शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्णांचा संबंध तंबाखूशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:14 IST

भारतातही तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्या मोठी असून, देशातील एकूण कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे तंबाखूशी संबंधित असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

ठळक मुद्दे जगात दरवर्षी साधारणत: ६० लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनामुळे होतो.हे असेच सुरु राहिले तर २०३० पर्यंत तंबाखूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ८० लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.यंदाच्या जागतिक तंबाखूविरोधी दिनाची संकल्पना ‘तंबाखू व हृदयरोग’ ही आहे.

अकोला : तंबाखू सेवन हे जगातील अनेक आजार आणि मृत्यूचे मोठे कारण आहे. जगात दरवर्षी साधारणत: ६० लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनामुळे होतो. हे असेच सुरु राहिले तर २०३० पर्यंत तंबाखूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ८० लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. भारतातही तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्या मोठी असून, देशातील एकूण कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे तंबाखूशी संबंधित असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.भारतात सध्या सुमारे २५ लाख कर्करुग्ण आहेत. त्यात दरवर्षी ७ लाख लोकांची भर पडते. पुरुषांमधील आणि स्त्रियांमधील कर्करोग हे भिन्न स्वरूपाचे आहेत. पुरुषांची जीवनशैलीच मुळात घातक आहे. एकूण कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्णांचा संबंध तंबाखूशी आहे. धूम्रपानामुळे कर्करोग झालेले जगभरात आहेत. भारतात मात्र बिडी ओढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. खैनी आणि त्यासोबत चुना (घोटा) याची गोळी गाल आणि जबड्याच्या मध्ये किंवा जिभेखाली ठेवली जाते. त्यामुळे तोंडाचा कर्करोग होतो. अशा पदार्थांच्या अतिसेवनामुळे मेंदूवर परिणाम होऊन चिडचिडपणा, अस्वस्थपणा वाढतो, तंबाखूजन्य पदार्थ न मिळाल्यास बेचैनी वाढते. गरोदर मातावर विशेष परिणाम होऊन कमी दिवसाचे, कमी वजनाचे मूल जन्मते किंवा मृत्युमुखी पडते, तसेच लहान मुलांच्या वाढीवर परिणाम होऊन त्याची वाढ खुंटते. सिगारेटच्या धुरामुळे लहान मुलांवर परिणाम होतो.धूम्रपान हे हृदयविकाराचे महत्त्वाचे कारणयंदाच्या जागतिक तंबाखूविरोधी दिनाची संकल्पना ‘तंबाखू व हृदयरोग’ ही आहे. हृदयविकारासाठी कारणीभूत असणाºया दहा गोष्टींमध्ये धूम्रपानाचा (चेन स्मोकर) समावेश आहे. धूम्रपानावर नियंत्रण मिळविल्यास हृदयविकाराचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होते, असे जर्नल आॅफ अमेरिकन कॉलेज आॅफ कार्डिओलॉजीच्या सप्टेंबर २००९ च्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे.नियंत्रणासाठी ‘कोटपा अ‍ॅक्ट’तंबाखू नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी ‘कोटपा अ‍ॅक्ट’ (तंबाखू नियंत्रण कायदा) २००३ तयार करण्यात आला. हा कायदा भारतात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे नियमन करतो. यामध्ये १८ वर्षांखालील व्यक्तींना तंबाखू विकता येत नाही. शाळेपासून १०० मीटरच्या परिसरात पानटपरीला परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी, अशी काही बंधने आहेत.तंबाखूयुक्त पदार्थाचे वाढते सेवन हा जागतिक स्वरूपाचा गंभीर प्रश्न बनला आहे. अशा घातक पदार्थांचे सेवन न करणे कधीही चांगले. यासाठी तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्परिणामाची जाणीव जनतेला करून देणे गरजेचे आहे.-डॉ. राजेश रांदड, मुुख कर्करोग तज्ज्ञ, अकोला.व्यसने ही कायद्याच्या धाकाने सुटणे कठीण आहेत. त्यासाठी योग्य समुपदेशन आणि सकारात्मक कृतीची गरज आहे. त्या अनुषंगाने व्यसनाधीन माणसांची व्यसन सोडण्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीद्वारे तशी कृती होताना दिसत असेल तरच ‘जागतिक तंबाखू विरोधी दिवस’ साजरा झाला, असे म्हणता येईल.डॉ. प्रीती कोगदे (कवळकर), जिल्हा सल्लागार, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य