शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

तेल्हारा तालुक्यातील ६९ गावांचा पाणीपुरवठा प्रस्ताव धूळ खात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST

तेल्हारा : तालुक्यातील ६९ गावांचा मजीप्रा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला; मात्र प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे धूळ खात पडलेला ...

तेल्हारा : तालुक्यातील ६९ गावांचा मजीप्रा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला; मात्र प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे धूळ खात पडलेला आहे. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा आदेश त्वरित द्यावा, अशी मागणी शिवसेना जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.

जि.प. सदस्य अढाऊ यांनी दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, तालुक्यात अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. तसेच अनेक गावे खारपाणपट्ट्यांत येत असल्याने गोड पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. पाणी भरण्याच्या कारणावरून अनेकदा तंटे उद्भवतात. परिणामी, अनेकदा कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होतो. तालुक्यातील पाण्याची पातळी ३०० ते ४०० फूट खोल गेली आहे. शासनाचे २०० फूटपर्यंत बोअरवेल खोदण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांना दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तालुक्यातील ६९ गावांसाठी पाणीपुरवठा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्य अभियंता अमरावती यांच्याकडे पाठविण्यात आला; मात्र अनेक दिवसांपासून प्रस्ताव धूळ खात पडून असल्याने पुढील कार्यवाही रखडली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी हा प्रस्ताव त्वरित शासनाकडे पाठविण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद बेलखेड सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदनातून केली आहे. त्यावर पाणीपुरवठामंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच माहिती घेऊन आदेश देऊ, असे आश्वासन दिल्याची माहिती जि.प. सदस्य अढाऊ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (फोटो)