शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

या वर्षी तुरीचे शासकीय खरेदी केंद्र सुरू होतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 20:52 IST

-राजरत्न सिरसाट अकोला : तूर उत्पादन आता काढणीला येणार आहे. बाजारात सध्या तुरीचे प्रतिक्ंिवटल दर ४,४०० रुपये आहेत. हमीदरापेक्षा ...

-राजरत्न सिरसाटअकोला : तूर उत्पादन आता काढणीला येणार आहे. बाजारात सध्या तुरीचे प्रतिक्ंिवटल दर ४,४०० रुपये आहेत. हमीदरापेक्षा हे दर कमी आहेत. म्हणूनच यावर्षी तरी हंगामापूर्वी शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू होतील का, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. एकूणच मागचा अनुभव बघता, सध्यातरी खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली दिसत नाहीत. २०१३-१४ मध्ये तुरीचे दर गगनाला भिडले होते. म्हणून कृषी विभागाने त्यानंतर कडधान्य, तूर लागवडीवर भर दिला. चार वर्षांपूर्वी १२० ते १६० रुपये किलोग्रामपर्यंत तुरीच्या डाळीचे दर पोहोचले होते.तुरीचे दरही वधारले होते. कृषी विभागाने तुरीच्या लागवडीसंदर्भात शेतकºयांच्या केलेल्या प्रबोधनानंतर २०१६-१७ मध्ये तुरीचे बंपर उत्पादन झाले; पण शासकीय खरेदी कें द्र सुरू करण्यात शासनाने उशीर केला. खरेदी सुरू केली तर त्यामध्ये आॅनलाइनची अट असल्याने शेतकºयांना यासाठीची प्रचंड कसरत करावी लागली. एकरी उत्पादनाचे निकषही त्यामध्ये होतेच. अशा सर्व कठीण परिस्थितीचा सामना करताना जेरीस आलेल्या हजारो शेतकºयांची तूर खरेदी झाली नाही. अशावेळी शेकडो शेतकºयांनी गरजेपोटी व्यापाºयांना तूर विकावी लागली. यावर्षी तुरीचे पीक चांगले आहे. सध्या हे पीक परिपक्वतेच्या अवस्थेत आहे. त्यामुळे शेतकºयांना आतापासूनच तूर विक्रीची चिंता लागली आहे; पण शासकीय स्तरावर अद्याप कोणतेच नियोजन नसल्याचे चित्र आहे. पीक हातात येण्याअगोदरच खरे तर असे खरेदी करण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे; परंतु शेतमाल बाजारात आणेपर्यंत कोणत्याच हालचाली होत नाही. प्रथम शेतकºयांचे पोट भरू द्या, नंतर शेतकºयांकडे बघू, असे शेतकºयांना वाटत आहे. अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागणाºया शेतकºयांना शेतमाल विकावाच लागतो. त्यामुळे शेतकरी शेतातून माल काढला की थेट बाजारात आणतो. ज्या शेतकºयांकडे माल साठवून ठेवण्याची व्यवस्था व इतर आर्थिक स्रोत असेल, ते शेतकरी साठवून ठेवतात; पण अल्पभूधारक शेतकºयांना तर पर्यायच नसतो. या शेतकºयांच्या व्यथांकडे शासनाने बघणे गरजेचे आहे; पण तसे होतच नसल्याचे दरवर्षीचे चित्र आहे.दरम्यान, सोयाबीन खरेदी केंद्राच्या बाबतीत यावर्षी असाच गोंधळ घालण्यात आला. शेतकºयांनी ५० टक्क्यांवर सोयाबीन विक्री करेपर्यंत खरेदी केंद्र सुरू केले नाहीत. केले त्याचे प्रमाण त्रोटक होते. दरम्यान, सोयाबीनच्या दरात चालू आठवड्यात दीडशे ते दोनशे रुपयांनी घट झाली असून, हे दर प्रतिक्ंिवटल ३,१०० ते ३,२०० रुपयांपर्यंत खाली आले. यावर्षी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात विलंब झाला असून, अद्याप पूरक खरेदी केंद्रं सुरू झाली नाहीत; पण मागील महिन्यात बााजारातील दर प्रतिक्ंिवटल ३,३५० रुपयांपर्यंत वाढले होते, त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला होता. शासनाने सोयाबीनचे आधारभूत दर ३,३९९ रुपये प्रतिक्ंिवटल जाहीर केलेले आहेत. बाजारात प्रतिक्ंिवटल सरासरी ३,३५० रुपये शेतकºयांना मिळत होते, तोपर्यंत चिंता नव्हती. आता दरात घट सुरू झाली असून, दर वाढतील, या प्रतीक्षेत बाजारातील सोयाबीनची आवकही घटली आहे. शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १,८५७ क्ंिवटल सोयाबीन विक्रीस आले होते. या आठवड्यात ही सरासरी आवक आहे. मागच्या महिन्यात हीच आवक सरासरी चार हजार क्ंिवटल एवढी होती. हे दर स्थिर राहतील, अशी शक्यता व्यापारी वर्तुळात आहे.
टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती