शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात कर्जमाफी, प्रोत्साहन योजनेसाठी १० लाख शेतकरी पात्र; 7 लाख शेतकऱ्यांनी भरले ऑनलाइन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 16:57 IST

शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख मर्यादेतील कर्ज माफ केले आहे.

ठळक मुद्देशासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख मर्यादेतील कर्ज माफ केले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’मध्ये ३ सप्टेंबरपर्यत अमरावती विभागातील पात्र १० लाख शेतकऱ्यांपैकी 6 लाख ६५ हजार ४६६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. १५ तारखेच्या पात्र शेतकऱ्यांचे अर्ज भरणे शक्य नसल्याने योजनेला मुदतवाढ मिळणे महत्त्वाचे आहे. 

अमरावती, दि.5 - शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख मर्यादेतील कर्ज माफ केले आहे. यासाठीच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’मध्ये ३ सप्टेंबरपर्यत अमरावती विभागातील पात्र १० लाख शेतकऱ्यांपैकी 6 लाख ६५ हजार ४६६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यामध्ये चार लाख ७२ हजार ४१५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. मात्र, १५ तारखेच्या पात्र शेतकऱ्यांचे अर्ज भरणे शक्य नसल्याने योजनेला मुदतवाढ मिळणे महत्त्वाचे आहे. 

शासनाद्वारे जाहीर कर्जमाफी योजनेसाठी अमरावती विभागातील सात लाख ९७ हजार ५६३ थकबाकीदार  व चालू दोन लाख असे एकूण १० लाख  शेतकरी पात्र आहेत. शासनाद्वारे जाहीर अटी व शर्तींनुसार किमान दोन लाख शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळू शकतो. यासाठी जिल्ह्यात २४ जुलैपासून सेतू, महाऑनलाईन, सीएससी व संग्राम केंद्रांवर कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज मोफत भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, योजनेच्या सुरूवातीपासूनच जवळपास महिनाभर सर्व्हर डाऊनची समस्या, आधार सुविधा नसलेल्या शेतक-यांसाठी असणारे बायोमेट्रिक डिव्हाईस कनेक्ट न होने, नेट कनेक्टीव्हीटी नसणे, केंद्रचालकांचे शेतकऱ्यांना असहकार्य आदी कारणांमुळे कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा बोजवारा उडाला.

विहित कालावधीत घट होत असल्याने शेतकऱ्यांची ई-सेवा केंद्रांवर मोठी गर्दी झाली. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने दिवसभरात अत्यल्प अर्ज भरले जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. परिणामी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांनी केंद्रांना भेटी देवून 'आपले सरकार’ यापोर्टल संदर्भात सीएमओ कार्यालयासी थेट संपर्क साधल्याने दोन दिवसांपासून सर्व्हरचा वेग वाढला आहे. सुटीच्या दिवशीदेखील केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश केंद्रचालकांना दिल्यामुळे सद्यस्थितीत चार लाख ७२ हजार ४१५  अर्ज अपलोड करण्यात आले आहेत.

अर्ज प्रक्रियेत यवतमाळ जिल्हा आघाडीवरविभागात २४ जुलैपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली. ३ तारखेपर्यंत 6 लाख 64 हजार,466 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्याच्या तुलनेत ४ लाख ७२ हजार ४१५ शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. यामध्ये सर्वाधिक 1 लाख ५१ हजार 846 अर्ज यवतमाळ, ९५,७४० अमरावती, ५६,१२५ बुलडाणा, ९२,३६७ वाशिम व ७६,७४० अर्ज अकोला जिल्ह्यात भरले गेले आहेत. रविवारपर्यंत राज्यात ५९,५७,९९१ शेतकºयांनी नोंदणी केली तर ४९,२३,८६६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत.

४.७२ लाख शेतकऱ्यांनी भरले ऑनलाईन अर्जविभागात सद्यस्थितीत चार लाख ७२ हजार ४१५ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. यामध्येही यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. येथील १,५१,८४६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. अमरावती ९५,३३७, अकोला ७६,७४०, बुलडाणा ५६,१२५ तसेच वाशिम जिल्ह्यात  ९२,३४७ अर्ज ३ सप्टेबरपर्यंत भरण्यात आले आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी