शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

केंद्रीय गृहमंत्री माेघम बाेलुन काेणाला वाचवतात? - ॲड. प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 10:15 IST

Prakash Ambedkar : अमित शहा यांनी माेघम न बाेलता स्पष्ट बाेलावे, माेघम बाेलून ते काेणाला वाचवतात? असा प्रश्न ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

अकाेला : वाझे व परमबीर प्रकरणामुळे राजकारण, प्रशासन व पाेलीस यांच्यामधील गुन्हेगारी प्रवृत्ती व या प्रवृत्तीची टाेळी मानसिकता समाेर आली आहेे. हे समाजासाठी घातक आहे. त्यामुळे या प्रकरणात अडचणीत आल्यामुळेच राष्टवादीच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री यांची भेट तर घेतली नाही? अमित शहा यांनी माेघम न बाेलता स्पष्ट बाेलावे, माेघम बाेलून ते काेणाला वाचवतात? असा प्रश्न ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

वाझे व परमबीर प्रकरणात १०० काेटींमध्ये काेणाचा हिसा हाेता, महाविकास आघाडीमधील प्रत्येक घटक पक्षाला किती वाटा दिला जात हाेता, हे समाेर येणे गरजेचे आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रात भविष्यात काय अराजकता वाढून ठेवली आहे, हे समाेर येते. आज ही टाेळी बारवाल्यायापर्यंत पाेहचली, उद्या ती सामान्यांच्या घरापर्यंत पाेहचायला वेळ लागणार नाही? त्यामुळे या प्रकरणातील सत्य समाेर आले पाहिजे. देशाचे गृहमंत्री शरद पवारांच्या भेटीवर साऱ्याच गाेष्टी सार्वजनिक करायच्या नाहीत असे म्हणतात. त्यामुळे या १०० काेटीमध्ये भाजपाचाही वाटा आहे का, अशी शंका आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. जर वाटा नसेल तर भाजपाने या भेटीमागील सत्य बाहेर सांगितले पाहिजे असे आव्हान त्यांनी दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष डाॅ धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा अध्यक्ष प्रदीप वानखडे आदी उपस्थित हाेते.

 

चाैकशी समितीची गरज नाही... मुख्यमंत्र्यांनीच भूमिका घ्यावी

 

१०० काेटींच्या वसुली प्रकरणात चाैकशी समिती नेमण्याचे कारणच नाही? या प्रकरणात परमबीरसिंग यांनी केलेले दावे, रश्मी शुक्ला यांचे फाेन टॅपिंग प्रकरण यामधील सत्य मुख्यमंत्र्यांना माहीत आहेच. त्यांनी या प्रकरणात ठाेस भूमिका घेऊन स्वत:ची प्रतिमा जपावी, अन्यथा मुख्यमंत्री कार्यालयाचाही यामध्ये सहभाग हाेता हे स्पष्ट हाेईल, असा आराेपही ॲड. आंबेडकर यांनी केला.

 

न्यायालयाने परमबीरसिंग यांची याचिका स्वीकारावी

परमबीरसिंग हे स्वत:हून न्यायालयासमाेर आले हाेते. न्यायालयाने सिंग यांनी केलेल्या चुका व गैरवर्तन प्रतिज्ञापत्रावर घेतले असते तर या प्रकरणातील सत्य अधिक जलदगतीने समाेर आले असते. त्यामुळे न्यायालयाने परमबीरसिंग यांची याचिका स्वीकारण्याची विनंतीही ॲड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.

 

पंढरपूरची उमेदवारी माेटे यांना घाेषित

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून वीरप्पा मधुकर मोटे यांच्या नावाची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत केली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAmit Shahअमित शहाPoliticsराजकारणAkolaअकोला