शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

ग्रामस्थांची तहान ‘झिऱ्यां’वर!

By admin | Updated: May 1, 2017 02:59 IST

पाणी टंचाई : खारपाणपट्ट्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट

अकोला : तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा योजनांतर्गत १५ ते २० दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो, त्यातही काही गावांना पाणी मिळते. काही गावांपर्यंत पाणी पोहोचतच नाही, त्यामुळे नाल्यांमधील ‘झिऱ्यां’च्या दूषित पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात अकोला तालुक्यातील ६४ गावांना खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु योजनेंतर्गत गावांमध्ये सध्या १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रामुख्याने खारपाणपट्ट्यातील घुसर, खोबरखेड, मारोडी, आपोती बु., आपोती खुर्द, आपातापा, आखतवाडा, अनकवाडी, लाखोंडा बु., म्हातोडी, घुसरवाडी, कासली बु., केळीवेळी, दोनवाडा आणि किनखेड इत्यादी गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याची स्थिती आहे. नळांना पाणी आल्यानंतर ग्रामस्थांना पिण्याचे पाणी साठवून ठेवावे लागत आहे; मात्र वीस दिवस पुरेल एवढे पाणी साठविणे शक्य नसल्याने, सर्वसामान्य ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी काम-धंदा सोडून पायपीट करावी लागत आहे. खारपाणपट्टा असल्याने, गोड पाण्याचे स्रोत उपलब्ध नसल्याच्या स्थितीत ग्रामस्थांना नाल्यांमधील दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. नाल्यांमधील ‘झिऱ्यां’वर पाणी भरण्यासाठी आणि गावापासून दोन-तीन कि.मी. अंतरावर हातपंपावरून पाणी भरण्यासाठी तापत्या उन्हाची पर्वा न करता गावांमधील महिला-पुरुषांना पायपीट करावी लागत आहे, तर काही गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेच्या ‘व्हॉल्व्ह’मधून वाहणाऱ्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत असून, काही गावांमध्ये पाण्याची ‘कॅन’ विकत घेऊन तहान भागविण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.पाण्याविना टाक्या बिनकामाच्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी गावागावांत बांधण्यात आलेल्या टाक्यांमध्ये पाणीपुरवठा होत नाही. १५ ते २० दिवसांनंतर घरातील नळांना पाणीपुरवठा होतो; मात्र ज्यांच्या घरी नळ किंवा ज्या भागात पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहोचत नाही, अशा भागातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे खारपाणपट्ट्यातील बारुला भागात घुसर, आपोती व इतर गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी बांधण्यात आलेल्या टाक्या पाण्याविना बिनकामाच्या ठरल्याचे वास्तव आढळून आले.पाण्याअभावी लग्न बाहेरगावी करण्याची वेळ !पाणीपुरवठा योजनेंतर्गत नळांना १५ ते २० दिवसाआड पाणी येते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ‘झिऱ्या’तील पाण्याचा वापर करावा लागतो. रात्रंदिवस ‘झिऱ्या’वर काढावी लागते. त्यामुळे पाण्याअभावी मुला-मुलींचे लग्न पिण्याचे पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी बाहेरगावी नातेवाइकांकडे करण्याची वेळ खारपाणपट्ट्यातील ‘बारुला’ भागात ग्रामस्थांवर आल्याचे वास्तव आहे.पाणी नाही; जनावरे मोकळे सोडण्याची आली वेळ !माणसांना पिण्यासाठी पाणी नाही,तिथे जनावरांची तहान कशी भागविणार, असा प्रश्न निर्माण झाल्याने, तहान भागविण्यासाठी जनावरे मोकळे सोडण्याची वेळ आली आहे, असे मारोडी येथील ग्रामस्थांनी सांगितले.पूर्णेचे पाणी पियायोग्य नाहीगावातून पूर्णा नदी वाहत असली, तरी नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ दोनवाडा येथील ग्रामस्थांवर आली आहे. गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोला नाल्यातील झिरे आणि गावापासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या हिंगणी येथून बैलगाडी, मोटारसायकल, सायकलवरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.कपडे धुण्यासाठी नाल्यातील ‘झिऱ्या’ वरपिण्यासाठी नळाचे पाणी मिळत नसल्याच्या स्थितीत म्हातोडी येथील महिलांना कपडे धुण्यासाठी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणार नाल्यातील ‘झिऱ्या’वर जावे लागत आहे. ‘झिऱ्या’तील हिरव्या घाण पाण्याचा कपडे धुण्यासाठी वापर करावा लागत आहे.‘झिऱ्या’तील पाणी कपडे धुण्यायोग्य नाही, पाण्याची दुर्गंधी येते; मात्र दुसरा पर्याय नसल्याने, या पाण्याचा कपडे धुण्यासाठी वापर करावा लागत असल्याची व्यथा म्हातोडी येथील सुनीता इंगळे, माला अवचार, मंदा इंगळे यांनी व्यक्त केली. नळांना किमान आठ दिवसातून पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.