शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

‘लॉकडाऊन’च्या यात्रेत राजकारणाची ‘कावड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 10:08 IST

वंचित बहुजन आघाडीने या मुद्यावर राजकीय उडी घेऊन नव्या राजकारणाचे रणशिंग फुंकले आहे.

- राजेश शेगोकार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवघ्या आठ दिवसांपूर्वी अयोध्येत राममंदिराचे भूमिजूजन झाले अन् गेल्या तीन दशकांपासून देशाच्या राजकारणात केंद्रबिंदू झालेला मंदिर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. आता अकोल्यातही मंदिर हाच मुद्दा राजकीय सारीपाटावर येऊ घातला आहे. निमित्त झाले ते अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वराच्या कावड यात्रेचे. कोरोनाच्या संकटामुळे मंदिर बंद आहे व कावड यात्राही मर्यादित करण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर झाला असताना वंचित बहुजन आघाडीने या मुद्यावर राजकीय उडी घेऊन नव्या राजकारणाचे रणशिंग फुंकले आहे.अकोल्यातील कावड यात्रा महोत्सव पंचक्रोशीचा लोकोत्सव झाला आहे. संपूर्ण देशात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी होणारी एकमेव यात्रा आहे. पूर्णामायच्या जलाने राजराजेश्वरला अभिषेक घालण्याची ही परंपरा या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे धोक्यात आली. गेल्या २४ मार्चपासून देशभरातील मंदिरे व धार्मिक स्थळे बंद आहेत. त्याला राजराजेश्वराचे मंदिरही अपवाद नाही. यावर्षी होणारी कावड यात्रा ही प्रातिनिधिक स्वरूपाची राहील, असा निर्णय घेण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरे उघडा हा मुद्दा हाती घेऊन थेट राजराजेश्वराचे मंदिरच गाठले. गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडून त्यांनी हात जोडून दर्शनही घेतले अन् कावड यात्रेबाबत शासन व प्रशासनाशी बोलून निर्णय घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. खरे तर असे आश्वासन देणे हे राजकारणात नवीन नाही; मात्र अ‍ॅड. आंबेडकरांनी थेट राजराजेश्वराचे मंदिर गाठण्यामुळे या घटनेला राजकीय क्षेत्रात गांभीर्याने घेतले जात आहे.मुळातच अकोल्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष हा एकहाती वर्चस्व मिळविणारा पक्ष आहे. त्यातही अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्लाच. या मतदारसंघातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रम हा भाजपाच्या प्रभावाखालीच होत आला आहे. कावड यात्रा महोत्सव या कार्यक्रमांमधील सर्वात मोठा कार्यक्रम. अशा स्थितीत हा मुद्दा भाजपाने आक्रमक पद्धतीने हाताळण्याची अपेक्षा असताना अ‍ॅड. आंबेडकर यांनी यामध्ये थेट मंदिर गाठल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारीच बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडून प्रातिनिधिक स्वरूपात लोकभावनेला हात घालण्याची संधी असतानाही भाजपाने व शिवसेनेने ही संधी सोडली; मात्र या निमित्ताने अ‍ॅड. आंबेडकर यांनी आपण हिंदूविरोधी नसल्याचेही संकेत देण्याची संधी घेतली. खरे तर अ‍ॅड. आंबेडकरांनी लॉकडाऊनमध्ये इतर पक्षांनी दुर्लक्षित केलेल्या सर्वच प्रश्नांवर आवाज उठवला, नाभिक समाज, फेरीवाले, आदिवासी, मजूर, लहान-मोठे व्यावसायिक यांच्या उदरनिर्वाहाची सोय झाली पाहिजे म्हणून लॉकडाऊन विरोधात भूमिका घेतली व आता राज्यभरातील मंदिरांबाबत ते पुढे आले आहेत. केवळ कोरोनाच्या नावाखाली धार्मिक सण, उत्सव व परंपरा खंडित होऊ नये ही त्यांनी घेतलेली भूमिका वंचितच्या सामाजिक अभियांत्रिकीचे नवे पाऊल आहे. त्याचा राजकीय लाभ वंचितला किती मिळेल, हे काळच ठरवेल; मात्र वंचितसाठी लोकभावनेचा कोणताच मुद्दा अस्पृश्य नाही, हे या निमित्ताने त्यांनी अधोरेखित केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारण