सफाई कर्मचार्‍यांचे आजपासून कामबंद आंदोलन

By Admin | Updated: June 25, 2014 02:40 IST2014-06-25T02:35:48+5:302014-06-25T02:40:18+5:30

सुसूत्रतेसाठी महापालिका प्रशासनाने घेतला बदल्यांचा निर्णय.

Workers' movement today from today | सफाई कर्मचार्‍यांचे आजपासून कामबंद आंदोलन

सफाई कर्मचार्‍यांचे आजपासून कामबंद आंदोलन

अकोला : झोननिहाय बदल्यांना विरोध करीत सफाई कर्मचार्‍यांनी मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसले. उद्या, बुधवारपासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.
शहरातील स्वच्छतेची समस्या मार्गी लागण्यासाठी महापालिका प्रशासनाने सफाई कर्मचार्‍यांच्या झोननिहाय नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला अखिल भारतीय सफाई मजदूर कॉँग्रेसने विरोध केला. पूर्वसूचना अथवा चर्चा न करताच मनपाने ७४0 सफाई कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सफाई कर्मचारी विजयनगर, शिवाजीनगर, बापूरनगर, चवरे प्लॉट, खदान या भागात राहतात. बदल्यांमुळे त्यांना संबंधित वॉर्डात जाणे व येण्यासाठी रोज ४0 रुपये खर्च येणार आहे.
लवकरच शाळ सुरू होणार आहे. बदल्यांमुळे महिलांना लवकर घराबाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल, असाही दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे या बदल्या रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉँग्रेसने चे प्रदेश महामंत्री पी.बी. भातकुले, जिल्हाध्यक्ष शांताराम यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. दरम्यान सफाई कामगारांनी कर्मचार्‍यांनी बदली झालेल्या ठिकाणी रुजू व्हावे असे आवाहन महापौर ज्योत्स्ना गवई व उपमहापौर रफिक सिद्दिकी यांनी केले आहे. बदली निर्णय हा महापालिका प्रशासनाने स्वच्छतेकरिता घेतला आहे.

*सफाई कर्मचार्‍यांवर होतो १ कोटी १३ लाख खर्च
मनपामध्ये ४ हजार २७२ कर्मचारी असून, यामध्ये ७४८ सफाई कर्मचार्‍यांचा समावेश आहे. सफाई कर्मचार्‍यांच्या वेतनापोटी १ कोटी १३ लाख मनपाला मोजावे लागतात. असे असतानाही शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग पडलेले असतात आणि नाल्याही प्रचंड तुंबलेल्या असतात. अनेक कर्मचारी वेळेवर कामावर येत नाहीत. तसेच काही जण तर गैरहजर असतात, असा आरोप नगरसेवकांमधून नेहमीच होतो.

Web Title: Workers' movement today from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.