शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी पूरक पाऊस होईल का ? :  भिन्न अंदाजाने शेतकरी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:03 IST

अकोला: राज्यात पावसाचे प्रमाण घटले आहे.अलिकडच्या काही वर्षात हे प्रमाण प्रकर्षाने जानवू लागले.विदर्भात तर पावसाचे सरासरी प्रमाण घटले.

- राजरत्न सिरसाट

अकोला: राज्यात पावसाचे प्रमाण घटले आहे.अलिकडच्या काही वर्षात हे प्रमाण प्रकर्षाने जानवू लागले.विदर्भात तर पावसाचे सरासरी प्रमाण घटले. अशातच पावसाचे भाकीत करणाऱ्या यंत्रणाचे अंदाज चुकले.या सर्व परिस्थितीचा सामना करताना शेतकरी मात्र त्रस्त आहे.यातून मार्ग तर काढावाच लागणार आहे.जलपूर्नभरण,संवर्धन या गोष्टी शास्त्रशुध्द पध्दतीने करताना,पावसाचा प्रत्येक थेंब शेतात कसे जिरवता येईल.यासाठीचे शेतकऱ्यांचे गाव,बांधावर जावून तांत्रिक माहिती देणे आता अत्यंत गरजेचे आहे.कृषी शास्त्रज्ञ,तज्ज्ञांनी पाणी अडविण्यासाठी केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी आवश्यक आहे.डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कंटूर,उताराला आडवी पेरणी,असे अनेक प्रयोग करता येतील. असे असले तरी या प्रश्नाची व्याप्ती बरीच मोठी आहे. त्यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा', जलपुनर्भरण' यांसारख्या योजनांच्या अंमलबजावणीवर सातत्याने भर द्यावा लागणार आहे. विशेषत: चांगला पाऊस होतो, त्या वेळी अधिक प्रमाणात पाणी अडवले जायला हवे. त्यासाठी पाणीसाठवण क्षमतेत वाढ करणे गरजेचे आहे. या संदर्भात आॅस्ट्रेलियाचे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. त्या देशाने नदीतून वाहून जाणाºया पाण्याच्या दीडपट साठवणक्षमता निर्माण केली आहे. आपल्याकडे मात्र ही क्षमता वाहून जाणाº्या पाण्याच्या अवघी ४० टक्के इतकी आहे. आणखी एक बाब म्हणजे पाण्याच्या नेमक्या उपलब्धतेविषयी लोकांना नोव्हेंबरमध्येच कल्पना दिली जायला हवी. म्हणजे पाण्याच्या काटेकोर नियोजनाला लवकर सुरवात करता येईल. त्यातून पाण्याची बचत होत राहील. परिणामी, ऐन फेब्रुवारी-मार्च महिन्यात तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होणे टाळता येईल. या शिवाय उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्यापर्यंतच्या कालावधीतील पाणीवाटपाचे नियोजन करायला हवे. पण तसे न होता तहान लागल्यावर विहीर खणणे' या उक्तीनुसार मार्च-एप्रिलमध्ये जाग येऊन पाणीवापराच्या नियोजनाचे प्रयत्न सुरू होतात; पण ते प्रभावी ठरत नाहीत, असेच दिसते.याशिवाय भूजल पातळी किती आहे, त्यातील किती पाण्याचा उपसा उन्हाळ्यात करावा लागणार आहे, याचेही गणित लक्षात घ्यायला हवे. मुख्य म्हणजे साºयांनीच पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचा काटकसरीने आणि संयमाने वापर करायला हवा.

- पाण्याचे काटेकोर नियोजन करताना,शेतीची बांधबदीस्ती,राण बांधणी करणे अंत्यत आवशक आहे. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब शेतात जिरवण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारशींचा अवलंब करणे तेवढेच क्रमप्राप्त आहे.डॉ. सुभाष टाले,माजी विभागप्रमुख,मृद व जलसंधारण,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

विदर्भातील चित्र बघितल्यास पाऊस आलाच तर प्रंचड वेगाने पडतो.संपूर्ण मान्सूनचा अर्धा पाऊस १६ ते १८ तासात होतो.प्रचंड वेगाने पडणारा पाऊस त्याच वेगाने वाहून जातो, हा पाऊस वाहूनच जात नाही तर सुपीक शेतातील महत्वाची १६ सुक्ष्म अन्नद्रव्य वाहून नेतो,मातीचे वाहून जाण्याचे प्रमाणही प्रचंड आहे. या सर्व परिस्थिती कडे गार्भींयाने बघताना,आता कृती करण्याची गरज आहे.

- अलिकडच्या काही वर्षात मान्सूनचे अंदाज चुकलेदेशातील,राज्यातील शेतकरी ‘ई-शेती‘ची कास धरीत आहेत.अनेक गावात संगणक प्रणाली लावण्यात आली .शेती विकास वेगाने होत आहे पण पावसाची अनिश्चिततेमुळे शेतकºयांचा भ्रमनिरास होत आहे. पावसाच्या पडणाºया पावसाचे नियोजन नसल्याने भूगर्भ पातळी घटली.जमिनही पाणी नसल्याने या सर्व आधुनिक पध्दतीने करण्यात येणाºया शेतीवरही संकट आले. पावसाचे अंदाजही अलिकडे चुकल्याने शेतकरी सैरभैर झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMonsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरी