शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पार्किंगच्या वसुलीसाठी बनावट पावत्यांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 13:42 IST

करारनामा संपुष्टात आल्यानंतरही काही कंत्राटदारांकडून अवैधरीत्या पार्किं ग शुल्क वसूल केले जात आहे.

अकोला: शहरवासीयांच्या सुविधेसाठी निर्माण करण्यात आलेल्या पार्किंगच्या जागांचा कंत्राट संपल्यानंतरही संबंधित कंत्राटदारांकडून पार्किंग शुल्क वसुलीसाठी चक्क बनावट पावत्यांचा वापर केला जात असल्याची माहिती आहे. या प्रकाराची महापालिकेच्या अतिक्रमण व बाजार विभागाला जाणीव असतानासुद्धा या गंभीर प्रकाराकडे कानाडोळा केला जात असल्याने प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरात विविध कामानिमित्त येणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनधारकांना वाहने ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने वाहनतळांची व्यवस्था करणे क्रमप्राप्त आहे. शहराच्या विविध भागात महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा आहेत. यापैकी बाजारपेठ व इतर भागातील वाहनांसाठी प्रशासनाने २२ जागा निश्चित केल्या होत्या. सदर जागा भाडेपट्ट्यावर देण्यासाठी मनपा प्रशासनाने खासगी कंत्राटदारांसोबत करारनामे केले. कंत्राटदारांनी २२ पैकी केवळ १२ जागा निश्चित करून त्या बदल्यात मनपाकडे पैसे जमा केले. ज्या जागांच्या बदल्यात कंत्राटदारांनी महापालिकेत रक्कम जमा केली, त्या जागा वाहनधारकांच्या वाहनांसाठी उपलब्ध असणे भाग होते. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार घडत आहे. वाहनधारकांच्या कटकटीपेक्षा लघू व्यावसायिक, फेरीवाले, हातगाडी चालक, फळ विके्रत्यांना जागा दिल्यास त्यांच्याकडून जादा रक्कम वसूल करण्याचा फंडा कंत्राटदारांनी शोधून काढला. हाच कित्ता शहरात सर्वत्र राबविल्या जात आहे. अर्थातच, वाहनांसाठी राखीव असणाºया जागांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असणाºया महापालिकेच्या अतिक्रमण व बाजार विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित होतो. वाहनधारकांसाठी जागा नसल्यामुळे ते नाइलाजाने रस्त्यांवर वाहने उभी करतात. यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत असल्याचे चित्र आहे.करारनामा संपुष्टात; तरीही वसुली सुरूच!शहरात विविध मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा भाडेतत्त्वावर देण्यात आल्या. संबंधित जागांचा करारनामा संपुष्टात आल्यानंतरही काही कंत्राटदारांकडून अवैधरीत्या पार्किं ग शुल्क वसूल केले जात आहे. या प्रकाराकडे मनपाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.चौकशीचे काय झाले?मध्यंतरी या विषयावर मनपाच्या सर्वसाधारण सभागृहात नगरसेवकांनी प्रशासनावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. ही बाब लक्षात घेता, आयुक्त संजय कापडणीस यांनी संबंधित कंत्राटदारांविरोधात फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल करण्याचे निर्देश देत उपायुक्त वैभव आवारे यांना दोन दिवसांत चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्या चौकशीचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सब गोलमाल है!महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने २२ पैकी १२ जागांसाठी करारनामे केले. सदर करारनामे संपुष्टात आले असले तरी उर्वरित १० जागांचा वापर नेमका कशासाठी होतो, हे प्रशासनाने तपासण्याची गरज आहे. शिवाय, ज्या १२ जागांवर पार्किं ग स्थळ निश्चित केले होते, त्यापैकी केवळ तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असून, उर्वरित नऊ जागांवर अतिक्रमकांनी ठिय्या मांडला आहे. एकूणच, वाहनधारकांच्या सुविधेसाठी महापालिकेकडे जागा उपलब्ध असल्या तरी अतिक्रमण विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे अकोलेकरांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका