शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील १0९ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: November 12, 2014 01:09 IST

टंचाई निवारणासाठी आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश.

अकोला : यावर्षी अल्प पावसाळा झाल्यामुळे हिवाळ्यातच ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. जिल्ह्यातील १0९ गावांवर पाणीटंचाईचे सावट असून, आगामी काळात पाण्याची भीषण समस्या भासणार आहे. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने संयुक्तरीत्या संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करून १६ नोव्हेंबरपूर्वी सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी मंगळवारी आयोजित आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही सभागृहात २0१४-१५ करिता आरक्षित करावयाच्या पाणीसाठा व जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना यासंबंधी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील काही भागांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. यासाठी आतापासूनच ३0 जूनअखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल असे नियोजन करावे, असे निर्देश यावेळी अरुण शिंदे यांनी दिले.जिल्ह्यातील १0९ गावांमधून अकोला तालुक्यातील चार गावे, पातूर तालुक्यातील १३, मूर्तिजापूर तालुक्यात नऊ गावे, आकोटमधील १७, बाळापूर तालुक्यातील चार, तेल्हारा तालुक्यातील सहा गावे, तर बार्शिटाकळी तालुक्यातील ४६ गावांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत मूर्तिजापूर शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, हिंगणा हेडवर्क्‍स येथे नोव्हेंबरअखेरीस पाणीपुरवठा होऊ शकतो, त्यासाठी पर्यायी व्यवस्था उमा धरणावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ५७ खेडी पाणीपुरवठा योजना सुरू आहे. या धरणातील पाणी मूर्तिजापूरला वापर करण्याबाबतचे निर्देशही यावेळी देण्यात आले.