शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

लंघापुर ५७ खेडी पाणी पुरवठा योजना 'सलाईन'वर; पावसाळ्यातही ४१ गावे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 2:37 PM

-  संजय उमकमूर्तिजापूर: तालुक्यातील लंघापुर ५७ गावे पाणी पुरवठा योजना योजने अंतर्गत मूर्तिजापूरसह कारंजा तालुक्यातील ५७ गावे अवलंबून आहेत; परंतु जीवन प्राधिकरणाच्या धोरणामुळेच मोठी पाणी टंचाई दोन्ही तालुक्यात निर्माण झाली आहे.       देयके स्थगित असल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ४१ गावांचा पाणी पुरवठा बंद केला आहे. यामध्ये  मूर्तिजापूर तालुक्यातील २१ ...

ठळक मुद्दे देयके स्थगित असल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ४१ गावांचा पाणी पुरवठा बंद केला आहे. पाणी पुरवठा बंद केलेल्या गावातील काहीनी पुर्ण देयके भरलेली असून सुद्धा त्यांनाही याचा फटका बसला आहे.

-  संजय उमकमूर्तिजापूर: तालुक्यातील लंघापुर ५७ गावे पाणी पुरवठा योजना योजने अंतर्गत मूर्तिजापूरसह कारंजा तालुक्यातील ५७ गावे अवलंबून आहेत; परंतु जीवन प्राधिकरणाच्या धोरणामुळेच मोठी पाणी टंचाई दोन्ही तालुक्यात निर्माण झाली आहे.       देयके स्थगित असल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ४१ गावांचा पाणी पुरवठा बंद केला आहे. यामध्ये  मूर्तिजापूर तालुक्यातील २१ गावांचा तर कारंजा तालुक्यातील ३ गावांचा अशा २४ गावांचा पाणी पुरवठा कायमस्वरूपी बंद केला आहे. त्याच प्रमाणे देयके स्थगित असल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील १६ आणि कारंजा तालुक्यातील एका गावचा पाणी पुरवठा बंद केला आहे. एकंदरीत ४१ गावांमध्ये जीवन प्राधिकरण विभागानेच कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. या योजनेवर अवलंबून असलेल्या ५७ गावांपैकी १६ गावांनाच पाणी पुरवठा करण्यात येत असून तोही अनियमित असल्याने सदरची योजना भविष्यात कधीही बंद होऊ शकते.   सदर्हू योजनेवर असलेले गावांचे थकबाकीचे कारण दाखवून अख्ख्या गावचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला; पंरतु पाणी पुरवठा बंद केलेल्या गावातील काहीनी पुर्ण देयके भरलेली असून सुद्धा त्यांनाही याचा फटका बसला आहे.जलकुंभांची स्वच्छता नाहीसध्याच्या स्थितीत या योजने मार्फत १६ गावांना अनियमित गढूळ पाणी पुरवठा होत आहे. प्रत्येक गावातील जलकुंभात (पाण्याची टाकी) प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याने व पक्षी मरुन पडल्याने गढूळ व मांसाचे तुकडे असलेला पाणी पुरवठा होतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. 

लाखो रुपये देयका पोटी स्थगित असल्याने १७ गावांचा पाणी पुरवठा तात्पुरता तर २४ कायमस्वरूपी बंद केला आहे. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, पण पाहीजे तसे सहकार्य होत नसल्याने ४१ गावांचा पाणी पुरवठा बंद करावा लागला.  तात्पुरता पाणी पुरवठा बंद केलेल्या गावातील लोकांनी देयके भरली तर पाणी पुरवठा पुर्ववत होऊ शकतो.- एम. आर. बोबडे,उपविभागीय अभियंता जीवन प्राधिकरण, मूर्तिजापूर

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर