शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शेतक-यांनी नाफेड केंद्रावर लावल्या वाहनांच्या रांगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 23:22 IST

शेतकर्‍यांच्या मालाची खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने व नाफेडने गत काही दिवसांपासून ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. ३ ऑक्टोबरपासून १३ नोव्हेंबरपर्यंत सात हजार ६00 शेतकर्‍यांनी विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी नोंदणी केली आहे. यात उडीद व सोयाबीन विक्रीसाठी सर्वाधिक शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. 

ठळक मुद्देसात हजारांवर शेतकर्‍यांची ऑनलाइन नोंदणीउडीद, सोयाबीन विक्रीसाठी सर्वाधिक नोंदणी 

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्‍यांच्या मालाची खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने व नाफेडने गत काही दिवसांपासून ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. तूर खरेदीच्यावेळी नाफेडच्या केंद्रावर गोंधळ उडाला होता. तो पुन्हा होऊ नये, या दृष्टिकोनातून शेतमालाची ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे. ३ ऑक्टोबरपासून १३ नोव्हेंबरपर्यंत सात हजार ६00 शेतकर्‍यांनी विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी नोंदणी केली आहे. यात उडीद व सोयाबीन विक्रीसाठी सर्वाधिक शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. खरीप हंगामामध्ये सरासरी गुणवत्ता असलेल्या शेतमालाला शासनाने आधारभूत दर जाहीर केले आहेत. मूग, उडीद शेतमालाच्या खरेदीसाठी ३ ऑक्टोबरपासून शेतकर्‍यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालाची नोंदणी केल्यानंतर शेतकर्‍यांना शेतमाल कृषी उत्पन्न बाजारात समितीतील नाफेडच्या खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एक तारीख दिली जात आहे. या तारखेवर शेतकर्‍याने नाफेडच्या केंद्रावर आपला शेतमाल आणावा. नाफेड केंद्रावर हा शेतमाल आधारभूत दराने खरेदी करण्यात येत आहे. दररोज नाफेडच्या केंद्रावर १00 ते १२५ शेतकर्‍यांच्या शेतमालाची सरासरी गुणवत्ता तपासून खरेदी करण्यात येत आहे. नाफेडच्या केंद्रांवर शेतमालाच्या वाहनांच्या रांगा लागत असूून, शांततेत खरेदी करण्यात येत आहे. शेतकरी दररोज उडीद, मूग, सोयाबीन आणि तूर विक्रीसाठी आणत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्‍याद्वारे शेतमालाला आधारभूत भाव मिळत नसल्याने, शेतकर्‍यांचा कल नाफेडच्या केंद्राकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी नाफेड केंद्राने दिलेल्या तारखेवर शेतमाल आणण्यास प्राधान्य देत आहेत. शेतमालाची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी आलेल्या शेतकर्‍याच्या मोबाइलवर संदेश देण्यात येऊन शेतमाल केंद्रावर आणण्यासाठी तारीख देण्यात येत आहे. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी शेतकर्‍यांना आधार कार्ड, बँक पासबुक, सात-बारा उतारा, खरिपाच्या संपूर्ण पिकांचा पीकपेरा व त्यामध्ये काय-काय पेरणी केली आहे, याची माहिती मागितली जात आहे. 

बाजार समितीत सोयाबीनची सर्वाधिक आवकअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्यस्थितीत सोयाबीनची आवक होत असून, आतापर्यंत ४ हजार २१५ क्विंटलची आवक झाली आहे. त्यापाठोपाठ तुरीची ५९५ क्विंटल, मूग ३९0 क्विंटल, उडीद ४९६ क्विंटलची आवक झाली असून, शेतकर्‍यांचा शेतमाल विक्रीसाठी सर्वाधिक ओढा हा नाफेडच्या खरेदी केंद्रावरच असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :market yardमार्केट यार्डFarmerशेतकरी