शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

होय.. माझ्या भूमिकेला बंडही समजू शकता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:47 IST

अकोला : देशातील जनता, शेतकरी, बेरोजगांराना जी स्वप्न  दाखविली होती, त्यात सपशेल अपयशी ठरलो आहोत. शे तकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असताना शासनाकडून  कुचेष्टा होत असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली.  या सर्वांनी ज्या जबाबदारीने मला लोकसभेत पाठविले आहे;  परंतु त्यांच्या आश्‍वासनाची पूर्तता होत नसल्याचे चित्र दिसत  असल्याने मला मैदानात उतरावे लागले. त्याला तुम्ही बंड  म्हणत असाल, तर म्हणू शकता, अशी परखड भूमिका चंद्र पूरचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी रविवारी येथे  ‘लोकमत’शी बोलताना घेतली.

ठळक मुद्देखासदार नाना पटोले यांची परखड भूमिकानारायण राणेंचे बंड पदासाठी, माझे जनतेच्या भल्यासाठी!

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशातील जनता, शेतकरी, बेरोजगांराना जी स्वप्न  दाखविली होती, त्यात सपशेल अपयशी ठरलो आहोत. शे तकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असताना शासनाकडून  कुचेष्टा होत असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली.  या सर्वांनी ज्या जबाबदारीने मला लोकसभेत पाठविले आहे;  परंतु त्यांच्या आश्‍वासनाची पूर्तता होत नसल्याचे चित्र दिसत  असल्याने मला मैदानात उतरावे लागले. त्याला तुम्ही बंड  म्हणत असाल, तर म्हणू शकता, अशी परखड भूमिका चंद्र पूरचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी रविवारी येथे  ‘लोकमत’शी बोलताना घेतली.शेतकरी जागर मंचाच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्याला  उपस्थित राहण्यासाठी खासदार पटोले अकोला येथे आले  होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना त्यांची भूमिका  परखडपणे मांडली. आम्ही जनतेमध्ये अनेक आश्‍वासने  दिली होती. काळे धन आणणार; पण ते आले नाही.  नोटाबंदीला जनतेने स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला; पण जे स्व प्न दाखविले, ते पूर्ण झालेच नाही. नंतर जीएसटी आल्यामुळे  एकट्या महाराष्ट्रातील पाच हजार उद्योग बंद पडले.  बेरोजगारी पराकोटीला गेली आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या  वाढत आहेत; पण कर्जमाफीचा निर्णय घेताना शासनाच्या  नवनवीन बोटचेपे धोरणामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजीचा  सूर आहे. देशात २५0 जिल्हय़ांत दुष्काळी स्थिती असून,  १५0 जिल्हे पाण्याखाली आहेत. विदर्भ, मराठवाडा,  महाराष्ट्रात हेच चित्र आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे.  त्यांचे प्रश्न घेऊन मी मैदानात उतरलो असून, पंतप्रधान,  पक्षप्रमुख यांना काय वाटते ते वाटू द्या, मी मात्र माझा लढा  सुरू च ठेवणार असून, लोकसभेत याचा जाबही अर्थमंत्र्यांना  विचारणार असल्याचे ते म्हणाले. २५ सप्टेंबरपासून दिल्लीत  पक्ष कार्यकारिणीची बैठक आहे. या बैठकीला तुम्ही जाणार  का, या प्रश्नादाखल त्यांनी आपण जाणार नसल्याचे सांगि तले. मतदारसंघात अनंत कामे असून, दुर्गा महोत्सवही  आहे. त्यामुळे मला सध्या येथे राहणे महत्त्वाचे वाटते, असेही  ते म्हणाले. तुमच्या या चळवळीत पक्षातील कोण कोण  आहे, यावर त्यांनी बरेच जण सोबत असल्याचे अधोरेखित  केले. मी बोलल्यानंतर अनेक जण आता बोलू लागल्याचेही  त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आगामी काळात राज्यात शेती,  शेतमूजर, बेरोजगारांचे प्रश्न घेऊन लढणार आहोत. तद्व तच वैचारिक परिवर्तनासाठी आपण नव्याने प्रयत्न करणार  असून, एकोपा कसा निर्माण करता येईल, यासाठीचे प्रयत्न  करणार असल्याचे ते म्हणाले.