शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

अकोला जिल्ह्यातील १0९ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: November 12, 2014 01:09 IST

टंचाई निवारणासाठी आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश.

अकोला : यावर्षी अल्प पावसाळा झाल्यामुळे हिवाळ्यातच ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. जिल्ह्यातील १0९ गावांवर पाणीटंचाईचे सावट असून, आगामी काळात पाण्याची भीषण समस्या भासणार आहे. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने संयुक्तरीत्या संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करून १६ नोव्हेंबरपूर्वी सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी मंगळवारी आयोजित आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही सभागृहात २0१४-१५ करिता आरक्षित करावयाच्या पाणीसाठा व जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना यासंबंधी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील काही भागांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. यासाठी आतापासूनच ३0 जूनअखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल असे नियोजन करावे, असे निर्देश यावेळी अरुण शिंदे यांनी दिले.जिल्ह्यातील १0९ गावांमधून अकोला तालुक्यातील चार गावे, पातूर तालुक्यातील १३, मूर्तिजापूर तालुक्यात नऊ गावे, आकोटमधील १७, बाळापूर तालुक्यातील चार, तेल्हारा तालुक्यातील सहा गावे, तर बार्शिटाकळी तालुक्यातील ४६ गावांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत मूर्तिजापूर शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, हिंगणा हेडवर्क्‍स येथे नोव्हेंबरअखेरीस पाणीपुरवठा होऊ शकतो, त्यासाठी पर्यायी व्यवस्था उमा धरणावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ५७ खेडी पाणीपुरवठा योजना सुरू आहे. या धरणातील पाणी मूर्तिजापूरला वापर करण्याबाबतचे निर्देशही यावेळी देण्यात आले.