शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अमरावती विभागात कर्जमाफी, प्रोत्साहन योजनेसाठी १० लाख शेतकरी पात्र; 7 लाख शेतकऱ्यांनी भरले ऑनलाइन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 16:57 IST

शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख मर्यादेतील कर्ज माफ केले आहे.

ठळक मुद्देशासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख मर्यादेतील कर्ज माफ केले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’मध्ये ३ सप्टेंबरपर्यत अमरावती विभागातील पात्र १० लाख शेतकऱ्यांपैकी 6 लाख ६५ हजार ४६६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. १५ तारखेच्या पात्र शेतकऱ्यांचे अर्ज भरणे शक्य नसल्याने योजनेला मुदतवाढ मिळणे महत्त्वाचे आहे. 

अमरावती, दि.5 - शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख मर्यादेतील कर्ज माफ केले आहे. यासाठीच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’मध्ये ३ सप्टेंबरपर्यत अमरावती विभागातील पात्र १० लाख शेतकऱ्यांपैकी 6 लाख ६५ हजार ४६६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यामध्ये चार लाख ७२ हजार ४१५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. मात्र, १५ तारखेच्या पात्र शेतकऱ्यांचे अर्ज भरणे शक्य नसल्याने योजनेला मुदतवाढ मिळणे महत्त्वाचे आहे. 

शासनाद्वारे जाहीर कर्जमाफी योजनेसाठी अमरावती विभागातील सात लाख ९७ हजार ५६३ थकबाकीदार  व चालू दोन लाख असे एकूण १० लाख  शेतकरी पात्र आहेत. शासनाद्वारे जाहीर अटी व शर्तींनुसार किमान दोन लाख शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळू शकतो. यासाठी जिल्ह्यात २४ जुलैपासून सेतू, महाऑनलाईन, सीएससी व संग्राम केंद्रांवर कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज मोफत भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, योजनेच्या सुरूवातीपासूनच जवळपास महिनाभर सर्व्हर डाऊनची समस्या, आधार सुविधा नसलेल्या शेतक-यांसाठी असणारे बायोमेट्रिक डिव्हाईस कनेक्ट न होने, नेट कनेक्टीव्हीटी नसणे, केंद्रचालकांचे शेतकऱ्यांना असहकार्य आदी कारणांमुळे कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा बोजवारा उडाला.

विहित कालावधीत घट होत असल्याने शेतकऱ्यांची ई-सेवा केंद्रांवर मोठी गर्दी झाली. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने दिवसभरात अत्यल्प अर्ज भरले जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. परिणामी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांनी केंद्रांना भेटी देवून 'आपले सरकार’ यापोर्टल संदर्भात सीएमओ कार्यालयासी थेट संपर्क साधल्याने दोन दिवसांपासून सर्व्हरचा वेग वाढला आहे. सुटीच्या दिवशीदेखील केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश केंद्रचालकांना दिल्यामुळे सद्यस्थितीत चार लाख ७२ हजार ४१५  अर्ज अपलोड करण्यात आले आहेत.

अर्ज प्रक्रियेत यवतमाळ जिल्हा आघाडीवरविभागात २४ जुलैपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली. ३ तारखेपर्यंत 6 लाख 64 हजार,466 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्याच्या तुलनेत ४ लाख ७२ हजार ४१५ शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. यामध्ये सर्वाधिक 1 लाख ५१ हजार 846 अर्ज यवतमाळ, ९५,७४० अमरावती, ५६,१२५ बुलडाणा, ९२,३६७ वाशिम व ७६,७४० अर्ज अकोला जिल्ह्यात भरले गेले आहेत. रविवारपर्यंत राज्यात ५९,५७,९९१ शेतकºयांनी नोंदणी केली तर ४९,२३,८६६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत.

४.७२ लाख शेतकऱ्यांनी भरले ऑनलाईन अर्जविभागात सद्यस्थितीत चार लाख ७२ हजार ४१५ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. यामध्येही यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. येथील १,५१,८४६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. अमरावती ९५,३३७, अकोला ७६,७४०, बुलडाणा ५६,१२५ तसेच वाशिम जिल्ह्यात  ९२,३४७ अर्ज ३ सप्टेबरपर्यंत भरण्यात आले आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी