शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अमृत योजनेकरिता वान धरणाचे पाणी पूर्णपणे आरक्षित करू नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:35 IST

अकोला : वान धरणाचे पाणी अकोला अमृत योजनेंतर्गत  अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात येणार आहे. वान धरणाचे  पाणी शेतीकरिता आरक्षित आहे. शहरातील नागरिकांचा जर  िपण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे, आवश्यक तेवढे  पाणी घेण्यास हरकत नाही.

ठळक मुद्देशेतकरी संघटना : वान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या  शेतकर्‍यांचे मांडले प्रश्न!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वान धरणाचे पाणी अकोला अमृत योजनेंतर्गत  अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात येणार आहे. वान धरणाचे  पाणी शेतीकरिता आरक्षित आहे. शहरातील नागरिकांचा जर  िपण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे, आवश्यक तेवढे  पाणी घेण्यास हरकत नाही. मात्र, या धरणातील पाणी पूर्णपणे  िपण्याच्या पाण्याकरिता आरक्षित करू  नये, अशी मागणी शेतकरी  संघटनेचे नेते ललित बहाळे यांनी केली.सोमवारी जिल्हा परिषद विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार  परिषदेत ललित बहाळे यांनी वान धरणाच्या पाण्यावर अवलंबून  शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे प्रश्न मांडले. वान धरणालगत वास् तविक पाहता अकोला जिल्हय़ातील तेल्हारा व बुलडाणा  जिल्हय़ातील संग्रामपूर हे दोन तालुके आदिवासी क्षेत्रात व  डोंगराळ भागाला लागून आहेत. अकोला शहरापासून फारच  लांब आहेत. येथे कोणत्याही प्रकारचे कारखाने व व्यापार नाही.  येथील सर्व शेतकरी हे शेतीवर अवलंबून आहेत. वान धरणा  व्यतिरिक्त येथे कोणतीही सिंचनाकरिता पाण्याची व्यवस्था नाही.  धरण उभारण्याकरिता सर्व लाभधारकांनी जमिनी दिल्या आहेत.  तसेच याआधी वान प्रकल्पाचे ४७ टक्के पाणी शासनाने  िपण्यासाठी तेल्हारा, अकोट ८४ खेडी, जळगाव जामोद, शेगाव  १५९ खेडी करिता आरक्षित केलेले आहे. त्यामुळे आता फक्त  ५३ टक्के पाणी सिंचनासाठी शिल्लक असल्याचे बहाळे यांनी सांगि तले. धरणात साचलेला गाळ बाष्पीभवन व गळतीमुळे होणारे  कमी पाणी याचा विचार करता फक्त प्रत्यक्षात २५ ते ३0 टक्के  पाणीच सिंचनाकरिता मिळणार आहे. येथील नागरिकांचे जीवन  शेतीवरच अवलंबून आहे. या योजनेमुळे शेतकरी सिंचन करू   शकणार नाहीत. त्यात शेतकरी कर्जबाजारी आहेत. लाभधारक  शेतकर्‍यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. शे तकरी वर्गावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, याकरिता  अकोला अमृत योजनेंतर्गत अकोला शहरासाठी पाण्याचा वान  धरण व्यतिरिक्त दुसरा मार्ग शोधावा, असेही बहाळे यांनी सांगि तले.शासनाच्या प्रचलित नियमानुसार फक्त धरणातून १५ टक्के पाणीच  पिण्यासाठी आरक्षित करावे व उर्वरित सिंचनासाठी ठेवावे, असा  शासनाचा नियम असताना वान धरणाचे १00 टक्के पाणी कसे  काय आरक्षित करीत आहेत, असा सवाल याप्रसंगी उपस्थित शे तकर्‍यांनी केला. यासंदर्भात गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.  रणजित पाटील यांच्याकडे निवेदन सोपविले असल्याचेही बहाळे  यांनी सांगितले. 

टॅग्स :WaterपाणीDamधरण