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादकांना यंदा ११०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देआंबियाची २५ टक्के फळे शिल्लक, मृग बहर अत्यल्पसंत्रा प्रक्रिया उद्योग हवा मोठ्या प्रमाणात संत्रा लागवडक्षेत्र असले तरीदेखील वरूड व मोर्शी तालुक्यात प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे हे फळ तग धरत नाही. याचा परिणाम थेट भावावर होतो. प्रक्रिया उद्योगाची उभारणी झाल्यास येथील संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येतील

वातावरणाचा बदल कारणीभूत :वीरेंद्रकुमार जोगी।आॅनलाईन लोकमतअमरावती : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ अशी ओळख असलेल्या वरूड-मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादकांना यंदा ११०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. राजस्थान व पंजाबच्या किन्नूचे उत्पादन कमी असल्याने भाव वधारले असले तरी त्याचा फायदा येथील उत्पादकांना मिळू शकत नसल्याचे चित्र आहे.१९८२ साली आलेल्या कोळशी रोगामुळे हजारो हेक्टरमधील संत्राबागा नष्ट झाल्यानंतर केंद्र सरकारच्या योजना व संत्रा उत्पादकांच्या जिद्दीमुळे मागील काही वर्षांत संत्राबागा जगू लागल्या आहेत. आजघडीला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टर क्षेत्रात संत्राबागा आहेत. त्यापैकी ५५ हजार हेक्टरमधील संत्राबागा उत्पादनक्षम आहेत. यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात मृग बहर घेतला जातो, तर २० हजार हेक्टर क्षेत्रात आंबिया बहरातून उत्पादन घेतले जाते. साधारणत: १ हेक्टरमध्ये सरासरी १० टन संत्रा उत्पादन होते. मागील काही वर्षांत सरासरी २० हजार रुपये टन असा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. यानुसार जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टरमध्ये ११०० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. मात्र यंदा मृग बहर अत्यल्प आला, तर आंबिया बहराची फळे मोठ्या प्रमाणात गळल्याने नुकसान झाले आहे.एकेकाळी देशाच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी संत्री खरेदीसाठी वरूडमध्ये येत होते. राजस्थान व पंजाबातही संत्राबागा यशस्वी ठरल्याने व्यापाऱ्यांचा कल तिकडे वाढता झाला. मात्र यंदा पंजाबचा किन्नू व राजस्थानमध्येही संत्री उत्पादन नसल्याने बाजारपेठेत भाव वधारले आहेत. त्याचा फायदा मात्र शेतकºयांना मिळू शकत नसल्याचे वास्तव आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी