शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचित ठेवण्याचे धोरण चुकीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 16:31 IST

शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचीत ठेवण्याचे सरकारचे उफराटे धोरण चुकीचे आहे, अशा शब्दात शेतकरी संघटनेने केंद्रीय गृह व रसायन मंत्री हंसराज यांच्या कडे शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देशेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला येथे आलेल्या ना.हंसराज अहीर यांना एक निवेदन सादर करून शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या. बीटी ट्रायल्स वर बंदी आणताना कुठलेही ठोस निष्कर्ष सरकार ला आजतागायत देता आल्या नाहीत.

अकोला : श्रम, बुद्धी, गुंतवणुकीच्या बळावर धोका पत्करून संपत्तीचे सृजन करणारा शेतकरी स्वत:च आपले उत्पन्न वाढवतो व देशाच्या संपत्तीतही भर घालत असतो फक्त सरकारने त्याच्या तंत्रज्ञान व बाजारपेठाच्या मागार्तील अडसर दूर करावे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचीत ठेवण्याचे सरकारचे उफराटे धोरण चुकीचे आहे, अशा शब्दात शेतकरी संघटनेने केंद्रीय गृह व रसायन मंत्री हंसराज यांच्याकडे  शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या.शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला येथे आलेल्या केंद्रीय गृह व रसायन राज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांना एक निवेदन सादर करून त्यांच्या मार्फत केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या. शेती हा देशाचा मुख्य प्राथमीक व्यवसाय असून देशातील ६०% जनसंख्या कृषीवर अवलंबून असतांना जागतीक परिवेशामध्ये भारतीय शेतकरी अद्यावत तंत्रज्ञानाशिवाय स्पर्धेमध्ये कसा टीकेल हा मोठा प्रश्न सरकारच्या तंत्रज्ञान विरोधी धोरणांमुळे उदभवला आहे. नुकत्याच झालेल्या हंगामात गुलाबी बोन्ड अळी च्या प्रादुभार्वा ने ४५% एवढे उत्पादनाचे नुकसान झाले. कीटकनाशकांवर मोठा खर्च होऊन आर्थीक नुकसाना मुळे शेतकऱ्यांमध्ये आलेल्या उद्विग्नतेला जबाबदार कोण? या वर आत्मचिंतन होणे गरजेचे आहे.सरकारच्या तंत्रज्ञान विरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी स्पर्धाक्षम होण्यास अडसर निर्माण झाला आहे. बीटी ट्रायल्स वर बंदी आणताना कुठलेही ठोस निष्कर्ष सरकार ला आजतागायत देता आल्या नाहीत. जगातील अनेक प्रगत देशांत बीटी चे अद्यावत तंत्रज्ञान वापरत असल्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमालीचा घटला उत्पादकताही प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत जनसंख्येचा मोठा हिस्सा शेतीवर अवलंबून असलेल्या आपल्या देशात शेतकºयांना तंत्रज्ञानापासून वंचीत ठेवण्या चे उफराटे धोरण चुकीचे आहे, अशा भावना शेतकरी संघटनेने केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या मार्फत सरकारला कळविल्या. यावेळी सोशल मेडिया प्रमुख विलास ताथोड, युवा आघाडी विदर्भ प्रमुख डॉ.निलेश पाटील,शेतकरी संघटना प.विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा,जिल्हा प्रमुख अविनाश नाकट उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीHansraj Ahirहंसराज अहिर