शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील ५०२ धरणांत ४२ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:32 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातील ५०२ धरणांत आजमितीस ४२.१२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात या धरणांमध्ये जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दोन महिन्यांत यातील २१ टक्के जलसाठा घटला आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातील ५०२ धरणांत आजमितीस ४२.१२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात या धरणांमध्ये जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दोन महिन्यांत यातील २१ टक्के जलसाठा घटला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर असून, अमरावती जिल्ह्यातील स्थिती बिकट आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये सप्टेंबर महिन्यात ६३.४८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता. हा जलसाठा आॅक्टोबरमध्ये स्थिर होता. नोव्हेंबर महिना लागताच यामध्ये घट सुरू झाली असून, २२ डिसेंबर रोजी या सर्व धरणामध्ये एकूण ४२.१२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. नळगंगा धरणात १३.५९, पेनटाकळी ८.३९ जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातीलच कोराडी मध्यम धरणातील जलसाठा केवळ शून्य टक्के आहे. तोरणा ९.५१ तर उतावळी धरणातील पातळी ३६.३३ टक्के साठा आहे. ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १६.७७ टक्के, पलढगमध्ये २५.०३ टक्के, मन धरणात २१.७२ टक्के साठा आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ६४.३४ टक्के, एकबुर्जी ६१.१५ तर सोनल धरणात ७०.३३ टक्के जलसाठा आहे.अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात आता केवळ २८.२८ टक्केच जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ८१.१८, अरुणावती ५७.४४ तर बेंबळा धरणात ३७.७३ टक्केच जलसाठा आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ६३.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ८०.६२ टक्के जलसाठा असून, उमा ६६.८७, मोर्णा धरणात ४२.४७ टक्के, तर वान धरणात ८१.८५ टक्के जलसाठा आहे.

यावर्षी वºहाडातील अकोला, वाशिम जिल्ह्यातील धरणात बऱ्यापैकी जलसाठा आहे. तथापि, लगतच्या बुलडाणा जिल्ह्यात कमी जलसाठा संचयित झाला. म्हणूनच अकोला, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी काळजीपूर्वक पाण्याचा वापर व नियोजन करणे गरजेचे आहे.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीDamधरण