शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

टमाटे-कांदे उत्पादक शेतकरी आर्थीक संकटात; आठ-दहा रुपये किलो पलीकडे भाव जाईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:24 IST

अकोला : टमाटे आणि कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थीक संकटात सापडले आहेत. आठ ते दहा रुपये किलोच्यावर ...

अकोला : टमाटे आणि कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थीक संकटात सापडले आहेत. आठ ते दहा रुपये किलोच्यावर ठोक बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याला दररोजचा शेतमाल बाजारात आणणेदेखील परवडत नसल्याची स्थिती आहे. भाव मिळत नसल्याने अनेकदा आणलेला माल बाजारपेठेत फेकून देण्याची वेळ शेतकºयावर येत असल्याचे विदारक चित्र आहे.बुलडाणा परिसरातील टमाटे उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अकोला बाजारपेठेत येतात. टमाट्यांची आवक सातत्याने वाढत असल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे मध्यंतरी टमाट्यांवर कीड पडल्याने टमाट्यांचे भाव घसरले. ते अजूनही जागेवर आलेले नाही. टमाट्यांची बाजारपेठ सावरलेली नसताना कांद्याचे भाव आता पडले आहे. हिरवा कांदा आणि मोठा कांद्याचेही भाव आठ ते दहा रुपये किलोच्या पलीकडे जात नसल्याने शेतकरी हादरले आहेत. वाढत्या पेट्रोल-डीझलच्या भाववाढीमुळे शेतमाल आणण्यासाठी ठरावीक रक्कम मोजावीच लागते. बाजारपेठेत आल्यानंतर मात्र पाहिजे तेवढी किंमत मिळत नसल्याने शेतकºयांचे हाल होत आहेत. अनेकदा आठ रुपयांच्या खालीदेखील टमाटे-कांद्याचे भाव घसरत असल्याने हा माल अडते मागतील त्या भावात सोडण्याची वेळ आली आहे. जर भावच मिळाला नाही, तर अनेकदा शेतकरी आपल्या कांद्याचा माल उघड्यावर टाकून जात आहेत. कारण परत नेला तर पुन्हा वाहतुक खर्च द्यावा लागेल. त्यापेक्षा मिळेल त्या भावाने शेतमाल विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

 भाजीपाल्याचे ठोकचे भाव(प्रतिकिलो ग्रॅम)पालक १०-१२ रुपये, मेथी १२-१५, कारले १८-२०, चवळी शेंग १८-२०, वालशेंग १८-२०, वांगे १८-२०, लवकी १८-२०, भेंडी २५-३०, हिरवे वाटाणे २२-२५, गाजर १२-१५, शेपू २२-२५, आलू १३-१५, हिरवी मिरची १५-२०, फुलकोबी-पत्ताकोबी १०-१२, गवार शेंग २२-२५, तुरई २०-२५, सांभार १०-१२ असे आहे. 

परिसरातील शेतकºयांना फटकाअकोला जिल्ह्यातील चांदुर, खडकी, अकोट, बाळापूर, पातूर परिसरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. यामध्ये हिरवा ताजा कांदाही आहे. अकोला बाजारपेठेत हिरवा कांदा आणणाºया उत्पादकांना पडलेल्या बाजारभावाचा सामना करावा लागत आहे. अंतर आणि प्रवास खर्च सोसणे सोयीस्कर असल्याने परिसरातील शेतकºयांना अकोला बाजारपेठेशिवाय दुसरा पर्याय आजतरी उपलब्ध नाही.

 

टॅग्स :Akolaअकोलाvegetableभाज्याFarmerशेतकरी