शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्णांचा संबंध तंबाखूशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:14 IST

भारतातही तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्या मोठी असून, देशातील एकूण कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे तंबाखूशी संबंधित असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

ठळक मुद्दे जगात दरवर्षी साधारणत: ६० लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनामुळे होतो.हे असेच सुरु राहिले तर २०३० पर्यंत तंबाखूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ८० लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.यंदाच्या जागतिक तंबाखूविरोधी दिनाची संकल्पना ‘तंबाखू व हृदयरोग’ ही आहे.

अकोला : तंबाखू सेवन हे जगातील अनेक आजार आणि मृत्यूचे मोठे कारण आहे. जगात दरवर्षी साधारणत: ६० लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनामुळे होतो. हे असेच सुरु राहिले तर २०३० पर्यंत तंबाखूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ८० लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. भारतातही तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्या मोठी असून, देशातील एकूण कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे तंबाखूशी संबंधित असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.भारतात सध्या सुमारे २५ लाख कर्करुग्ण आहेत. त्यात दरवर्षी ७ लाख लोकांची भर पडते. पुरुषांमधील आणि स्त्रियांमधील कर्करोग हे भिन्न स्वरूपाचे आहेत. पुरुषांची जीवनशैलीच मुळात घातक आहे. एकूण कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्णांचा संबंध तंबाखूशी आहे. धूम्रपानामुळे कर्करोग झालेले जगभरात आहेत. भारतात मात्र बिडी ओढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. खैनी आणि त्यासोबत चुना (घोटा) याची गोळी गाल आणि जबड्याच्या मध्ये किंवा जिभेखाली ठेवली जाते. त्यामुळे तोंडाचा कर्करोग होतो. अशा पदार्थांच्या अतिसेवनामुळे मेंदूवर परिणाम होऊन चिडचिडपणा, अस्वस्थपणा वाढतो, तंबाखूजन्य पदार्थ न मिळाल्यास बेचैनी वाढते. गरोदर मातावर विशेष परिणाम होऊन कमी दिवसाचे, कमी वजनाचे मूल जन्मते किंवा मृत्युमुखी पडते, तसेच लहान मुलांच्या वाढीवर परिणाम होऊन त्याची वाढ खुंटते. सिगारेटच्या धुरामुळे लहान मुलांवर परिणाम होतो.धूम्रपान हे हृदयविकाराचे महत्त्वाचे कारणयंदाच्या जागतिक तंबाखूविरोधी दिनाची संकल्पना ‘तंबाखू व हृदयरोग’ ही आहे. हृदयविकारासाठी कारणीभूत असणाºया दहा गोष्टींमध्ये धूम्रपानाचा (चेन स्मोकर) समावेश आहे. धूम्रपानावर नियंत्रण मिळविल्यास हृदयविकाराचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होते, असे जर्नल आॅफ अमेरिकन कॉलेज आॅफ कार्डिओलॉजीच्या सप्टेंबर २००९ च्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे.नियंत्रणासाठी ‘कोटपा अ‍ॅक्ट’तंबाखू नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी ‘कोटपा अ‍ॅक्ट’ (तंबाखू नियंत्रण कायदा) २००३ तयार करण्यात आला. हा कायदा भारतात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे नियमन करतो. यामध्ये १८ वर्षांखालील व्यक्तींना तंबाखू विकता येत नाही. शाळेपासून १०० मीटरच्या परिसरात पानटपरीला परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी, अशी काही बंधने आहेत.तंबाखूयुक्त पदार्थाचे वाढते सेवन हा जागतिक स्वरूपाचा गंभीर प्रश्न बनला आहे. अशा घातक पदार्थांचे सेवन न करणे कधीही चांगले. यासाठी तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्परिणामाची जाणीव जनतेला करून देणे गरजेचे आहे.-डॉ. राजेश रांदड, मुुख कर्करोग तज्ज्ञ, अकोला.व्यसने ही कायद्याच्या धाकाने सुटणे कठीण आहेत. त्यासाठी योग्य समुपदेशन आणि सकारात्मक कृतीची गरज आहे. त्या अनुषंगाने व्यसनाधीन माणसांची व्यसन सोडण्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीद्वारे तशी कृती होताना दिसत असेल तरच ‘जागतिक तंबाखू विरोधी दिवस’ साजरा झाला, असे म्हणता येईल.डॉ. प्रीती कोगदे (कवळकर), जिल्हा सल्लागार, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य