शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

अमृत योजनेकरिता वान धरणाचे पाणी पूर्णपणे आरक्षित करू नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:35 IST

अकोला : वान धरणाचे पाणी अकोला अमृत योजनेंतर्गत  अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात येणार आहे. वान धरणाचे  पाणी शेतीकरिता आरक्षित आहे. शहरातील नागरिकांचा जर  िपण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे, आवश्यक तेवढे  पाणी घेण्यास हरकत नाही.

ठळक मुद्देशेतकरी संघटना : वान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या  शेतकर्‍यांचे मांडले प्रश्न!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वान धरणाचे पाणी अकोला अमृत योजनेंतर्गत  अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात येणार आहे. वान धरणाचे  पाणी शेतीकरिता आरक्षित आहे. शहरातील नागरिकांचा जर  िपण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे, आवश्यक तेवढे  पाणी घेण्यास हरकत नाही. मात्र, या धरणातील पाणी पूर्णपणे  िपण्याच्या पाण्याकरिता आरक्षित करू  नये, अशी मागणी शेतकरी  संघटनेचे नेते ललित बहाळे यांनी केली.सोमवारी जिल्हा परिषद विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार  परिषदेत ललित बहाळे यांनी वान धरणाच्या पाण्यावर अवलंबून  शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे प्रश्न मांडले. वान धरणालगत वास् तविक पाहता अकोला जिल्हय़ातील तेल्हारा व बुलडाणा  जिल्हय़ातील संग्रामपूर हे दोन तालुके आदिवासी क्षेत्रात व  डोंगराळ भागाला लागून आहेत. अकोला शहरापासून फारच  लांब आहेत. येथे कोणत्याही प्रकारचे कारखाने व व्यापार नाही.  येथील सर्व शेतकरी हे शेतीवर अवलंबून आहेत. वान धरणा  व्यतिरिक्त येथे कोणतीही सिंचनाकरिता पाण्याची व्यवस्था नाही.  धरण उभारण्याकरिता सर्व लाभधारकांनी जमिनी दिल्या आहेत.  तसेच याआधी वान प्रकल्पाचे ४७ टक्के पाणी शासनाने  िपण्यासाठी तेल्हारा, अकोट ८४ खेडी, जळगाव जामोद, शेगाव  १५९ खेडी करिता आरक्षित केलेले आहे. त्यामुळे आता फक्त  ५३ टक्के पाणी सिंचनासाठी शिल्लक असल्याचे बहाळे यांनी सांगि तले. धरणात साचलेला गाळ बाष्पीभवन व गळतीमुळे होणारे  कमी पाणी याचा विचार करता फक्त प्रत्यक्षात २५ ते ३0 टक्के  पाणीच सिंचनाकरिता मिळणार आहे. येथील नागरिकांचे जीवन  शेतीवरच अवलंबून आहे. या योजनेमुळे शेतकरी सिंचन करू   शकणार नाहीत. त्यात शेतकरी कर्जबाजारी आहेत. लाभधारक  शेतकर्‍यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. शे तकरी वर्गावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, याकरिता  अकोला अमृत योजनेंतर्गत अकोला शहरासाठी पाण्याचा वान  धरण व्यतिरिक्त दुसरा मार्ग शोधावा, असेही बहाळे यांनी सांगि तले.शासनाच्या प्रचलित नियमानुसार फक्त धरणातून १५ टक्के पाणीच  पिण्यासाठी आरक्षित करावे व उर्वरित सिंचनासाठी ठेवावे, असा  शासनाचा नियम असताना वान धरणाचे १00 टक्के पाणी कसे  काय आरक्षित करीत आहेत, असा सवाल याप्रसंगी उपस्थित शे तकर्‍यांनी केला. यासंदर्भात गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.  रणजित पाटील यांच्याकडे निवेदन सोपविले असल्याचेही बहाळे  यांनी सांगितले. 

टॅग्स :WaterपाणीDamधरण