शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

होय.. माझ्या भूमिकेला बंडही समजू शकता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:47 IST

अकोला : देशातील जनता, शेतकरी, बेरोजगांराना जी स्वप्न  दाखविली होती, त्यात सपशेल अपयशी ठरलो आहोत. शे तकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असताना शासनाकडून  कुचेष्टा होत असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली.  या सर्वांनी ज्या जबाबदारीने मला लोकसभेत पाठविले आहे;  परंतु त्यांच्या आश्‍वासनाची पूर्तता होत नसल्याचे चित्र दिसत  असल्याने मला मैदानात उतरावे लागले. त्याला तुम्ही बंड  म्हणत असाल, तर म्हणू शकता, अशी परखड भूमिका चंद्र पूरचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी रविवारी येथे  ‘लोकमत’शी बोलताना घेतली.

ठळक मुद्देखासदार नाना पटोले यांची परखड भूमिकानारायण राणेंचे बंड पदासाठी, माझे जनतेच्या भल्यासाठी!

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशातील जनता, शेतकरी, बेरोजगांराना जी स्वप्न  दाखविली होती, त्यात सपशेल अपयशी ठरलो आहोत. शे तकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असताना शासनाकडून  कुचेष्टा होत असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली.  या सर्वांनी ज्या जबाबदारीने मला लोकसभेत पाठविले आहे;  परंतु त्यांच्या आश्‍वासनाची पूर्तता होत नसल्याचे चित्र दिसत  असल्याने मला मैदानात उतरावे लागले. त्याला तुम्ही बंड  म्हणत असाल, तर म्हणू शकता, अशी परखड भूमिका चंद्र पूरचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी रविवारी येथे  ‘लोकमत’शी बोलताना घेतली.शेतकरी जागर मंचाच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्याला  उपस्थित राहण्यासाठी खासदार पटोले अकोला येथे आले  होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना त्यांची भूमिका  परखडपणे मांडली. आम्ही जनतेमध्ये अनेक आश्‍वासने  दिली होती. काळे धन आणणार; पण ते आले नाही.  नोटाबंदीला जनतेने स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला; पण जे स्व प्न दाखविले, ते पूर्ण झालेच नाही. नंतर जीएसटी आल्यामुळे  एकट्या महाराष्ट्रातील पाच हजार उद्योग बंद पडले.  बेरोजगारी पराकोटीला गेली आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या  वाढत आहेत; पण कर्जमाफीचा निर्णय घेताना शासनाच्या  नवनवीन बोटचेपे धोरणामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजीचा  सूर आहे. देशात २५0 जिल्हय़ांत दुष्काळी स्थिती असून,  १५0 जिल्हे पाण्याखाली आहेत. विदर्भ, मराठवाडा,  महाराष्ट्रात हेच चित्र आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे.  त्यांचे प्रश्न घेऊन मी मैदानात उतरलो असून, पंतप्रधान,  पक्षप्रमुख यांना काय वाटते ते वाटू द्या, मी मात्र माझा लढा  सुरू च ठेवणार असून, लोकसभेत याचा जाबही अर्थमंत्र्यांना  विचारणार असल्याचे ते म्हणाले. २५ सप्टेंबरपासून दिल्लीत  पक्ष कार्यकारिणीची बैठक आहे. या बैठकीला तुम्ही जाणार  का, या प्रश्नादाखल त्यांनी आपण जाणार नसल्याचे सांगि तले. मतदारसंघात अनंत कामे असून, दुर्गा महोत्सवही  आहे. त्यामुळे मला सध्या येथे राहणे महत्त्वाचे वाटते, असेही  ते म्हणाले. तुमच्या या चळवळीत पक्षातील कोण कोण  आहे, यावर त्यांनी बरेच जण सोबत असल्याचे अधोरेखित  केले. मी बोलल्यानंतर अनेक जण आता बोलू लागल्याचेही  त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आगामी काळात राज्यात शेती,  शेतमूजर, बेरोजगारांचे प्रश्न घेऊन लढणार आहोत. तद्व तच वैचारिक परिवर्तनासाठी आपण नव्याने प्रयत्न करणार  असून, एकोपा कसा निर्माण करता येईल, यासाठीचे प्रयत्न  करणार असल्याचे ते म्हणाले.