शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचित ठेवण्याचे धोरण चुकीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 16:31 IST

शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचीत ठेवण्याचे सरकारचे उफराटे धोरण चुकीचे आहे, अशा शब्दात शेतकरी संघटनेने केंद्रीय गृह व रसायन मंत्री हंसराज यांच्या कडे शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देशेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला येथे आलेल्या ना.हंसराज अहीर यांना एक निवेदन सादर करून शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या. बीटी ट्रायल्स वर बंदी आणताना कुठलेही ठोस निष्कर्ष सरकार ला आजतागायत देता आल्या नाहीत.

अकोला : श्रम, बुद्धी, गुंतवणुकीच्या बळावर धोका पत्करून संपत्तीचे सृजन करणारा शेतकरी स्वत:च आपले उत्पन्न वाढवतो व देशाच्या संपत्तीतही भर घालत असतो फक्त सरकारने त्याच्या तंत्रज्ञान व बाजारपेठाच्या मागार्तील अडसर दूर करावे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचीत ठेवण्याचे सरकारचे उफराटे धोरण चुकीचे आहे, अशा शब्दात शेतकरी संघटनेने केंद्रीय गृह व रसायन मंत्री हंसराज यांच्याकडे  शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या.शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला येथे आलेल्या केंद्रीय गृह व रसायन राज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांना एक निवेदन सादर करून त्यांच्या मार्फत केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या. शेती हा देशाचा मुख्य प्राथमीक व्यवसाय असून देशातील ६०% जनसंख्या कृषीवर अवलंबून असतांना जागतीक परिवेशामध्ये भारतीय शेतकरी अद्यावत तंत्रज्ञानाशिवाय स्पर्धेमध्ये कसा टीकेल हा मोठा प्रश्न सरकारच्या तंत्रज्ञान विरोधी धोरणांमुळे उदभवला आहे. नुकत्याच झालेल्या हंगामात गुलाबी बोन्ड अळी च्या प्रादुभार्वा ने ४५% एवढे उत्पादनाचे नुकसान झाले. कीटकनाशकांवर मोठा खर्च होऊन आर्थीक नुकसाना मुळे शेतकऱ्यांमध्ये आलेल्या उद्विग्नतेला जबाबदार कोण? या वर आत्मचिंतन होणे गरजेचे आहे.सरकारच्या तंत्रज्ञान विरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी स्पर्धाक्षम होण्यास अडसर निर्माण झाला आहे. बीटी ट्रायल्स वर बंदी आणताना कुठलेही ठोस निष्कर्ष सरकार ला आजतागायत देता आल्या नाहीत. जगातील अनेक प्रगत देशांत बीटी चे अद्यावत तंत्रज्ञान वापरत असल्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमालीचा घटला उत्पादकताही प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत जनसंख्येचा मोठा हिस्सा शेतीवर अवलंबून असलेल्या आपल्या देशात शेतकºयांना तंत्रज्ञानापासून वंचीत ठेवण्या चे उफराटे धोरण चुकीचे आहे, अशा भावना शेतकरी संघटनेने केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या मार्फत सरकारला कळविल्या. यावेळी सोशल मेडिया प्रमुख विलास ताथोड, युवा आघाडी विदर्भ प्रमुख डॉ.निलेश पाटील,शेतकरी संघटना प.विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा,जिल्हा प्रमुख अविनाश नाकट उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीHansraj Ahirहंसराज अहिर