शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

‘वंचित’ करणार पराभवाचे चिंतन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 14:37 IST

वंचित बहुजन आघाडी पराभवाचे चिंतन करणार असून, पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यात येणार आहे.

- संतोष येलकरअकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांना पराभव पत्करावा लागला. २०१४ मधील निवडणुकीच्या तुलनेत ४० हजार ७२ मतांची वाढ झाली असली, तरी पराभव झाला आहे. त्यानुषंगाने मतदान केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी समोर आल्यानंतर, वंचित बहुजन आघाडी पराभवाचे चिंतन करणार असून, पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यात येणार आहे.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये ५ लाख ५४ हजार ४४४ मते प्राप्त करून २ लाख ७५ हजार ५९६ मतांची आघाडी घेत भाजपाचे अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी विजय प्राप्त केला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ७८ हजार ८४८ मते मिळाली. २०१४ मधील अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अ‍ॅड. आंबेडकर यांनी २ लाख ३८ हजार ७७६ मते प्राप्त करून ते तिसऱ्या क्रमांकावर होते. २०१९ च्या निवडणुकीत अ‍ॅड. आंबेडकर यांनी २ लाख ७८ हजार ८४८ मते प्राप्त करून, दुसºया क्रमांकावर राहिले. २०१४ मधील निवडणुकीत अ‍ॅड. आंबेडकर यांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत यावेळी ४० हजार ७२ मतांची वाढ झाली असली तरी, पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानुषंगाने मतदान केंद्रनिहाय झालेल्या मतदानाच्या आकडेवारीची माहिती प्राप्त झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पराभवाच्या कारणांची मीमांसा करण्यात येणार आहे. त्यामध्ये मते कमी मिळण्याच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर चिंतन करण्यात येणार आहे.‘अकोला पश्चिम’मध्ये मिळाली कमी मते!अकोला लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ७८ हजार ८४८ मते मिळाली. त्यामध्ये सर्वात कमी मते अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मिळाली. या मतदारसंघात अ‍ॅड. आंबेडकर यांना केवळ २३ हजार ७४१ मते मिळाली.

निवडणुकीपूर्वी अशी केली होती तयारी!लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये बुथ कमिटी बांधणी, बुथ कमिटीमधील सदस्यांना प्रशिक्षण, गाव तेथे शाखा, महिला आघाडी, युवक आघाडी शाखा स्थापन करण्यात आल्या होत्या. मतदार नोंदणीसाठी पक्षाच्यावतीने प्रयत्न करण्यात आले होते, तसेच गावा-गावांत दौरे करून मतदारांशी संवाद साधण्याचा कार्यक्रमही राबविण्यात आला होता. निवडणुकीपूर्वी सुरू केलेली तयारी आणि केलेल्या प्रयत्नांच्या आधारे लोकसभा निवडणुकीत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विजयाची अपेक्षा करण्यात येत होती; मात्र त्या तुलनेत मते मिळाली नसल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोलाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल