शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

या वर्षी तुरीचे शासकीय खरेदी केंद्र सुरू होतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 20:52 IST

-राजरत्न सिरसाट अकोला : तूर उत्पादन आता काढणीला येणार आहे. बाजारात सध्या तुरीचे प्रतिक्ंिवटल दर ४,४०० रुपये आहेत. हमीदरापेक्षा ...

-राजरत्न सिरसाटअकोला : तूर उत्पादन आता काढणीला येणार आहे. बाजारात सध्या तुरीचे प्रतिक्ंिवटल दर ४,४०० रुपये आहेत. हमीदरापेक्षा हे दर कमी आहेत. म्हणूनच यावर्षी तरी हंगामापूर्वी शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू होतील का, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. एकूणच मागचा अनुभव बघता, सध्यातरी खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली दिसत नाहीत. २०१३-१४ मध्ये तुरीचे दर गगनाला भिडले होते. म्हणून कृषी विभागाने त्यानंतर कडधान्य, तूर लागवडीवर भर दिला. चार वर्षांपूर्वी १२० ते १६० रुपये किलोग्रामपर्यंत तुरीच्या डाळीचे दर पोहोचले होते.तुरीचे दरही वधारले होते. कृषी विभागाने तुरीच्या लागवडीसंदर्भात शेतकºयांच्या केलेल्या प्रबोधनानंतर २०१६-१७ मध्ये तुरीचे बंपर उत्पादन झाले; पण शासकीय खरेदी कें द्र सुरू करण्यात शासनाने उशीर केला. खरेदी सुरू केली तर त्यामध्ये आॅनलाइनची अट असल्याने शेतकºयांना यासाठीची प्रचंड कसरत करावी लागली. एकरी उत्पादनाचे निकषही त्यामध्ये होतेच. अशा सर्व कठीण परिस्थितीचा सामना करताना जेरीस आलेल्या हजारो शेतकºयांची तूर खरेदी झाली नाही. अशावेळी शेकडो शेतकºयांनी गरजेपोटी व्यापाºयांना तूर विकावी लागली. यावर्षी तुरीचे पीक चांगले आहे. सध्या हे पीक परिपक्वतेच्या अवस्थेत आहे. त्यामुळे शेतकºयांना आतापासूनच तूर विक्रीची चिंता लागली आहे; पण शासकीय स्तरावर अद्याप कोणतेच नियोजन नसल्याचे चित्र आहे. पीक हातात येण्याअगोदरच खरे तर असे खरेदी करण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे; परंतु शेतमाल बाजारात आणेपर्यंत कोणत्याच हालचाली होत नाही. प्रथम शेतकºयांचे पोट भरू द्या, नंतर शेतकºयांकडे बघू, असे शेतकºयांना वाटत आहे. अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागणाºया शेतकºयांना शेतमाल विकावाच लागतो. त्यामुळे शेतकरी शेतातून माल काढला की थेट बाजारात आणतो. ज्या शेतकºयांकडे माल साठवून ठेवण्याची व्यवस्था व इतर आर्थिक स्रोत असेल, ते शेतकरी साठवून ठेवतात; पण अल्पभूधारक शेतकºयांना तर पर्यायच नसतो. या शेतकºयांच्या व्यथांकडे शासनाने बघणे गरजेचे आहे; पण तसे होतच नसल्याचे दरवर्षीचे चित्र आहे.दरम्यान, सोयाबीन खरेदी केंद्राच्या बाबतीत यावर्षी असाच गोंधळ घालण्यात आला. शेतकºयांनी ५० टक्क्यांवर सोयाबीन विक्री करेपर्यंत खरेदी केंद्र सुरू केले नाहीत. केले त्याचे प्रमाण त्रोटक होते. दरम्यान, सोयाबीनच्या दरात चालू आठवड्यात दीडशे ते दोनशे रुपयांनी घट झाली असून, हे दर प्रतिक्ंिवटल ३,१०० ते ३,२०० रुपयांपर्यंत खाली आले. यावर्षी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात विलंब झाला असून, अद्याप पूरक खरेदी केंद्रं सुरू झाली नाहीत; पण मागील महिन्यात बााजारातील दर प्रतिक्ंिवटल ३,३५० रुपयांपर्यंत वाढले होते, त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला होता. शासनाने सोयाबीनचे आधारभूत दर ३,३९९ रुपये प्रतिक्ंिवटल जाहीर केलेले आहेत. बाजारात प्रतिक्ंिवटल सरासरी ३,३५० रुपये शेतकºयांना मिळत होते, तोपर्यंत चिंता नव्हती. आता दरात घट सुरू झाली असून, दर वाढतील, या प्रतीक्षेत बाजारातील सोयाबीनची आवकही घटली आहे. शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १,८५७ क्ंिवटल सोयाबीन विक्रीस आले होते. या आठवड्यात ही सरासरी आवक आहे. मागच्या महिन्यात हीच आवक सरासरी चार हजार क्ंिवटल एवढी होती. हे दर स्थिर राहतील, अशी शक्यता व्यापारी वर्तुळात आहे.
टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती