शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

१०८ रुग्णवाहिका खासगी दवाखान्यांना उपलब्ध व्हाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST

********************** ** १०८ रुग्णवाहिकेचे कंट्रोलर करतात प्रायव्हेट, सरकारी असा भेदभाव *******†**†*********** दिवसेंदिवस तालुक्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना ...

**********************

** १०८ रुग्णवाहिकेचे कंट्रोलर करतात प्रायव्हेट, सरकारी असा भेदभाव

*******†**†***********

दिवसेंदिवस तालुक्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना तालुक्यात शासकीय कोविड हाॕॅस्पिटल नसताना गंभीर परिस्थिती झालेल्या रुग्णाला खासगी रुग्णालयातून नेण्यासाठी नकार देणाऱ्या १०८ ॲम्बुलन्सचा काय उपयोग? रुग्णावाहिका शासकीय रुग्ण, खासगी रुग्ण असा भेद करू शकते काय, असा प्रश्न नुकताच एका कोविड रुग्णाबाबत निर्माण झाला होता. शेवटी त्या रुग्णास खासगी वाहनाने परतवाडा येथे हलविण्यात आले होते.

सविस्तर वृत्त असे की १० दिवसांपूर्वी दयानंदनगर येथील गरीब कुटुंबातील हातमजुरी करणारे शिवदास पायघन हे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे त्यांना भंडारज येथील खासगी कोविड हाॕॅस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना आठ दिवसानंतर सुटी मिळाली. परंतु घरी येताच दुसऱ्याच दिवशीच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांच्या परिवाराने त्यांना शहरातीलच एका खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना परतवाडा किंवा अमरावती कोविड सेंटरमध्ये नेण्याचे सुचवले असता सामाजिक कार्यकर्ते मनोहर मुरकुटे यांनी शहरातील काही खासगी रुग्णवाहिकेसाठी फोन लावून प्रयत्न केले; परंतु उपलब्ध झाली नाही. शेवटी शासनाचे १०८ या नंबरवर संपर्क केला असता रुग्णवाहिकेच्या कंट्रोलरकडून आम्ही पेशंटला फक्त सरकारी कोविड सेंटरवरूनच नेतो, प्रायव्हेट सेंटरवरून नेत नाही, असे उत्तर मिळाले. रुग्णाची वाईट स्थिती पाहता अखेर रुग्णाला खासगी गाडीने परतवाडा येथे न्यावे लागले.

यावरून शासनाची रुग्णवाहिका ही लोकांचे जीव वाचविण्याचे काम करत आहे की रुग्णाला मारण्याचे काम करत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशी परिस्थिती पुन्हा घडू नये व रुग्ण हा प्रायव्हेट दवाखान्यात असो की सरकारी दवाखान्यात असो, त्या रुग्णाला १०८ या रुग्णवाहिकेने सेवा उपलब्ध करून द्यावी. या विषयीचे निवेदन तहसीलदार जगताप यांच्यामार्फत जिल्हाधिका-यांना सामाजिक कार्यकर्ते मनोहर मुरकुटे, सचिन जायदे यांनी दिले. जिल्हाधिकारी या गंभीर बाबीवर काय निर्णय घेतात, याकडे जनतेचे लक्ष केंद्रित झाले आहे.