तेलबिया साठा मर्यादेचे निर्बंध नकोच!
By Admin | Updated: October 30, 2015 02:18 IST2015-10-30T01:32:42+5:302015-10-30T02:18:11+5:30
‘लोकमत’ परिचर्चेत उमटला सूर; भाववाढ नियंत्रणासाठी तूर डाळ साठय़ावर नियंत्रण योग्य.
_ns.jpg)
तेलबिया साठा मर्यादेचे निर्बंध नकोच!
अकोला: तूर डाळीच्या भाववाढ नियंत्रणासाठी डाळीच्या साठा र्मयादेवर निर्बंध योग्य असले तरी, त्यामध्ये सोयाबीनसह तेलबियांच्या साठा र्मयादेवरही निर्बंध लादण्यात आल्याने, शेतकर्यांकडील सोयाबीन घेण्यास धजावत नाहीत. तसेच सोयाबीनचे भावदेखील कमी झाल्याने, शेतकरी अडचणीत सापडला. त्यामुळे तेलबियांच्या साठय़ासाठी र्मयादेचे निर्बंध नकोच, असा सूर ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत गुरुवारी उमटला. तूर डाळीच्या भाववाढ नियंत्रणासाठी शासनाच्या पुरवठा विभागामार्फत तूर डाळीसह सोयाबीन व इतर तेलबिया साठेबाजीविरुद्ध धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. महागाई कमी करण्यासाठी तूर डाळीच्या साठेबाजीविरोधात कारवाई झाली पाहिजे; मात्र त्यामध्ये तूर डाळीसह सोयाबीन व इतर तेलबियांच्या साठा र्मयादेचेही निर्बंध लावण्यात आले आहेत. र्मयादेपेक्षा जास्त साठा करता येत नसल्याच्या कारणामुळे शेतकर्यांचे सोयाबीन खरेदी करण्यास व्यापार्यांकडून कानाडोळा करण्यात येत असून, याच कारणामुळे सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. महागाई कमी करण्यासाठी तूर डाळीच्या साठेबाजीविरुद्ध कारवाई करण्याच्या नावाखाली शेतकर्यांच्या तुरीला भाव कमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच शेतीमालाच्या साठवणूक र्मयादेचे निर्बंध घालण्याऐवजी उत्पादन कसे वाढेल, याबाबत विचार करण्याची गरज असल्याचा विचारही यावेळी मांडण्यात आला. या परिचर्चेत ललित बहाळे, मनोज खंडेलवाल, वसंत बाछुका,- मधुकरराव सरप, अरुण काळे, नरेश बियाणी,कैलास खंडेलवाल, द्वारकादास चांडक आदी मान्यवर सहभागी झाले होते.