शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

वऱ्हाडातील ५०२ धरणांत ४२ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:32 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातील ५०२ धरणांत आजमितीस ४२.१२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात या धरणांमध्ये जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दोन महिन्यांत यातील २१ टक्के जलसाठा घटला आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातील ५०२ धरणांत आजमितीस ४२.१२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात या धरणांमध्ये जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दोन महिन्यांत यातील २१ टक्के जलसाठा घटला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर असून, अमरावती जिल्ह्यातील स्थिती बिकट आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये सप्टेंबर महिन्यात ६३.४८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता. हा जलसाठा आॅक्टोबरमध्ये स्थिर होता. नोव्हेंबर महिना लागताच यामध्ये घट सुरू झाली असून, २२ डिसेंबर रोजी या सर्व धरणामध्ये एकूण ४२.१२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. नळगंगा धरणात १३.५९, पेनटाकळी ८.३९ जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातीलच कोराडी मध्यम धरणातील जलसाठा केवळ शून्य टक्के आहे. तोरणा ९.५१ तर उतावळी धरणातील पातळी ३६.३३ टक्के साठा आहे. ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १६.७७ टक्के, पलढगमध्ये २५.०३ टक्के, मन धरणात २१.७२ टक्के साठा आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ६४.३४ टक्के, एकबुर्जी ६१.१५ तर सोनल धरणात ७०.३३ टक्के जलसाठा आहे.अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात आता केवळ २८.२८ टक्केच जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ८१.१८, अरुणावती ५७.४४ तर बेंबळा धरणात ३७.७३ टक्केच जलसाठा आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ६३.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ८०.६२ टक्के जलसाठा असून, उमा ६६.८७, मोर्णा धरणात ४२.४७ टक्के, तर वान धरणात ८१.८५ टक्के जलसाठा आहे.

यावर्षी वºहाडातील अकोला, वाशिम जिल्ह्यातील धरणात बऱ्यापैकी जलसाठा आहे. तथापि, लगतच्या बुलडाणा जिल्ह्यात कमी जलसाठा संचयित झाला. म्हणूनच अकोला, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी काळजीपूर्वक पाण्याचा वापर व नियोजन करणे गरजेचे आहे.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीDamधरण