शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

ग्रामस्थांची तहान ‘झिऱ्यां’वर!

By admin | Updated: May 1, 2017 02:59 IST

पाणी टंचाई : खारपाणपट्ट्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट

अकोला : तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा योजनांतर्गत १५ ते २० दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो, त्यातही काही गावांना पाणी मिळते. काही गावांपर्यंत पाणी पोहोचतच नाही, त्यामुळे नाल्यांमधील ‘झिऱ्यां’च्या दूषित पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात अकोला तालुक्यातील ६४ गावांना खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु योजनेंतर्गत गावांमध्ये सध्या १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रामुख्याने खारपाणपट्ट्यातील घुसर, खोबरखेड, मारोडी, आपोती बु., आपोती खुर्द, आपातापा, आखतवाडा, अनकवाडी, लाखोंडा बु., म्हातोडी, घुसरवाडी, कासली बु., केळीवेळी, दोनवाडा आणि किनखेड इत्यादी गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याची स्थिती आहे. नळांना पाणी आल्यानंतर ग्रामस्थांना पिण्याचे पाणी साठवून ठेवावे लागत आहे; मात्र वीस दिवस पुरेल एवढे पाणी साठविणे शक्य नसल्याने, सर्वसामान्य ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी काम-धंदा सोडून पायपीट करावी लागत आहे. खारपाणपट्टा असल्याने, गोड पाण्याचे स्रोत उपलब्ध नसल्याच्या स्थितीत ग्रामस्थांना नाल्यांमधील दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. नाल्यांमधील ‘झिऱ्यां’वर पाणी भरण्यासाठी आणि गावापासून दोन-तीन कि.मी. अंतरावर हातपंपावरून पाणी भरण्यासाठी तापत्या उन्हाची पर्वा न करता गावांमधील महिला-पुरुषांना पायपीट करावी लागत आहे, तर काही गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेच्या ‘व्हॉल्व्ह’मधून वाहणाऱ्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत असून, काही गावांमध्ये पाण्याची ‘कॅन’ विकत घेऊन तहान भागविण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.पाण्याविना टाक्या बिनकामाच्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी गावागावांत बांधण्यात आलेल्या टाक्यांमध्ये पाणीपुरवठा होत नाही. १५ ते २० दिवसांनंतर घरातील नळांना पाणीपुरवठा होतो; मात्र ज्यांच्या घरी नळ किंवा ज्या भागात पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहोचत नाही, अशा भागातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे खारपाणपट्ट्यातील बारुला भागात घुसर, आपोती व इतर गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी बांधण्यात आलेल्या टाक्या पाण्याविना बिनकामाच्या ठरल्याचे वास्तव आढळून आले.पाण्याअभावी लग्न बाहेरगावी करण्याची वेळ !पाणीपुरवठा योजनेंतर्गत नळांना १५ ते २० दिवसाआड पाणी येते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ‘झिऱ्या’तील पाण्याचा वापर करावा लागतो. रात्रंदिवस ‘झिऱ्या’वर काढावी लागते. त्यामुळे पाण्याअभावी मुला-मुलींचे लग्न पिण्याचे पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी बाहेरगावी नातेवाइकांकडे करण्याची वेळ खारपाणपट्ट्यातील ‘बारुला’ भागात ग्रामस्थांवर आल्याचे वास्तव आहे.पाणी नाही; जनावरे मोकळे सोडण्याची आली वेळ !माणसांना पिण्यासाठी पाणी नाही,तिथे जनावरांची तहान कशी भागविणार, असा प्रश्न निर्माण झाल्याने, तहान भागविण्यासाठी जनावरे मोकळे सोडण्याची वेळ आली आहे, असे मारोडी येथील ग्रामस्थांनी सांगितले.पूर्णेचे पाणी पियायोग्य नाहीगावातून पूर्णा नदी वाहत असली, तरी नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ दोनवाडा येथील ग्रामस्थांवर आली आहे. गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोला नाल्यातील झिरे आणि गावापासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या हिंगणी येथून बैलगाडी, मोटारसायकल, सायकलवरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.कपडे धुण्यासाठी नाल्यातील ‘झिऱ्या’ वरपिण्यासाठी नळाचे पाणी मिळत नसल्याच्या स्थितीत म्हातोडी येथील महिलांना कपडे धुण्यासाठी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणार नाल्यातील ‘झिऱ्या’वर जावे लागत आहे. ‘झिऱ्या’तील हिरव्या घाण पाण्याचा कपडे धुण्यासाठी वापर करावा लागत आहे.‘झिऱ्या’तील पाणी कपडे धुण्यायोग्य नाही, पाण्याची दुर्गंधी येते; मात्र दुसरा पर्याय नसल्याने, या पाण्याचा कपडे धुण्यासाठी वापर करावा लागत असल्याची व्यथा म्हातोडी येथील सुनीता इंगळे, माला अवचार, मंदा इंगळे यांनी व्यक्त केली. नळांना किमान आठ दिवसातून पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.