शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

 अकोला जिल्ह्यातील जलसंकट तीव्र ; धरणात अल्प जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 14:01 IST

अकोला: जिल्ह्यातील उमा धरण आटले असून, उर्वरित धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उरल्याने हाहाकार माजला आहे. सूर्य ३७ ते ३९ अंशांवर पोहोचला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील काटेपूर्णा, मोर्णा, निर्गुणा या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. उमा धरण आटले असून, दगडपारवा धरणात पाणीच नाही. वाण धरण वगळता इतर धरणांत पाणी अत्यल्प उरले आहे.

अकोला: जिल्ह्यातील उमा धरण आटले असून, उर्वरित धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उरल्याने हाहाकार माजला आहे. सूर्य ३७ ते ३९ अंशांवर पोहोचला आहे. एप्रिल-मे महिन्यात ही तीव्रता ४५ अंशांवर जाते. या उन्हातच दिवसेंदिवस धरणात उरलेले पाणीही आटत चालले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जलसंकट तीव्र झाले आहे. प्रशासकीय पातळीवर यासाठी कोणती ठोस पावले उचलली, असा प्रश्न जिल्हावासीयांकडून विचारला जात आहे.जिल्ह्यातील काटेपूर्णा, मोर्णा, निर्गुणा या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. उमा धरण आटले असून, दगडपारवा धरणात पाणीच नाही. काटेपूर्णा धरणातील पाणीही पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. वाण धरण वगळता इतर धरणांत पाणी अत्यल्प उरले आहे. प्रमुख धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवले असल्याने उन्हाळी पिकांना फाटा देण्यात आला आहे. आतापासूनच जिल्ह्यातील गावांत पाणी टंचाई जाणवत आहे. एप्रिल, मे महिन्यात तीव्र उन्हाळ्याला सामोरे जावे लागणार आहे. जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाला सुरुवात झाली, तरी जुलै, आॅगस्टच्या पावसाच्या जोरावर धरणे भरायला सप्टेंबर उजाडावा लागणार आहे.

मशागतीची कामे थांबली!रब्बी पिकांच्या काढणीनंतर जागोजागी नांगरटी केली जाते. जेवढे ऊन जास्त तेवढे नांगरटी केलेल्या जमिनीला फायदा मोठा होतो. यावर्षीही पावसाच्या अनिश्चिततेचे भाकीत वर्तविण्यात येत असल्याने पावसाळ्यात तरी पाऊस पडेल का, याबाबत साशंक असणाऱ्या शेतकºयांनी नांगरटी, मशागतीची कामे थांबविली आहेत.

 काटेपूर्णा धरणात अल्प जलसाठासात लाखांवर लोकसंख्या असलेल्या अकोलेकरांची जीवनरेखा असलेल्या काटेपूर्णा धरणात केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक असून, यात अर्धा गाळ असल्याने या धरणातील जलसाठ्याने तळ गाठला आहे. पाणी कमी असल्याने अगोदरच या धरणातून मूर्तिजापूर, साठ खेडी व अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी नाकारले आहे; पण या धरणातील अल्प पाण्यात पुढील सप्टेंबरपर्यंत अकोलेकरांची तहान भागेल का, असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे. 

धरणातील उपलब्ध जलसाठाकाटेपूर्णा - १०.९ टक्केमोर्णा - १२.८१ टक्केनिर्गुणा - २०.५९ टक्केउमा - ०.० टक्केदगडपारवा - ०.० टक्केवाण - ७७.९१ टक्के

 काटेपूर्णा धरणात १० टक्के एवढा जिवंत; परंतु अल्प जलसाठा आहे. त्यानंतर मृतसाठा उचलता येईल. यात गाळही आहे. त्यामुळे पाण्याचे आता काटेकोर नियोजन करावे लागणार असून, पाण्याचा अपव्यय टाळावा लागेल.जयंत शिंदे,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरणWaterपाणी