शहरं
Join us  
Trending Stories
1
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
2
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
3
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
4
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
5
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
6
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
7
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
8
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
9
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
10
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
11
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
12
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
13
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

वऱ्हाडातील ५०२ धरणांत ४२ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 6:31 PM

अकोला : पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातील ५०२ धरणांत आजमितीस ४२.१२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात या धरणांमध्ये जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दोन महिन्यांत यातील २१ टक्के जलसाठा घटला आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातील ५०२ धरणांत आजमितीस ४२.१२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात या धरणांमध्ये जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दोन महिन्यांत यातील २१ टक्के जलसाठा घटला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर असून, अमरावती जिल्ह्यातील स्थिती बिकट आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये सप्टेंबर महिन्यात ६३.४८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता. हा जलसाठा आॅक्टोबरमध्ये स्थिर होता. नोव्हेंबर महिना लागताच यामध्ये घट सुरू झाली असून, २२ डिसेंबर रोजी या सर्व धरणामध्ये एकूण ४२.१२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. नळगंगा धरणात १३.५९, पेनटाकळी ८.३९ जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातीलच कोराडी मध्यम धरणातील जलसाठा केवळ शून्य टक्के आहे. तोरणा ९.५१ तर उतावळी धरणातील पातळी ३६.३३ टक्के साठा आहे. ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १६.७७ टक्के, पलढगमध्ये २५.०३ टक्के, मन धरणात २१.७२ टक्के साठा आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ६४.३४ टक्के, एकबुर्जी ६१.१५ तर सोनल धरणात ७०.३३ टक्के जलसाठा आहे.अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात आता केवळ २८.२८ टक्केच जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ८१.१८, अरुणावती ५७.४४ तर बेंबळा धरणात ३७.७३ टक्केच जलसाठा आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ६३.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ८०.६२ टक्के जलसाठा असून, उमा ६६.८७, मोर्णा धरणात ४२.४७ टक्के, तर वान धरणात ८१.८५ टक्के जलसाठा आहे.

यावर्षी वºहाडातील अकोला, वाशिम जिल्ह्यातील धरणात बऱ्यापैकी जलसाठा आहे. तथापि, लगतच्या बुलडाणा जिल्ह्यात कमी जलसाठा संचयित झाला. म्हणूनच अकोला, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी काळजीपूर्वक पाण्याचा वापर व नियोजन करणे गरजेचे आहे.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीDamधरण