शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

पंतप्रधान मोदी शरद पवारांचे आव्हान स्विकारणार का ? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 14:26 IST

राष्ट्रीय पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी परस्परांना आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगत, पंतप्रधान मोदी हे शरद पवारांचे आव्हान खरोखरच स्विकारतील का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केला.

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गोंदिया येथील प्रचार सभेत तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या दोघांनी तोंड उघडले तर अनेकांचे खरे चेहरे समोर येतील असा गर्भित इशारा कोणाचेही नाव न घेता दिला होता. त्यानंतर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथील प्रचार सभेत, आमची कळ काढाल तर माफी नाही, असे प्रत्त्युत्तर दिले होते. राष्ट्रीय पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी परस्परांना आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगत, पंतप्रधान मोदी हे शरद पवारांचे आव्हान खरोखरच स्विकारतील का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केला. निवडणूक काळात सगळ्यांच्या गोष्टींचा खुलासा झाला पाहिजे, सर्वच गोष्टी समोर आल्या पाहिजे, म्हणून पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचे आव्हान स्विकारणे गरजेचे आहे, आहे अशी पुष्टीही यावेळी त्यांनी जोडली.शुक्रवारी अकोला येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सद्या तिहार तुरुंगात कुख्यात डॉन छोटा राजन व अगुस्ता वेस्टलँड हेलीकॉप्टर सौद्यातील आरोपी बंदिस्त आहेत. या दोघांनी तोंड उघडले तर अनेकांचे खरे चेहर समोर येतील, असा इशारा नरेंद्र मोदी यांनी गोंदिया येथील सभेत दिला. भारतातून फरार असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याने शरणागतीचा प्रस्ताव भारत सरकारला दिला होता. त्यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते. परंतु, हा प्रस्ताव शरद पवार यांनी फेटाळला होता, याचा संदर्भ देताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, की ही बाब दाऊदचा एकेकाळचा हस्तक असलेला व सद्या तिहार तुरुंगात कैद असलेला छोटा राजनच्या तोंडून बाहेर पडेल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. तसेच अगुस्ता वेस्टलँड प्रकरणातील आरोपीही तीहार मध्ये कैद असून, त्यानेही तोंड उघडले, तर काय होईल, याचाही धसका राकाँ नेत्यांनी घेतला आहे. म्हणूनच उस्मानाबाद येथील प्रचार सभेत शरद पवारांनी मोदींना प्रत्त्यूतर देताना, आमची कळ काढाल तर माफी नाही, असा अप्रत्यक्ष इशाराच मोदींना दिला होता. असे हे ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरु असताना, सर्व सत्य समोर येणे गरजेचे आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचे आव्हान स्विकारून तिहारमधील बाबीचा खुलासा करावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदी