दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी शालेय साहित्याच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST2021-07-17T04:15:42+5:302021-07-17T04:15:42+5:30
आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत अकाेला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात अनुदानित आदिवासी शाळांची संख्या १९ असून, त्यामध्ये सुमारे ६ ...

दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी शालेय साहित्याच्या प्रतीक्षेत
आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत अकाेला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात अनुदानित आदिवासी शाळांची संख्या १९ असून, त्यामध्ये सुमारे ६ हजार विद्यार्थी पटसंख्या आहे. तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये किमान ४ हजार विद्यार्थी पटसंख्या आहे. काेराेना विषाणूमुळे गतवर्षीपासून शाळा बंद असून, विद्यार्थ्यांना माेबाईलद्वारे ऑनलाईन पध्दतीने शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. काेराेनाचा प्रादुर्भाव कायम असल्यास यंदा चालू शैक्षणिक सत्रात शाळा सुरू न करता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीनुसार शिक्षण देण्याचा निर्णय आदिवासी विभागाने घेतला हाेता. ‘शिक्षण सेतू अभियान’च्या माध्यमातून यंदा तीन जिल्ह्यांतील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांपर्यंत शालेय शिक्षणाचे साहित्य उपलब्ध करून देण्याचा माेठा निर्णय घेण्यात आला. जून महिन्यापर्यंत विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या घरपाेच देण्यात आली. परंतु अद्याप अतिदुर्गम, दुर्गम व डाेंगराळ भागातील काही विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण साहित्य पाेहाेचले नसल्याची माहिती आहे.
राेजगार नसल्याने विद्यार्थी शेतात
संसर्गजन्य काेराेना विषाणूच्या काळात अनेक लहान माेठे उद्याेग, व्यवसाय काेलमडले. ग्रामीण भागात अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली. परिस्थितीचा सामना करीत दुर्गम भागातील अनेक विद्यार्थी शेतात कामाला जात असल्याने ते उपलब्ध हाेत नसल्याचे शिक्षकांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक सत्रातील पुस्तके, वह्यांचे वाटप झाले असून, इतर शैक्षणिक साहित्य लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. पावसामुळे व रस्त्यांची सुविधा नसल्याने डाेंगराळ व अतिदुर्गम भागात अडचणी येत आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे माेबाईल उपलब्ध नाहीत, त्याठिकाणी प्रत्यक्षात जाऊन शिक्षक धडे देत आहेत.
- राजेंद्र हिवराळे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विभाग, अकाेला