शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मालवाहू ट्रक गेला विद्यार्थीनीच्या हातावरून; खांद्यापासून हात निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:43 IST

मूर्तीजापूर (जि. अकोला) : शाळेतून घरी परत जात असताना एका व्यक्तीचा धक्का लागल्याने सायकलवरून पडलेल्या विद्यार्थीनी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकखाली सापडली.

ठळक मुद्दे केवळ दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातातून विद्यार्थीनी वाचली असली, तरी ट्रक हातावरून गेल्याने तीचा संपूर्ण हात निकामी झाला. ही घटना मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयासमोर बुधवारी सकाळी घडली.ट्रक हातावरून गेल्यामुळे प्रियाचा उजवा हात चेंदामेंदा झाला असून, तो खांद्यापासून संपूर्ण निकामी झाला.

मूर्तीजापूर (जि. अकोला) : शाळेतून घरी परत जात असताना एका व्यक्तीचा धक्का लागल्याने सायकलवरून पडलेल्या विद्यार्थीनी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकखाली सापडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातातून विद्यार्थीनी वाचली असली, तरी ट्रक हातावरून गेल्याने तीचा संपूर्ण हात निकामी झाला. येथील  लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयासमोर बुधवारी सकाळी घडली.प्रिया गजानन वानखडे (१५) ही बुधवारी सकाळी शाळेतून सायकलद्वारे घरी परत जात होती. लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयासमोर आॅटोरिक्षा मधून उतरणारºया व्यक्तीचा धक्का लागल्याने ती सायकल वरुन खाली पडली. नेमका त्याच वेळी विरुद्ध दिशेने येत असलेला एम.पी.एच.जी. ७०७२ क्रमांकाचा ट्रक प्रियाच्या हातावरून गेला. ट्रक हातावरून गेल्यामुळे प्रियाचा उजवा हात चेंदामेंदा झाला असून, तो खांद्यापासून संपूर्ण निकामी झाला. यावेळी उपस्थित नागरिकांनी प्रियाला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात नेले. त्यानंतर तिला अकोला येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. मुळची कामठा येथील रहिवासी असलेली प्रिया ही सेंट आॅन्स स्कूल मध्ये इयत्ता नववीची विद्यार्थीनी असून, ती शिक्षणासाठी आपल्या मोठ्या वडीलांकडे मूर्तिजापूर येथे राहते. या प्रकरणी ट्रक चालक गणेश गोविंदराव पानसे रा. अचलपूर याला मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. सदर ट्रक मूर्तिजापूर येथील मूलचंद किराणा दुकानचा माल घेऊन आला होता. वृत्त लिहिस्तोवर ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.नागरिकांनी दिला ठिय्यामूर्तिजापूर येथील मुख्य रस्त्याचे काम पाच महिन्यांपासून अतिशय संथ गतीने चालू असून, एकेरी वाहतुक सुरु आहे. त्यामुळे हा अपघात झाल्याचे नागरीकांचे म्हणने आहे. संबंधीत जबाबदार अधिकाºयावर व ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी नागरीकांनी घटनास्थळी दोन तास ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणात शहर ठाणेदार यांनी मध्यस्थी करुन आंदोलकांना शांत केले. या अपघाताला संबंधित प्रशासन जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. संजय नाईक, पंडित वाघमारे, रवि राठी, अप्पू तिडके, टाले सर, सुहास सर, अ‍ॅड विपीन अग्रवाल, संजय निस्ताने, शिवा गव्हाणे, मनोज जावरकर, संजय झारोडीया, संजय वानखडे, संजय पालीवाल, संजय तिहीले, अंगद ठाकरे, नितीन वर्मा, मनोज वर्मा, अक्षय लकडे, मोहन वसूकार हे आंदोलनात सहभागी होते. (शहर प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात