आगीत गावंडगावातील १0 घरांची राखरांगोळी
By Admin | Updated: May 25, 2014 23:12 IST2014-05-25T23:12:15+5:302014-05-25T23:12:15+5:30
तालुक्यातील गावंडगाव येथील १0 घरे शनिवारी मध्यरात्री ३ वाजता भयंकर आगीच्या विळख्यात सापडलीत. यात घरातील धान्य, कपडे आणि इतर साहित्याची राखरांगोळी झाली. सुदैवाने या १0 घरांमधील ५0 स्त्री-पुरूष व

आगीत गावंडगावातील १0 घरांची राखरांगोळी
१0 घरांतील ५0 जण सुरक्षित : ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न, मदतीसाठी पुढे आले अनेक हात अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील गावंडगाव येथील १0 घरे शनिवारी मध्यरात्री ३ वाजता भयंकर आगीच्या विळख्यात सापडलीत. यात घरातील धान्य, कपडे आणि इतर साहित्याची राखरांगोळी झाली. सुदैवाने या १0 घरांमधील ५0 स्त्री-पुरूष व मुले बचावली. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी रात्री अंदाजे तीन वाजता घरांना आग लागल्याचे संबंधित कुटुंबाना समजले. अंधार आणि वार्याचा भयंकर जोर असल्यामुळे आगीचा अंदाज आला नाही. तरी ग्रामीण कुटुंबात असलेल्या इंधनाच्या साठवणुकीमुळे ही आग मोठय़ा प्रमाणावर पसरली. गावात हलकल्लोळ माजला व आगीत सापडलेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी ग्रामस्थांनी धाव घेऊन आजूबाजूच्या तुराट्या-पर्हाट्याच्या गंज्या बाजुला सारल्या. गावातील पाण्याच्या टाकीतील पाणी आगीवर ओतले. आगीत सापडलेल्या कुटुंबांनासुद्धा सुखरुप बाहेर काढण्यात आले. या आगीत मधुकर सखाराम ढोकणे, बाळकृष्ण सहदेव ढोकणे, बाबुलाल सहदेव ढोकणे, दिलीप नामदेव ढोकणे, अशोक नामदेव ढोकणे, पुष्पा श्रीराम ढोकणे, दादाराव सदाशिव ढोकणे, विठ्ठल रामदास मारबते व त्यांचे वडील रामदास मारबते यांची घरे जळून खाक झाली. घरातील संपूर्ण सामान, धान्य, कपडे जळून खाक झाले. आग विझविताना ईलेक्ट्रिकच्या सव्र्हीस लाईन जळून अंगावर पडण्याचा धोका असल्याने लाईन बंद करण्यात आली. दादाराव ढोकणे यांच्या दोन घरातील काहीही साहित्य शिल्लक राहिले नाही. त्यांच्या कपाटातील रोख रक्कम व सोने आगीत भस्मसात झाले. अंजनगाव सुर्जी, अचलपूर येथील अग्निशमन दलांनी आग विझविण्यास मदत केली. महसूल प्रशासनाने पंचवीस लाख रूपयांच्या हानीचा अंदाज वर्तविला आहे. तातडीची मदत म्हणून प्रत्येक कुटुंबास धान्य व रॉकेल दिले आहे. आमदार अडसूळ यांचे खासगी स्वीय सहायक रुपेश गणात्रा यांनी ७0 टिनांची तातडीची मदत आपादग्रस्तांना दिली. घटनास्थळी शिवसेनेचे बाळासाहेब हिंगणीकर, विजय होटे, विकास येवले व माजी सभापती नंदकिशोर काळे, रिपाइंचे बळवंत वानखडे यांनी भेटी दिल्या. रहिमापूरचे ठाणेदार संजय सोळंके हे गावकर्यांना धीर देण्यासाठी पूर्णवेळ उपस्थित होते. अंजनगाव, पथ्रोट, येवदा पोलीस पथकांनीसुध्दा भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)