शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

तिहेरी हत्याकांड हे पूर्वनियोजित कट ; हत्याकांडासाठी आरोपीने सख्ख्या भाच्याचे लग्नही टाळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 15:10 IST

या हत्याकांडच्या अनुषंगाने कानोसा घेतला असाता विष्णू इंगळे यांने शांत डोक्याने व बुधवारी दुपारीच त्याने शिवाणी व मनोजची हत्या केल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देधोतर्डी प्लॉट म्हणून ओळख असलेल्या ३५० लोकवस्तीच्या गावात विष्णू दशरथ इंगळे व त्याचे कुटुंबीय गुण्यागोविंदाने नांदत होते. क्रूर व निर्दयी पित्याने तीन मुलांची केलेली हत्या हे पूर्वनियोजित कटाचाच एक भाग असल्याची चर्चा धोतर्डी गावात आहे. धोतर्डी येथे घरी पोहोचल्यानंतर त्याने शिवाणी व मनोजला या शीतपेयातून विषारी द्रव्य दिले व दोघांनाही घराच्या आतमध्ये टाक ले.

- सचिन राऊत 

अकोला - धोतर्डी येथील एका क्रूर व निर्दयी पित्याने तीन मुलांची केलेली हत्या हे पूर्वनियोजित कटाचाच एक भाग असल्याची चर्चा धोतर्डी गावात आहे. शुक्रवारी ‘लोकमत’ ने गावात भेट देऊन या हत्याकांडच्या अनुषंगाने कानोसा घेतला असाता विष्णू इंगळे यांने शांत डोक्याने व बुधवारी दुपारीच त्याने शिवाणी व मनोजची हत्या केल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला. सर्वात मोठा मुलगा अजयने विरोध केल्यानंतर आरोपीने त्याच्या डोक्यात वरवंटा मारला त्याची हत्या त्याने सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास केली असावी असा कसासही ग्रामस्थांच्या चर्चेत आहे.धोतर्डी गावाला लागूनच असलेल्या धोतर्डी प्लॉट म्हणून ओळख असलेल्या ३५० लोकवस्तीच्या गावात विष्णू दशरथ इंगळे व त्याचे कुटुंबीय गुण्यागोविंदाने नांदत होते. त्याला तीन मुले होती. यामधील अजय हा १० व्या वर्गात नापास झाला, तर दुसऱ्या क्रमांकाची मुलगी शिवाणी इयत्ता नवव्या वर्गात अकोल्यातील सुशीलाबाई देशमुख विद्यालयात शिक्षण घेत होती. तिसरा मुलगा मनोजही ८ व्या वर्गाची परीक्षा देऊन मोकळा झाला होता. तीनही मुलांचे शिक्षण सुरू असताना वडिलांना आधार म्हणून ते शेतीत निंधनाचे काम करायचे. अशातच त्याच्या पत्नीचा वर्षभरापूर्वी कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर विष्णू इंगळे याच्यावर तीनही मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आली होती; मात्र मुलांनी वडिलांवर तो भार कधीच येऊ दिला नाही. तीनही मुले वडिलांच्या प्रचंड दबावात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वडिलांनी खायला दिले तर घ्यायचे अन्यथा उपाशी राहून ते दिवस काढायचे. तीनही मुलांना घराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती, एवढेच काय तर केवळ दोन ते तीन फूट अंतरावर आजी-आजोबा रहिवासी असताना त्यांच्याकडेही जाण्यास विष्णू इंगळे तीनही मुलांना विरोध करीत होता. विष्णू इंगळेची सख्खी बहीण खडका येथे दिली असून, तिच्या मुलाचे ८ ते ९ मे रोजी लग्न होते. या लग्नासाठी विष्णू इंगळेचे आई-वडील जाण्याची तयारी करीत असताना शिवाणीला सोबत नेणार होते; मात्र विष्णूने मुलीला जाण्यास विरोध केला. हे दोघेही खडका येथे ८ मे रोजी गेल्यानंतर ९ मे रोजी सकाळीच विष्णू हा अकोल्यात गेला होता. त्याने येथूनच मुलांसाठी शीतपेय, दारुची बॉटल खरेदी केली. दुपारी १ वाजताच्या सुमारास धोतर्डी येथे घरी पोहोचल्यानंतर त्याने शिवाणी व मनोजला या शीतपेयातून विषारी द्रव्य दिले व दोघांनाही घराच्या आतमध्ये टाक ले.जोड आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMurderखूनCrimeगुन्हा