शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

 अकोला जिल्ह्यातील जलसंकट तीव्र ; धरणात अल्प जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 14:01 IST

अकोला: जिल्ह्यातील उमा धरण आटले असून, उर्वरित धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उरल्याने हाहाकार माजला आहे. सूर्य ३७ ते ३९ अंशांवर पोहोचला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील काटेपूर्णा, मोर्णा, निर्गुणा या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. उमा धरण आटले असून, दगडपारवा धरणात पाणीच नाही. वाण धरण वगळता इतर धरणांत पाणी अत्यल्प उरले आहे.

अकोला: जिल्ह्यातील उमा धरण आटले असून, उर्वरित धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उरल्याने हाहाकार माजला आहे. सूर्य ३७ ते ३९ अंशांवर पोहोचला आहे. एप्रिल-मे महिन्यात ही तीव्रता ४५ अंशांवर जाते. या उन्हातच दिवसेंदिवस धरणात उरलेले पाणीही आटत चालले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जलसंकट तीव्र झाले आहे. प्रशासकीय पातळीवर यासाठी कोणती ठोस पावले उचलली, असा प्रश्न जिल्हावासीयांकडून विचारला जात आहे.जिल्ह्यातील काटेपूर्णा, मोर्णा, निर्गुणा या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. उमा धरण आटले असून, दगडपारवा धरणात पाणीच नाही. काटेपूर्णा धरणातील पाणीही पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. वाण धरण वगळता इतर धरणांत पाणी अत्यल्प उरले आहे. प्रमुख धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवले असल्याने उन्हाळी पिकांना फाटा देण्यात आला आहे. आतापासूनच जिल्ह्यातील गावांत पाणी टंचाई जाणवत आहे. एप्रिल, मे महिन्यात तीव्र उन्हाळ्याला सामोरे जावे लागणार आहे. जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाला सुरुवात झाली, तरी जुलै, आॅगस्टच्या पावसाच्या जोरावर धरणे भरायला सप्टेंबर उजाडावा लागणार आहे.

मशागतीची कामे थांबली!रब्बी पिकांच्या काढणीनंतर जागोजागी नांगरटी केली जाते. जेवढे ऊन जास्त तेवढे नांगरटी केलेल्या जमिनीला फायदा मोठा होतो. यावर्षीही पावसाच्या अनिश्चिततेचे भाकीत वर्तविण्यात येत असल्याने पावसाळ्यात तरी पाऊस पडेल का, याबाबत साशंक असणाऱ्या शेतकºयांनी नांगरटी, मशागतीची कामे थांबविली आहेत.

 काटेपूर्णा धरणात अल्प जलसाठासात लाखांवर लोकसंख्या असलेल्या अकोलेकरांची जीवनरेखा असलेल्या काटेपूर्णा धरणात केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक असून, यात अर्धा गाळ असल्याने या धरणातील जलसाठ्याने तळ गाठला आहे. पाणी कमी असल्याने अगोदरच या धरणातून मूर्तिजापूर, साठ खेडी व अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी नाकारले आहे; पण या धरणातील अल्प पाण्यात पुढील सप्टेंबरपर्यंत अकोलेकरांची तहान भागेल का, असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे. 

धरणातील उपलब्ध जलसाठाकाटेपूर्णा - १०.९ टक्केमोर्णा - १२.८१ टक्केनिर्गुणा - २०.५९ टक्केउमा - ०.० टक्केदगडपारवा - ०.० टक्केवाण - ७७.९१ टक्के

 काटेपूर्णा धरणात १० टक्के एवढा जिवंत; परंतु अल्प जलसाठा आहे. त्यानंतर मृतसाठा उचलता येईल. यात गाळही आहे. त्यामुळे पाण्याचे आता काटेकोर नियोजन करावे लागणार असून, पाण्याचा अपव्यय टाळावा लागेल.जयंत शिंदे,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरणWaterपाणी