शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
2
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
6
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
7
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
8
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
9
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
10
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
11
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
12
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
13
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
14
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
15
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
16
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
17
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
18
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
19
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
20
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"

सिंचनाच्या पाण्याची प्रचंड नासाडी; पिकांऐवजी खुल्या जमिनीत खेळते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 14:14 IST

अकोला : गेल्या काही वर्षांत प्रथमच सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. पाटसऱ्यांतून वाटपाची पद्धत कोलमडल्याने पाणी पिकांसोबतच खुली जमीन, नाल्या, ओसाड भागात खेळत आहे.

अकोला : गेल्या काही वर्षांत प्रथमच सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. पाटसऱ्यांतून वाटपाची पद्धत कोलमडल्याने पाणी पिकांसोबतच खुली जमीन, नाल्या, ओसाड भागात खेळत आहे. त्यातून पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे. त्याचवेळी खारपाणपट्ट्यातील गावांना पंधरा दिवसांआड पाणी पुरवठा होत असून, पाटबंधारे विभागाने पाण्याची नासाडी रोखण्याची मागणी होत आहे.जिल्ह्यातील सर्व धरणात एकूण २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी यावर्षी १४० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. त्यामुळे या रब्बी हंगामात पिकांची सोय झाली आहे.बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा धरणात ६३.८६ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. या धरणातूनही १ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात येत आहे. सहा पाळीत हे पाणी सोडण्यात येत आहे. त्यातून आतापर्यंत ११ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे; मात्र पाटसºयांतून वाटप करण्यासाठी योग्य खबरदारी न घेतल्याचे खारपाणपट्ट्यातील गावांमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे, खांबोरा ६४ योजनेवर अवलंबून असलेल्या खारपाणपट्ट्यातील गावांना पंधरा दिवसांआड पाणी मिळत असताना पाण्याची नासाडी होण्याचा गंभीर प्रकार घडत आहे.काटेपूर्णा धरणातून सध्या पळसो बढे, दहीगाव (गावंडे), धोतर्डी, सांगळूद या भागांतील पिकांसाठी पाणी मिळत आहे. कालव्याद्वारे पाणी वाहत आहे. त्या कालव्याचे दरवाजे बंद न केल्याने पाणी मिळेल त्या मार्गाने धावत असल्याचे चित्र या गावांमध्ये पाहावयास मिळत आहे. पीक नसलेल्या खुल्या जागा, रस्ता दुतर्फा खोदलेल्या नाल्या, शेतातील चरांमध्ये पाणी साठत आहे. या गावांतील नाल्यांमधूनही सिंचनाचे पाणी वाहताना दिसत आहे. काही शेतकºयांनी तर जेसीबीद्वारे नाल्या खोदून पाणी घेतल्याने त्यातही पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे. पाटबंधारे विभागाचे प्रचंड दुर्लक्ष त्याचवेळी ग्रामस्थांच्या बेपवाईने पाण्याची नासाडी होत आहे. ती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी घुसर गणाच्या पंचायत समिती सदस्य रूपाली सतीश गोपनारायण यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली आहे.

लगतच्या गावांना १५ दिवसांआड पाणी६४ खेडी योजनेतून पाणी पुरवठा होणाºया खारपाणपट्ट्यातील गावांना १५ दिवसांआड पाणी मिळत आहे. घुसर, आपातापा, आपोती, कपलेश्वर, एकलारा, घुसरवाडी या गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळेल की नाही, अशी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेती