शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

होय.. माझ्या भूमिकेला बंडही समजू शकता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:47 IST

अकोला : देशातील जनता, शेतकरी, बेरोजगांराना जी स्वप्न  दाखविली होती, त्यात सपशेल अपयशी ठरलो आहोत. शे तकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असताना शासनाकडून  कुचेष्टा होत असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली.  या सर्वांनी ज्या जबाबदारीने मला लोकसभेत पाठविले आहे;  परंतु त्यांच्या आश्‍वासनाची पूर्तता होत नसल्याचे चित्र दिसत  असल्याने मला मैदानात उतरावे लागले. त्याला तुम्ही बंड  म्हणत असाल, तर म्हणू शकता, अशी परखड भूमिका चंद्र पूरचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी रविवारी येथे  ‘लोकमत’शी बोलताना घेतली.

ठळक मुद्देखासदार नाना पटोले यांची परखड भूमिकानारायण राणेंचे बंड पदासाठी, माझे जनतेच्या भल्यासाठी!

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशातील जनता, शेतकरी, बेरोजगांराना जी स्वप्न  दाखविली होती, त्यात सपशेल अपयशी ठरलो आहोत. शे तकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असताना शासनाकडून  कुचेष्टा होत असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली.  या सर्वांनी ज्या जबाबदारीने मला लोकसभेत पाठविले आहे;  परंतु त्यांच्या आश्‍वासनाची पूर्तता होत नसल्याचे चित्र दिसत  असल्याने मला मैदानात उतरावे लागले. त्याला तुम्ही बंड  म्हणत असाल, तर म्हणू शकता, अशी परखड भूमिका चंद्र पूरचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी रविवारी येथे  ‘लोकमत’शी बोलताना घेतली.शेतकरी जागर मंचाच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्याला  उपस्थित राहण्यासाठी खासदार पटोले अकोला येथे आले  होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना त्यांची भूमिका  परखडपणे मांडली. आम्ही जनतेमध्ये अनेक आश्‍वासने  दिली होती. काळे धन आणणार; पण ते आले नाही.  नोटाबंदीला जनतेने स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला; पण जे स्व प्न दाखविले, ते पूर्ण झालेच नाही. नंतर जीएसटी आल्यामुळे  एकट्या महाराष्ट्रातील पाच हजार उद्योग बंद पडले.  बेरोजगारी पराकोटीला गेली आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या  वाढत आहेत; पण कर्जमाफीचा निर्णय घेताना शासनाच्या  नवनवीन बोटचेपे धोरणामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजीचा  सूर आहे. देशात २५0 जिल्हय़ांत दुष्काळी स्थिती असून,  १५0 जिल्हे पाण्याखाली आहेत. विदर्भ, मराठवाडा,  महाराष्ट्रात हेच चित्र आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे.  त्यांचे प्रश्न घेऊन मी मैदानात उतरलो असून, पंतप्रधान,  पक्षप्रमुख यांना काय वाटते ते वाटू द्या, मी मात्र माझा लढा  सुरू च ठेवणार असून, लोकसभेत याचा जाबही अर्थमंत्र्यांना  विचारणार असल्याचे ते म्हणाले. २५ सप्टेंबरपासून दिल्लीत  पक्ष कार्यकारिणीची बैठक आहे. या बैठकीला तुम्ही जाणार  का, या प्रश्नादाखल त्यांनी आपण जाणार नसल्याचे सांगि तले. मतदारसंघात अनंत कामे असून, दुर्गा महोत्सवही  आहे. त्यामुळे मला सध्या येथे राहणे महत्त्वाचे वाटते, असेही  ते म्हणाले. तुमच्या या चळवळीत पक्षातील कोण कोण  आहे, यावर त्यांनी बरेच जण सोबत असल्याचे अधोरेखित  केले. मी बोलल्यानंतर अनेक जण आता बोलू लागल्याचेही  त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आगामी काळात राज्यात शेती,  शेतमूजर, बेरोजगारांचे प्रश्न घेऊन लढणार आहोत. तद्व तच वैचारिक परिवर्तनासाठी आपण नव्याने प्रयत्न करणार  असून, एकोपा कसा निर्माण करता येईल, यासाठीचे प्रयत्न  करणार असल्याचे ते म्हणाले.