शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाशिम: १३ महिन्यात अपघाताचे ११२ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:54 IST

गत १३ महिन्यात जिल्ह्यात घडलेल्या अपघातांच्या २६१ घटनांमध्ये ११० जण ठार; तर २०९ जण जखमी झाले आहेत.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नादुरूस्त वाहने, भरधाव वेग, दिवसेंदिवस वाढती रहदारी, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, विना हेल्मेट वाहन चालविणे, पूर्ण झोप न घेणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे आदींमुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात रस्ते अपघातात माहेवारी दहाजण ठार होतात. हा विषय चिंतेचा बनत असून यामुळे अनेकांचे कुटूंब उध्वस्त होत आहे. गत १३ महिन्यात जिल्ह्यात घडलेल्या अपघातांच्या २६१ घटनांमध्ये ११० जण ठार; तर २०९ जण जखमी झाले आहेत.वाशिम जिल्ह्याच्या चारही सिमेला अकोला, बुलडाणा, हिंगोली आणि अमरावती, यवतमाळ हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमधून दैनंदिन वाशिममार्गे वाहने भरधाव वेगाने धावतात. विशेषत: जडवाहतूक करणाऱ्या वाहनांचा त्यात अधिक प्रमाणात समावेश आहे. अशातच वाशिमसह जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, कारंजा, मानोरा आणि मंगरूळपीर या सहाही शहरांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा लागणाºया हातगाड्या, पार्किंग नसतानाही अस्ताव्यस्त स्वरूपात उभी केली जाणारी वाहनांमुळे वाहतूक वारंवार विस्कळित होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. वाहतूक सुरळित करण्याची जबाबदारी वाहतूक विभागाची आहे; परंतु हा विभाग कारवाईस टाळाटाळ करित असल्याचे दिसून येत आहे.सीटबेल्ट, हेल्मेट सक्तीचे होतेय उल्लंघनरस्त्यांवरील अपघातांमध्ये प्रामुख्याने डोक्याला दुखापत होऊन मृत्यू ओढवण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. ते कमी करण्यासाठी साधारणत: दोन वर्षांपूर्वी चारचाकी वाहनधारकांना सीटबेल्ट बांधणे व दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे केले. त्यानुसार, जिल्ह्यात सुरूवातीच्या काळात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, जिल्हा वाहतूक, शहर वाहतूक विभाग तथा पोलिस प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम राबवून अनेकांवर दंडात्मक कारवाई केली होती; मात्र गत अनेक महिन्यांपासून ही मोहीम पूर्णत: थंडावली आहे.

दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करायलाच हवा. मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये. स्वत:चा जीव सुरक्षित राहावा, यासाठी किमान वाहतूक नियमांचे पालन प्रत्येकाने करायला हवे.- राजू वाटाणेनिरीक्षक, शहर वाहतूक शाखा, वाशिमवाशिम जिल्ह्यातील अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. प्रश्न जीवाचा असल्याने वाहनधारकांनी देखील वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. रस्ते सुरक्षिततेसंदर्भात पोलीस विभागातर्फे चालकांना मार्गदर्शन केले जाते.- वसंत परदेशीजिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम

 

 

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात