शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

अवकाळीची अवकृपा; ५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By रवी दामोदर | Updated: April 8, 2023 16:32 IST

शेतकरी हतबल, मदतीची प्रतीक्षा

अकोला : जिल्ह्यात शुक्रवारी सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे व झालेल्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले नगदी पीक जमीनदोस्त झाल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आधीच शेतमालाला योग्य बाजारभाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यातच पुन्हा नैसर्गिक संकटाने तर बळीराजा आर्थिक खाईत लोटला गेला आहे. नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ५ हजार २४२ हेक्टर क्षेत्रावरील गहू, कांदा, टरबुज, पपई, भाजीपाला व लिंबू या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच १६ जनावरे दगावली असून, ४६ घरांचेही नुकसान झाले आहे. २० दिवसांमध्ये तिसऱ्यांचा गारपीटीसह पाऊस झाल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

प्रादेशीक हवामान विभागाकडून जिल्ह्यात शनिवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसारा, शुक्रवारी सकाळी उन्हाचा पारा चढत असताना अचानक काळे ढग दाटून येत वादळवाऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर अवकाळीच्या पावसाला जोरदार सुरुवात होऊन काही भागात गारपीटही झाली. या अवकाळीचा सार्वाधिक फटका पातूर तालुक्याला बसला असून, ३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके बाधित झाले. तसेच अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर तालुक्यातही अवकाळी पावसाचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्ताकडे सादर करण्यात आला असून, पंचनामे व सर्व्हेक्षणाची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

वीज पडून एकाचा मृत्यू, १६ जनावरे दगावली, ४६ घरांचे नुकसानजिल्ह्यात शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोला तालुक्यातील लोणाग्रा शिवारात अंगावर वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील १६ जनावरे दगावली आहेत. तसेच ४६ घरांचेही नुकसान झाले आहेत. त्यात ४५ घरांचे अंशत: तर १ घर जमिनदोस्त झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी