शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शकक्तिशाली सॅटेलाईट
3
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
4
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
5
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
6
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
7
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
8
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
9
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
10
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
11
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
12
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
14
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
15
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
16
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
17
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
18
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
19
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
20
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 

अवकाळीची अवकृपा; ५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By रवी दामोदर | Updated: April 8, 2023 16:32 IST

शेतकरी हतबल, मदतीची प्रतीक्षा

अकोला : जिल्ह्यात शुक्रवारी सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे व झालेल्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले नगदी पीक जमीनदोस्त झाल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आधीच शेतमालाला योग्य बाजारभाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यातच पुन्हा नैसर्गिक संकटाने तर बळीराजा आर्थिक खाईत लोटला गेला आहे. नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ५ हजार २४२ हेक्टर क्षेत्रावरील गहू, कांदा, टरबुज, पपई, भाजीपाला व लिंबू या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच १६ जनावरे दगावली असून, ४६ घरांचेही नुकसान झाले आहे. २० दिवसांमध्ये तिसऱ्यांचा गारपीटीसह पाऊस झाल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

प्रादेशीक हवामान विभागाकडून जिल्ह्यात शनिवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसारा, शुक्रवारी सकाळी उन्हाचा पारा चढत असताना अचानक काळे ढग दाटून येत वादळवाऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर अवकाळीच्या पावसाला जोरदार सुरुवात होऊन काही भागात गारपीटही झाली. या अवकाळीचा सार्वाधिक फटका पातूर तालुक्याला बसला असून, ३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके बाधित झाले. तसेच अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर तालुक्यातही अवकाळी पावसाचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्ताकडे सादर करण्यात आला असून, पंचनामे व सर्व्हेक्षणाची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

वीज पडून एकाचा मृत्यू, १६ जनावरे दगावली, ४६ घरांचे नुकसानजिल्ह्यात शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोला तालुक्यातील लोणाग्रा शिवारात अंगावर वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील १६ जनावरे दगावली आहेत. तसेच ४६ घरांचेही नुकसान झाले आहेत. त्यात ४५ घरांचे अंशत: तर १ घर जमिनदोस्त झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी