शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

तेल्हारा तालुक्यातील ६९ गावांचा पाणीपुरवठा प्रस्ताव धूळ खात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST

तेल्हारा : तालुक्यातील ६९ गावांचा मजीप्रा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला; मात्र प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे धूळ खात पडलेला ...

तेल्हारा : तालुक्यातील ६९ गावांचा मजीप्रा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला; मात्र प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे धूळ खात पडलेला आहे. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा आदेश त्वरित द्यावा, अशी मागणी शिवसेना जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.

जि.प. सदस्य अढाऊ यांनी दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, तालुक्यात अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. तसेच अनेक गावे खारपाणपट्ट्यांत येत असल्याने गोड पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. पाणी भरण्याच्या कारणावरून अनेकदा तंटे उद्भवतात. परिणामी, अनेकदा कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होतो. तालुक्यातील पाण्याची पातळी ३०० ते ४०० फूट खोल गेली आहे. शासनाचे २०० फूटपर्यंत बोअरवेल खोदण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांना दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तालुक्यातील ६९ गावांसाठी पाणीपुरवठा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्य अभियंता अमरावती यांच्याकडे पाठविण्यात आला; मात्र अनेक दिवसांपासून प्रस्ताव धूळ खात पडून असल्याने पुढील कार्यवाही रखडली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी हा प्रस्ताव त्वरित शासनाकडे पाठविण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद बेलखेड सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदनातून केली आहे. त्यावर पाणीपुरवठामंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच माहिती घेऊन आदेश देऊ, असे आश्वासन दिल्याची माहिती जि.प. सदस्य अढाऊ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (फोटो)