शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

शिक्षक घडविण्याचे धडे देण्यासाठी शिक्षकच नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 13:40 IST

संजय खांडेकरअकोला : शिक्षक घडविण्याचे धडे देणाºया अकोल्यातील शासकीय अध्यापिका विद्यालयात गत सहा महिन्यांपासून शिक्षक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शासकीय अध्यापिका विद्यालयातील प्रथम वर्षाला सात आणि द्वितीय वर्षाला १४, अशा एकूण २१ विद्यार्थिनींना अभ्यासक्रमाचे धडे देण्यासाठी केवळ दोन शिक्षक आहेत. त्यामुळे अकोल्यातील अध्यापिका विद्यालयातील भावी शिक्षकांचे भवितव्य अंधारात ...

ठळक मुद्देशासकीय अध्यापिका विद्यालयात २१ विद्यार्थी दोन शिक्षक

संजय खांडेकर

अकोला : शिक्षक घडविण्याचे धडे देणाºया अकोल्यातील शासकीय अध्यापिका विद्यालयात गत सहा महिन्यांपासून शिक्षक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शासकीय अध्यापिका विद्यालयातील प्रथम वर्षाला सात आणि द्वितीय वर्षाला १४, अशा एकूण २१ विद्यार्थिनींना अभ्यासक्रमाचे धडे देण्यासाठी केवळ दोन शिक्षक आहेत. त्यामुळे अकोल्यातील अध्यापिका विद्यालयातील भावी शिक्षकांचे भवितव्य अंधारात सापडले आहे.शासकीय अध्यापिका विद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून कधीकाळी विद्यार्थिनींमध्ये चढाओढ असायची. त्यामुळे अकोल्यातील अध्यापिका विद्यालयात प्रवेश मिळाल्याचा आनंद पूर्वी होत असे. पूर्वानुभवानुसार विद्यार्थिर्नींनी येथे प्रवेश तर मिळविला; पण त्यांचा आता भ्रमनिरास होत आहे. कारण मागील वर्षांपासून अकोल्यातील अध्यापिका विद्यालयाला कमालीची अवकळा आली आहे. यंदा डीटीएडच्या प्रथम वर्षाला केवळ सात, तर द्वितीय वर्षाला १४, असे एकूण २१ विद्यार्थिनी अध्यापिका विद्यालयात आहेत. मात्र, या विद्यार्थिनींना शिकविण्यासाठी केवळ दोनच शिक्षक येथे शिल्लक आहेत. त्यात यंदा नवीन विषयांची भर पडली असून, अभ्यासक्रमाचे धडे गिरविण्यासाठी कोणी मार्गदर्शन देणारे येथे नाहीत. दोन शिक्षकांपैकी एक शिक्षिका अमरावती येथून अप-डाउन करते, तर दुसरे शिक्षक केवळ हजेरी पटावरील स्वाक्षरीपुरता येथे आहे. शिक्षण उपसंचालकांच्या निर्देशान्वये त्यांच्याकडे जुनिअर कॉलेजसंबंधीचे कामकाज सोपविलेले आहे. त्यामुळे भावी शिक्षिकांना धडे देण्यासाठी कोणी नाही. विद्यार्थिनींना प्रॅक्टिकलचे गुण देण्याचे आमिष दाखवून केवळ थोपविले जात आहे. विद्यार्थिनींच्या पालकांनी याबाबत महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या आयुक्तांकडे आणि अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली. भावी पिढी घडविण्याची जबाबदारी खांद्यावर घेणाºया भावी शिक्षिकांना शिकविण्यासाठी शिक्षक पाठवा म्हणून विनंती करण्यात आली आहे. या तक्रारीला पोहोचूनही सहा महिने झाले; पण तक्रारीची साधी दखलही कोणी घेतलेली नाही. पालकांच्या तक्रारीला शिक्षण विभागाने केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे शासकीय अध्यापिका विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २१ विद्यार्थिनी हवालदिल झाल्या आहेत. त्यांना अकोल्यातील राजकीय पुढारी तरी साथ देतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.