अकोलेकरांवर जलसंकट

By Admin | Updated: December 24, 2014 01:16 IST2014-12-24T01:16:53+5:302014-12-24T01:16:53+5:30

महान येथील ‘एसीबी’ जळाला; पाणीपुरवठा ठप्प.

Water congestion on Akolekar | अकोलेकरांवर जलसंकट

अकोलेकरांवर जलसंकट

अकोला : महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील एअर सर्किट ब्रेकर (एसीब ी) शॉर्ट सर्किट झाल्याने जळाल्याची घटना मंगळवारी घडली. यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. येत्या दोन दिवसांत अकोलेकरांना पाणीपुरवठा होणार नसल्याची परिस्थिती आहे.
महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर नवीन एअर सर्किट ब्रेकर बसविण्यासाठी तत्कालीन महापौर ज्योत्स्ना गवई यांनी ५0 लाखांची तरतूद केली होती. १७ वर्षांमध्ये प्रथमच जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक दुरुस्तीसाठी भारिप-बमसंच्या कार्यकाळात निधीची तरतूद करण्यात आली. यामधून नवीन एसीबी बसविण्यात आले. मंगळवारी अचानक शॉर्ट सर्किटमुळे एसीबी जळाल्याची घटना घडली. यावेळी काही कर्मचारी बालबाल बचावले. एसीबी जळाल्याने पाण्याचा उपसा करण्याची प्रक्रिया बंद झाली. यामुळे शहराला किमान दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याची तूर्तास स्थिती आहे.
एसीबी जळाल्यामुळे पाण्याचा उपसा करणे शक्य नाही. दुरुस्तीसाठी अवधी लागेल. दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होईल. अकोलेकरांनी सहकार्य कर ण्याचे अवाहन जलप्रदाय विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील काळे यांनी लोक मतशी बोलताना केले.

*अन् पम्पिंग मशीनचा तिढा सुटलाच नाही!
४मे २0१४ मध्ये आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली होती. त्यावेळी पाण्याचा उपसा करणार्‍या पाचपैकी चार पम्पिंग मशीन कालबाह्य झाल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. एका मशीनसाठी किमान ४५ ते ५0 लाखांचा खर्च अपेक्षित असल्याने दोन नवीन पम्पिंग मशीन बसवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आयुक्तांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. याकरीता आयुक्तांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तात्काळ एक कोटीचा प्रस्तावही सादर केला. या प्रस्तावाचे पुढे काय झाले, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असून कालबाह्य झालेल्या पम्पिंग मशीनचा तिढा कायमच असल्याचे चित्र आहे.

Web Title: Water congestion on Akolekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.