शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

अमरावती विभागात कर्जमाफी, प्रोत्साहन योजनेसाठी १० लाख शेतकरी पात्र; 7 लाख शेतकऱ्यांनी भरले ऑनलाइन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 16:57 IST

शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख मर्यादेतील कर्ज माफ केले आहे.

ठळक मुद्देशासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख मर्यादेतील कर्ज माफ केले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’मध्ये ३ सप्टेंबरपर्यत अमरावती विभागातील पात्र १० लाख शेतकऱ्यांपैकी 6 लाख ६५ हजार ४६६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. १५ तारखेच्या पात्र शेतकऱ्यांचे अर्ज भरणे शक्य नसल्याने योजनेला मुदतवाढ मिळणे महत्त्वाचे आहे. 

अमरावती, दि.5 - शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख मर्यादेतील कर्ज माफ केले आहे. यासाठीच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’मध्ये ३ सप्टेंबरपर्यत अमरावती विभागातील पात्र १० लाख शेतकऱ्यांपैकी 6 लाख ६५ हजार ४६६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यामध्ये चार लाख ७२ हजार ४१५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. मात्र, १५ तारखेच्या पात्र शेतकऱ्यांचे अर्ज भरणे शक्य नसल्याने योजनेला मुदतवाढ मिळणे महत्त्वाचे आहे. 

शासनाद्वारे जाहीर कर्जमाफी योजनेसाठी अमरावती विभागातील सात लाख ९७ हजार ५६३ थकबाकीदार  व चालू दोन लाख असे एकूण १० लाख  शेतकरी पात्र आहेत. शासनाद्वारे जाहीर अटी व शर्तींनुसार किमान दोन लाख शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळू शकतो. यासाठी जिल्ह्यात २४ जुलैपासून सेतू, महाऑनलाईन, सीएससी व संग्राम केंद्रांवर कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज मोफत भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, योजनेच्या सुरूवातीपासूनच जवळपास महिनाभर सर्व्हर डाऊनची समस्या, आधार सुविधा नसलेल्या शेतक-यांसाठी असणारे बायोमेट्रिक डिव्हाईस कनेक्ट न होने, नेट कनेक्टीव्हीटी नसणे, केंद्रचालकांचे शेतकऱ्यांना असहकार्य आदी कारणांमुळे कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा बोजवारा उडाला.

विहित कालावधीत घट होत असल्याने शेतकऱ्यांची ई-सेवा केंद्रांवर मोठी गर्दी झाली. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने दिवसभरात अत्यल्प अर्ज भरले जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. परिणामी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांनी केंद्रांना भेटी देवून 'आपले सरकार’ यापोर्टल संदर्भात सीएमओ कार्यालयासी थेट संपर्क साधल्याने दोन दिवसांपासून सर्व्हरचा वेग वाढला आहे. सुटीच्या दिवशीदेखील केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश केंद्रचालकांना दिल्यामुळे सद्यस्थितीत चार लाख ७२ हजार ४१५  अर्ज अपलोड करण्यात आले आहेत.

अर्ज प्रक्रियेत यवतमाळ जिल्हा आघाडीवरविभागात २४ जुलैपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली. ३ तारखेपर्यंत 6 लाख 64 हजार,466 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्याच्या तुलनेत ४ लाख ७२ हजार ४१५ शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. यामध्ये सर्वाधिक 1 लाख ५१ हजार 846 अर्ज यवतमाळ, ९५,७४० अमरावती, ५६,१२५ बुलडाणा, ९२,३६७ वाशिम व ७६,७४० अर्ज अकोला जिल्ह्यात भरले गेले आहेत. रविवारपर्यंत राज्यात ५९,५७,९९१ शेतकºयांनी नोंदणी केली तर ४९,२३,८६६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत.

४.७२ लाख शेतकऱ्यांनी भरले ऑनलाईन अर्जविभागात सद्यस्थितीत चार लाख ७२ हजार ४१५ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. यामध्येही यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. येथील १,५१,८४६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. अमरावती ९५,३३७, अकोला ७६,७४०, बुलडाणा ५६,१२५ तसेच वाशिम जिल्ह्यात  ९२,३४७ अर्ज ३ सप्टेबरपर्यंत भरण्यात आले आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी