शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
4
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
7
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
8
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
9
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
10
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
11
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
12
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
13
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
14
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
15
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
16
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
17
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
18
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
19
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
20
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?

‘लॉकडाऊन’च्या यात्रेत राजकारणाची ‘कावड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 10:08 IST

वंचित बहुजन आघाडीने या मुद्यावर राजकीय उडी घेऊन नव्या राजकारणाचे रणशिंग फुंकले आहे.

- राजेश शेगोकार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवघ्या आठ दिवसांपूर्वी अयोध्येत राममंदिराचे भूमिजूजन झाले अन् गेल्या तीन दशकांपासून देशाच्या राजकारणात केंद्रबिंदू झालेला मंदिर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. आता अकोल्यातही मंदिर हाच मुद्दा राजकीय सारीपाटावर येऊ घातला आहे. निमित्त झाले ते अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वराच्या कावड यात्रेचे. कोरोनाच्या संकटामुळे मंदिर बंद आहे व कावड यात्राही मर्यादित करण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर झाला असताना वंचित बहुजन आघाडीने या मुद्यावर राजकीय उडी घेऊन नव्या राजकारणाचे रणशिंग फुंकले आहे.अकोल्यातील कावड यात्रा महोत्सव पंचक्रोशीचा लोकोत्सव झाला आहे. संपूर्ण देशात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी होणारी एकमेव यात्रा आहे. पूर्णामायच्या जलाने राजराजेश्वरला अभिषेक घालण्याची ही परंपरा या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे धोक्यात आली. गेल्या २४ मार्चपासून देशभरातील मंदिरे व धार्मिक स्थळे बंद आहेत. त्याला राजराजेश्वराचे मंदिरही अपवाद नाही. यावर्षी होणारी कावड यात्रा ही प्रातिनिधिक स्वरूपाची राहील, असा निर्णय घेण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरे उघडा हा मुद्दा हाती घेऊन थेट राजराजेश्वराचे मंदिरच गाठले. गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडून त्यांनी हात जोडून दर्शनही घेतले अन् कावड यात्रेबाबत शासन व प्रशासनाशी बोलून निर्णय घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. खरे तर असे आश्वासन देणे हे राजकारणात नवीन नाही; मात्र अ‍ॅड. आंबेडकरांनी थेट राजराजेश्वराचे मंदिर गाठण्यामुळे या घटनेला राजकीय क्षेत्रात गांभीर्याने घेतले जात आहे.मुळातच अकोल्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष हा एकहाती वर्चस्व मिळविणारा पक्ष आहे. त्यातही अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्लाच. या मतदारसंघातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रम हा भाजपाच्या प्रभावाखालीच होत आला आहे. कावड यात्रा महोत्सव या कार्यक्रमांमधील सर्वात मोठा कार्यक्रम. अशा स्थितीत हा मुद्दा भाजपाने आक्रमक पद्धतीने हाताळण्याची अपेक्षा असताना अ‍ॅड. आंबेडकर यांनी यामध्ये थेट मंदिर गाठल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारीच बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडून प्रातिनिधिक स्वरूपात लोकभावनेला हात घालण्याची संधी असतानाही भाजपाने व शिवसेनेने ही संधी सोडली; मात्र या निमित्ताने अ‍ॅड. आंबेडकर यांनी आपण हिंदूविरोधी नसल्याचेही संकेत देण्याची संधी घेतली. खरे तर अ‍ॅड. आंबेडकरांनी लॉकडाऊनमध्ये इतर पक्षांनी दुर्लक्षित केलेल्या सर्वच प्रश्नांवर आवाज उठवला, नाभिक समाज, फेरीवाले, आदिवासी, मजूर, लहान-मोठे व्यावसायिक यांच्या उदरनिर्वाहाची सोय झाली पाहिजे म्हणून लॉकडाऊन विरोधात भूमिका घेतली व आता राज्यभरातील मंदिरांबाबत ते पुढे आले आहेत. केवळ कोरोनाच्या नावाखाली धार्मिक सण, उत्सव व परंपरा खंडित होऊ नये ही त्यांनी घेतलेली भूमिका वंचितच्या सामाजिक अभियांत्रिकीचे नवे पाऊल आहे. त्याचा राजकीय लाभ वंचितला किती मिळेल, हे काळच ठरवेल; मात्र वंचितसाठी लोकभावनेचा कोणताच मुद्दा अस्पृश्य नाही, हे या निमित्ताने त्यांनी अधोरेखित केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारण