शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

महामार्ग रुंदीकरणासाठी निंबाच्या ९९७ वृक्षांसह हजारो झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 15:51 IST

राज्य महामार्ग क्रमांक २८२ रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली हिरवीगार महाकाय निंबाच्या ९९७ झाडांची कत्तल करण्यात येत आहे.

- संजय उमक  लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: अंजनगाव, दर्यापूर, मूर्तिजापूर राज्य महामार्ग क्रमांक २८२ रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली हिरवीगार महाकाय निंबाच्या ९९७ झाडांची कत्तल करण्यात येत आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वन विभागाकडून त्यासाठी रीतसर परवानगी घेतली असली तरी पर्यावरणाचा ºहास होत आहे.एकीकडे शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रचंड पैसा खर्ची घालत असताना शासनाकडूनच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होताना दिसते. याच पद्धतीने अंजनगाव-दर्यापूर-मूर्तिजापूर या ५२ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या कामाने गती घेतली आहे. रस्त्याचे ७ मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रुंदीकरणादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व दीड-दोनशे वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या निंबाच्या ९९७ व बाभळीसह हजारो महाकाय वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे.कडूलिंबाचा. पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये याचा उपयोग होत आला आहे. मेलिएसी (म्हणजे निंब) कुळातील हा वृक्ष असून, त्याचे शास्त्रीय नाव अ‍ॅझॅडिराक्टा इंडिका असे आहे. द. भारत, कर्नाटक, श्रीलंका, मलेशिया व ब्रह्मदेश या प्रदेशांत म्यानमार हा वृक्ष आढळतो. अशा वृक्षतोडीने आता आयुर्वेदात मानाचे स्थान असलेल्या निंबाच्या व बाभळीच्या झाडांचे भवितव्य धोक्यात आले आहे.२०१७-१८ च्या अर्थसंकल्प कार्यक्रमांतर्गत, १३१ कोटी रुपये खर्चून ५२ किलोमीटर बांधण्यात येणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली हजारो झाडे मुळापासून उपटून काढावी लागणार आहे. त्यासाठी झाडांना जमीनदोस्त करण्यासाठी किमान २० लोकांची टीम काम करीत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही बाजूंनी उभी असलेली हजारो झाडे कापण्यासाठी वन विभागाकडे तशी रीतसर परवानगीसुद्धा मागितली आहे. या वृक्षतोडीने प्रवाशांना अथवा वाटसरूंना विसाव्यासाठी एकही झाड शिल्लक राहणार नसल्याने वृक्षप्रेमी वर्गात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. तोडलेल्या झाडांच्या पाचपट झाडांची लागवड संबंधितांनी करावी व त्याचे संगोपन करून ती मोठी करावी, अशी मागणीही याप्रसंगी होत आहे.

शासनाकडून रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली वृक्ष तोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि खेदजनक आहे. यामुळे पर्यावरणाचा प्रचंड ºहास होणार आहे. वृक्षतोड थांबविण्यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. यापूर्वी संबंधित विभागाला लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे.- सतीश अग्रवाल,पर्यावरणप्रेमी, मूर्तिजापूर

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरhighwayमहामार्ग