शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वर्‍हाडातील धरणातील पाणी पिण्यासाठी होणार आरक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 1:42 AM

अकोला : यावर्षी अद्याप दमदार सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने पश्‍चिम विदर्भातील धरणांचे पाणलोट क्षेत्र कोरडेच असून, आजमितीस या धरणामध्ये केवळ ३३.४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा धरणात १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा आणि खडकपूर्णा धरणातील जलसाठा शून्यावर असून, चार धरणात १0 टक्क्याच्या आत जलसाठा शिल्लक असल्याने वर्‍हाडावरील जलसंकट गडद झाले आहे. या सर्व परिस्थितीच्या अनुषंगाने धरणातील पाणी पिण्यासाठीच आरक्षित होणार आहे.

ठळक मुद्देखडकपूर्णा, दगडपारवा धरणात शून्य टक्के साठा

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी अद्याप दमदार सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने पश्‍चिम विदर्भातील धरणांचे पाणलोट क्षेत्र कोरडेच असून, आजमितीस या धरणामध्ये केवळ ३३.४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा धरणात १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा आणि खडकपूर्णा धरणातील जलसाठा शून्यावर असून, चार धरणात १0 टक्क्याच्या आत जलसाठा शिल्लक असल्याने वर्‍हाडावरील जलसंकट गडद झाले आहे. या सर्व परिस्थितीच्या अनुषंगाने धरणातील पाणी पिण्यासाठीच आरक्षित होणार आहे.पावसाळा संपत आला; पण दमदार पाऊस झाला नसल्याने वर्‍हाडातील (पश्‍चिम विदर्भ) धरणांतील जलसाठय़ाची टक्केवारी यावर्षी पुढे सरकलीच नाही. अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्हय़ात सातत्याने पावसाची अनिश्‍चितता असते; पण गतवर्षी पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली असली तरी अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ांतील धरणे शंभर टक्क्याच्या आतच होती. यावर्षी पावसाने दडी मारली आहे. ११ सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात १६.८४ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. याच जिल्हय़ातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १७.५३, निर्गुणा ३७.३0, उमा धरणात तर 0.४३ टक्के जलसाठा शिल्लक असून, दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्हय़ांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या  ६७.९९ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा धरणात १४.९८ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी शून्य टक्के आहे. पेनटाक ळी धरणात ७.१0 टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये २0.९३, मसमध्ये १५.६३ टक्के, कोराडी १0.७८, पलढग ४0.७५, मन ९.३७, तोरणा ६.४६ टक्के, तर उतावळी धरणात १८.२४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्हय़ातील अडाण धरणात २९.0६ टक्के, सोनल १.९८ टक्के, तर एकबुर्जी धरणात १५.८७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

अमरावती विभागात ३३.४८ टक्के जलसाठा!अमरावती विभाग म्हणजेच वर्‍हाडातील एकूण मोठय़ा आणि मध्यम प्रकल्पात आजमितीस केवळ ३३.४८ टक्के जलसाठा शिल्लक असून, सर्वाधिक कमी जलसाठा बुलडाणा जिल्हय़ात ११.८0 टक्के आहे. वाशिम जिल्हय़ात १९.८२ टक्के, अकोला २८.६६ टक्के, यवतमाळ जिल्हय़ात ३२.११ टक्के तर अमरावती जिल्ह्यात ५५.८४ टक्के एवढा साठा शिल्लक आहे.

सध्याची धरणातील जलसाठय़ाची स्थिती बघता यापुढे धरणातील पाण्याचे आरक्षण केवळ पिण्यासाठीच राहील. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. पावसाळा अद्याप संपला नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.- अंकुर देसाई, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ, अकोला.