शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

महिन्यातून फक्त एक दिवस मिळते पाणी

By admin | Updated: May 25, 2017 01:14 IST

धामणा, नैराट, वैराट, राजापूर गावांत भीषण पाणीटंचाई : निवेदन देऊनही टँकर सुरू करण्याकडे दुर्लक्ष

राजेश्वर वैराळे । लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे : अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नैराट, वैराट, राजापूर व धामणा गावांत भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी खांबोरा ग्रामीण पाणी पुरवठा योजनेवरून पाणीपुरवठा होत असला, तरी महिना-महिना पिण्याचे पाणीच गावात पोहोचत नसल्यामुळे चारही गावांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ज्यांना पिण्यासाठी पाणी विकत घेणे परवडते, असे लोक १०० रुपये टाकीप्रमाणे पाणी विकत घेत आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, असे लोक पूर्णा नदीच्या पात्रात झिरे करून पिण्यासाठी पाणी आणतात. पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने अकोला पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केला असला, तरी अद्यापही या चारही गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पंचायत समितीकडून सकारात्मक पावले उचलण्यात आलेली नाहीत.अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नैराट, वैराट, राजापूर व धामणा गावांत दरवर्षी भीषण पाणीटंचाई जाणवत असते. मागील वर्षी या चारही गावांत पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता; मात्र पाण्यासाठी ग्रामस्थांनी भांडणे केल्याने त्यावेळी स्थानिक ग्रामपंचायतने आठ दिवसांतच टँकर बंद करण्याबाबतचा ठराव अकोला पंचायत समितीकडे रीतसर पाठविला होता. यावर्षी गावात जाणवत असलेल्या भीषण पाणीटंचाईमुळे गावकरी अक्षरश: वैतागले आहेत. चारही गावांतील ग्रामस्थांनी स्थानिक ग्रामपंचायतला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत रीतसर निवेदन सादर केले आहे. ग्रामस्थांनी केलेल्या टँकरच्या मागणीबाबत नैराट, वैराट, राजापूर व धामणा येथील ग्रामपंचायतने ठराव घेऊन स्थानिक अकोला पंचायत समितीकडे पाठविले आहेत. या ठरावाद्वारे पाणीटंचाईच्या काळात गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे; धामणा, नैराट, वैराट, राजापूर या चारही गावांत बारमाही पाणीटंचाईचे सावट गेल्या कित्येक वर्षांपासून असले, तरी या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थ घेतात १०० रुपये ड्रमने पाणीया चारही गावांत पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी खांबोरा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची आहे; परंतु या चारही गावांत अगदी अमावस्या पौर्णिमेसारखे महिन्यातून एखाद्या दिवशी, तेही तास-दोन तास पाणी येते.यामुळे पाणीटंचाईच्या काळात जे ग्रामस्थ पिण्यासाठी पाणी विकत घेऊ शकतात, ते ग्रामस्थ टँकरद्वारे पाणी आणतात. ज्यांना पाणी विकत घेणे शक्य नाही, असे गोरगरीब लोक पूर्णा नदीच्या पात्रात झिरे करून पिण्यासाठी पाणी आणताना दिसतात. ज्यांना पिण्यासाठी पाणी विकत घेणे परवडते, असे लोक १०० रुपये टाकीप्रमाणे पाणी विकत घेत आहेत. नैराट, वैराट, राजापूर गावांत महिना महिनाभर पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे केल्या आहेत; मात्र तक्रारीची दखल घेऊन गावातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वरिष्ठांकडून सकारात्मक पावले उचलण्यात येत नसल्यामुळे गावातील पाणीटंचाईची समस्या कायम आहे. - सुनील परनाटे, सरपंच, नैराट.धामणा गावात दोन महिन्यांपासून नळ योजनेच्या पाण्याचा थेंबही पोहोचला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी दोन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू असला, तरी वरिष्ठांकडून त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जात नाही.- अनिल भांबेरे, उपसरपंच, धामणा.नैराट, वैराट, राजापूर या गावांत नेहमीच पाणीटंचाई जाणवत असते. त्यामुळे टँकरद्वारे तात्पुरता पाणीपुरवठा करण्यासोबत गावातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.- राजेश गरकल, ग्रामसेवक, नैराट.धामणा गावातील पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीकडे आठ दिवसांपूर्वी प्रस्ताव सादर केलेला आहे.- दीपाली भोंबळे, ग्रामसेवक, धामणा.