तीन लाख शेतक-यांना मिळणार मदतीचा आधार

By Admin | Updated: December 12, 2014 01:25 IST2014-12-12T01:23:06+5:302014-12-12T01:25:54+5:30

‘पॅकेज’ जाहीर झाल्याने जिल्ह्यातील शेतक-यांना दिलासा.

Three lakh farmers will be able to get help | तीन लाख शेतक-यांना मिळणार मदतीचा आधार

तीन लाख शेतक-यांना मिळणार मदतीचा आधार

संतोष येलकर / अकोला
अत्यल्प पाऊस, हातून गेलेली पिके आणि नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांकडून सरकारी मदतीची प्रतीक्षा केली जात असतानाच, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी अखेर गुरुवारी राज्य सरकारमार्फत सात हजार कोटी रुपयांचे ह्यपॅकेज ह्णजाहीर करण्यात आले. सरकारी मदतीच्या या पॅकेजमध्ये जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांना मदतीचा आधार मिळणार आहे.
यावर्षीच्या पावसाळय़ात तब्बल दीड महिना पावसाने मारलेली दांडी आणि त्यानंतर अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यात खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले. दुबार-तिबार पेरणी करूनही अनेक भागात सोयाबीनचे पीक उगवले नाही. उगवलेल्या सोयाबीन पिकाचे एकरी ५0 किलो ते एक क्विंटलपर्यंत उत्पादन झाले. सोयाबीन सोबतच कपाशी पिकांच्या उत्पादनातही कमालीची घट झाली. रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली; मात्र पावसाअभावी जमिनीतील ओल खोल खेल्याने, रब्बी पिकांचेही काही खरे नसल्याने नापिकीच्या परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. सर्वच पिकांचे उत्पादन बुडाल्याने, नापिकीच्या परिस्थितीत जिल्ह्यातील सातही तालुक्यातील सर्वच गावांची खरीप पिकांची सरासरी पैसेवारी केवळ ४१ पैसे आहे. त्यामुळे जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीचे चित्र स्पष्ट झाले. यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण ४ लाख १८ हजार ९१४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल ४ लाख १६ हजार ७९५ हेक्टर ९२ आर क्षेत्रावरील पिकांचे क्षेत्र बाधित झाले. त्यामध्ये जिरायती, बागायती आणि फळपिकांच्या क्षेत्राचा समावेश आहे. पिके हातून गेल्याने जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारकांसह जिल्ह्यातील २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांना नापिकीचा फटका बसला. नापिकीमुळे दुष्काळी दुष्टचक्रात सापडल्याच्या स्थितीत सरकारकडून मदतीचा आधार केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा शेतकर्‍यांकडून केली जात असतानाच, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारकडून सात हजार कोटींचे ह्यपॅकेजह्ण जाहीर करण्यात आले. सरकारच्या या पॅकेजमध्ये दुष्काळाच्यास झळा सहन करणार्‍या शेतकर्‍यांसाठी ३ हजार ९२५ कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख १८ हजार ९१४ हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांपोटी २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांना मदतीचा लाभ मिळेल.

Web Title: Three lakh farmers will be able to get help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.