शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
8
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
9
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
12
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
13
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
14
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
15
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
16
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
17
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
18
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
19
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
20
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP

मतदारांसाठी केंद्रांमध्ये पाणी, स्वच्छतागृहही नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 14:52 IST

अकोला: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाच्या गुडमॉर्निंग पथकांकडून ग्रामस्थांना उघड्यावर जाण्यापासून मज्जाव केला जात आहे

- सदानंद सिरसाटअकोला: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाच्या गुडमॉर्निंग पथकांकडून ग्रामस्थांना उघड्यावर जाण्यापासून मज्जाव केला जात आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील ३३ शाळांमध्ये असलेल्या निवडणूक मतदान केंद्रात पाणी, प्रसाधनगृहांचीही सुविधा नाहीत. त्याशिवाय, दिव्यांगासाठी रॅम्प, वीजपुरवठा, लाकडी साहित्य नसलेल्या शाळांची संख्या मिळून ११६ केंद्रात या सुविधांशिवाय मतदान प्रक्रिया कशी पार पाडता येईल, असा प्रश्न आता आयोगाच्या पत्रामुळे उपस्थित झाला आहे.लोकसभा निवडणुकीसाठी ग्रामीण भागातील सर्वच शाळा सुस्थितीत असणे आयोगाने बंधनकारक केले आहे. त्यामध्ये विविध निकषांनुसार मतदार केंद्रात सोयी-सुविधा ठेवाव्या लागतात. मतदान केंद्र म्हणून निश्चित झालेल्या अकोला जिल्ह्यातील १६६ केंद्रात मूलभूत सुविधाच उपलब्ध नसल्याचा अहवाल निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे मतदारांसह मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त पथकातील सदस्यांचीही गैरसोय होऊ शकते. मतदान केंद्रातील समस्या तातडीने निकाली काढून तसा अहवाल निवडणूक आयोगाने मागवला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, नगर परिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देत तातडीने सुविधा निर्माण करण्याचे बजावण्यात आले.- स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निधीचीही अडचणआयोगाने मतदान केंद्रात सुविधा निर्माण करण्याचा आदेश तर दिला. त्यासाठी लागणाºया निधीची तरतूद कोठून उपलब्ध करावी, ही समस्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उभी ठाकली आहे. दुरुस्तीसाठी निधी नसताना सुविधा कशा द्याव्या, यावर आता संस्था अडचणीत आल्या आहेत.- जिल्ह्यात सुविधा नसलेली केंद्रेमतदानासाठी येणाºयांना किमान सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी आयोगाची आहे. जिल्ह्यातील १६६ केंद्रांत सुविधांचा अभाव आहे. त्यामध्ये दिव्यांगासाठी रॅम्प नसलेल्या ८२ शाळा, पाणी नसलेल्या-२२, वीज नसलेल्या ३०, स्वच्छता गृह नसलेल्या ११, तर १८ शाळांमध्ये लाकडी साहित्यही नाही. मतदान केंद्रातील काही सुविधांसाठी आयोगाकडून काही प्रमाणात निधीही खर्च केला जातो; मात्र मूलभूत सुविधांसाठीचा खर्च कोण करणार, यावर घोडे अडण्याची शक्यता आहे.- जिल्हा परिषदेच्या शाळा शिकस्तदरम्यान, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभागाच्या माहितीनुसार २५७ शाळा नादुरुस्त आहेत. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार शिकस्त शाळा पाडण्यासाठी १०९, त्यानंतर १० शाळांचे प्रस्ताव पाठवण्यात आले. त्यांना मंजूर मिळाली. तर १३४ शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव आहेत.

- विधानसभा मतदारसंघनिहाय सुविधा नसलेले केंद्रविधानसभा                                         अभाव असलेले केंद्रअकोला पूर्व                                                  १६अकोला पश्चिम                                           ११बाळापूर                                                        ४३अकोट                                                          ७२मूर्तिजापूर                                                    ११

 

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान