शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भारत- पाक युध्दाचा साक्षीदार अकोल्यात

By admin | Published: December 16, 2014 1:05 AM

स्वतंत्र बांगलादेशसाठी झालेल्या युद्धाला ४३ वर्ष पूर्ण.

नरेंद्र बेलसरे/ अकोला बांगलादेशच्या निर्मितीसाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या सोळा दिवसाच्या युध्दाला मंगळवार, १६ डिसेंबर रोजी ४३ वर्ष पूर्ण होत आहेत. दोन्ही बाजुंनी तुफान गोळीबार, छिन्नविछीन्न झालेल्या मृतदेहांचे खच आणि अपरिमित हानी स्वत:च्या डोळय़ांनी पाहणारा या युद्धाचा साक्षीदार अकोला जिल्ह्यातील अंदुरा येथे वास्तव्यास आहे. स्वतंत्र बांगलादेशसाठी झालेल्या युद्धाला ४३ वर्षे पूर्ण झाली असली तरी, अंदुरा येथील माजी सैनिक नारायणराव साबळे यांचे डोळे युद्धाचे स्मरण झाले की, लगेच पाणावतात. आपल्या अकरा साथीदारांचे मृतदेह उचलण्याची दुर्देवी वेळ माझ्यावर यावी, यापेक्षा दुसरे दुर्देव कोणते, अशा शब्दात त्यांनी अश्रुंना वाट मोकळी करू न दिली. या युध्दात प्रत्यक्ष सहभागी झालेले नारायणराव साबळे यांच्या माहितीनुसार, ३ ते १६ डिसेंबरदरम्यान झालेल्या युध्दात, तसेच तत्पूर्वी पाकिस्तान व बांगलादेशात उद्भवलेल्या परिस्थितीत १५ लाखापेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या युध्दात भारताचे ३ हजार ८४३ जवान शहीद झाले होते.या युध्दात प्राणाची बाजी लावणार्‍या मराठा बटालियनमध्ये नारायण साबळे यांचाही सहभाग होता. या बटालियनमधील लान्स नायक नारायण फाळके, यशवंत पवार, लक्ष्मण राणे, प्रभाकर काटकर, गजानन चव्हाण, मनगुटकर, बळवंत पाटील, तयप्पा नरवाडे, पी.एस.पाटील, दत्ता दळवी, मारोती जाधव आणि अशोक यादव यांना या युद्धात विरगती प्राप्त झाली. सैन्यातून परतल्यानंतर साबळे यांनी पोलिस दलात नोकरी केली. पोलिस दलातून सेवानवृत्त झाल्यानंतर, त्यांनी शेतीकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. अंदुरा येथे स्वत:च्या कुटुंबासोबत राहणार्‍या साबळेंप्रती ग्रामस्थांमध्ये आदराची भावना आहे. *५४ सैनिक आजही बेपत्ता.युध्दसमाप्तीनंतरही भारताचे ५४ जवान आणि अधिकारी आजही बेपत्ता आहेत. भारताचे जवान आपल्या ताब्यात नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. या ५४ सैनिकांच्या कुटुंबांना सरकारकडून नवृत्ती वेतन दिले जात आहे.