शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

होय.. माझ्या भूमिकेला बंडही समजू शकता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:47 IST

अकोला : देशातील जनता, शेतकरी, बेरोजगांराना जी स्वप्न  दाखविली होती, त्यात सपशेल अपयशी ठरलो आहोत. शे तकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असताना शासनाकडून  कुचेष्टा होत असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली.  या सर्वांनी ज्या जबाबदारीने मला लोकसभेत पाठविले आहे;  परंतु त्यांच्या आश्‍वासनाची पूर्तता होत नसल्याचे चित्र दिसत  असल्याने मला मैदानात उतरावे लागले. त्याला तुम्ही बंड  म्हणत असाल, तर म्हणू शकता, अशी परखड भूमिका चंद्र पूरचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी रविवारी येथे  ‘लोकमत’शी बोलताना घेतली.

ठळक मुद्देखासदार नाना पटोले यांची परखड भूमिकानारायण राणेंचे बंड पदासाठी, माझे जनतेच्या भल्यासाठी!

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशातील जनता, शेतकरी, बेरोजगांराना जी स्वप्न  दाखविली होती, त्यात सपशेल अपयशी ठरलो आहोत. शे तकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असताना शासनाकडून  कुचेष्टा होत असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली.  या सर्वांनी ज्या जबाबदारीने मला लोकसभेत पाठविले आहे;  परंतु त्यांच्या आश्‍वासनाची पूर्तता होत नसल्याचे चित्र दिसत  असल्याने मला मैदानात उतरावे लागले. त्याला तुम्ही बंड  म्हणत असाल, तर म्हणू शकता, अशी परखड भूमिका चंद्र पूरचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी रविवारी येथे  ‘लोकमत’शी बोलताना घेतली.शेतकरी जागर मंचाच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्याला  उपस्थित राहण्यासाठी खासदार पटोले अकोला येथे आले  होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना त्यांची भूमिका  परखडपणे मांडली. आम्ही जनतेमध्ये अनेक आश्‍वासने  दिली होती. काळे धन आणणार; पण ते आले नाही.  नोटाबंदीला जनतेने स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला; पण जे स्व प्न दाखविले, ते पूर्ण झालेच नाही. नंतर जीएसटी आल्यामुळे  एकट्या महाराष्ट्रातील पाच हजार उद्योग बंद पडले.  बेरोजगारी पराकोटीला गेली आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या  वाढत आहेत; पण कर्जमाफीचा निर्णय घेताना शासनाच्या  नवनवीन बोटचेपे धोरणामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजीचा  सूर आहे. देशात २५0 जिल्हय़ांत दुष्काळी स्थिती असून,  १५0 जिल्हे पाण्याखाली आहेत. विदर्भ, मराठवाडा,  महाराष्ट्रात हेच चित्र आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे.  त्यांचे प्रश्न घेऊन मी मैदानात उतरलो असून, पंतप्रधान,  पक्षप्रमुख यांना काय वाटते ते वाटू द्या, मी मात्र माझा लढा  सुरू च ठेवणार असून, लोकसभेत याचा जाबही अर्थमंत्र्यांना  विचारणार असल्याचे ते म्हणाले. २५ सप्टेंबरपासून दिल्लीत  पक्ष कार्यकारिणीची बैठक आहे. या बैठकीला तुम्ही जाणार  का, या प्रश्नादाखल त्यांनी आपण जाणार नसल्याचे सांगि तले. मतदारसंघात अनंत कामे असून, दुर्गा महोत्सवही  आहे. त्यामुळे मला सध्या येथे राहणे महत्त्वाचे वाटते, असेही  ते म्हणाले. तुमच्या या चळवळीत पक्षातील कोण कोण  आहे, यावर त्यांनी बरेच जण सोबत असल्याचे अधोरेखित  केले. मी बोलल्यानंतर अनेक जण आता बोलू लागल्याचेही  त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आगामी काळात राज्यात शेती,  शेतमूजर, बेरोजगारांचे प्रश्न घेऊन लढणार आहोत. तद्व तच वैचारिक परिवर्तनासाठी आपण नव्याने प्रयत्न करणार  असून, एकोपा कसा निर्माण करता येईल, यासाठीचे प्रयत्न  करणार असल्याचे ते म्हणाले.